शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

शाळांची सुरक्षा वाऱ्यावर!

By admin | Updated: December 29, 2014 00:55 IST

पेशावर येथे झालेल्या प्रकारानंतर शहरातील शाळा महाविद्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील बहुतांश शाळा महाविद्यालयांना संरक्षक भिंती नाहीत.

देवानंद नंदेश्वर / प्रशांत देसाई भंडारापेशावर येथे झालेल्या प्रकारानंतर शहरातील शाळा महाविद्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील बहुतांश शाळा महाविद्यालयांना संरक्षक भिंती नाहीत. कॉन्व्हेंटमध्ये चोखसुरक्षा व्यवस्था आहे तर काही शाळा वगळता बहुतांश शाळांमधील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे वास्तव ‘लोकमत’ चमुने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.शहरातील मोठ्या शाळा आणि कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या हजारावर आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात शाळा किंवा कॉन्व्हेंट प्रशासनाने कुठली खबरदारी घेतात याची पाहणी करण्यासाठी गेले असता या शाळा व कॉन्व्हेंटमध्ये सदर चमूला गेटवरच सुरक्षा कर्मचाऱ्याने संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर प्रवेश दिला. काही कॉन्व्हेंटमधील गेटवर प्रवेश नाकारला. बऱ्याच प्रयत्नानंतर ज्या विद्यार्थ्याशी काम आहे, त्यालाच भेटण्यासाठी मुख्याध्यापकाच्या कक्षासमोरील एका कार्यालयात बसण्यासाठी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आई-वडिलांना वगळता कुणालाही प्रवेश नसल्याचे एका कॉन्व्हेंटमध्ये सांगण्यात आले. शहरातील बहुतांश कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यात येत असल्याचे दिसून आले. काही अनुदानित शाळा वगळता बहुतांश शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. शासनाचे कोट्यवधी रुपयाचे अनुदान घेणाऱ्या शाळांमध्ये कुणालाही, कुठेही, कधीही प्रवेश मिळविता येतो, हे स्पष्टपणे दिसून आले. शहरातील बहुतांश हायस्कूलमध्ये सदर प्रतिनिधी थेट आतपर्यंत गेले. कार्यालयामध्ये भेट देऊन परत आले. वर्गखोल्यांची पाहणी केली मात्र शिपाई अथवा इतर कोणत्याही कर्मचाऱ्यानी विचारणाही केली नाही. यामुळे हायस्कूल प्रशासन शाळांचा सुरक्षेबाबत काहीही उपाययोजना करीत नसल्याचे समोर आले. चौकीदार बसलेले; विचारपूस शून्यशाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर चौकीदार बसलेला असतो. विद्यार्थ्यांव्यतिरिक्त शाळेत प्रवेश करणाऱ्यांना त्यांच्याकडून विचारपूस केली जात नाही. किंवा थांबविले जात नसल्याचा अनुभव एका शाळेचा प्रवेशद्वाराजवळ आला. या प्रकाराने नामांकीत शाळेत प्रवेश करताना, शाळेतून बाहेर जातानाही प्रवेशद्वारावर विचारपूस केली जात नसल्याचे चित्र दिसून आले.सुरक्षा रक्षकांचा वयोमर्यादेचा निकष वाऱ्यावरशहरातील काही खासगी व विना अनुदानीत शाळांनी सुरक्षा व्यवस्थेसाठी ५८ ते ६२ वयोगटातील वृद्धांना नियुक्त केले आहे. जबाबदारीच्या या कामासाठी या वयोगटातील व्यक्ती अटीतटीच्या प्रसंगी असमर्थ ठरू शकतात. काही शाळांनी कंत्राटदारामार्फत तर काही शाळांनी स्वत: तैनात केलेली सुरक्षा यंत्रणा कार्यक्षम ठरु शकते कां? याकडे शाळा व्यवस्थापन समितीसोबत त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांचे पालकांनीही लक्ष दिले पाहिजे. सुरक्षा रक्षकांना ‘ड्रेस कोड’ आवश्यकसुरक्षेची अत्यंत गंभीरतेने दखल घेणाऱ्या शाळा देखील शहरात आहेत. मात्र सुरक्षा रक्षक साधारण वेशात फिरत असल्याने शाळेत येणाऱ्या-जाणाऱ्या व विद्यार्थ्यांवर वचक राहत नाही. त्यासाठी शाळा व्यवस्थापनाने ड्रेस कोड अनिवार्य करणे गरजेचे आहे.काय हटकता? अंगावर येतात!शाळेत प्रवेश करणाऱ्या कुणाकुणाला हटकणार? हटकले, विचारपूस केली, तर काही जण अंगावर येतात. कुणाकुणाशी वाद घालणार? त्यापेक्षा शाळेत प्रवेश करणाऱ्यांवर शंका आल्यास विचारपूस करुनच प्रवेश दिला जातो, असे एका शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील चौकीदाराने सांगितले.