शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

शिक्षकांअभावी ओस पडल्या शाळा

By admin | Updated: June 29, 2016 00:36 IST

बदल्या करताना संबंधीत शाळेत किती शिक्षक शिल्लक राहतील याचा विचार करण्यात आलेला नाही.

प्रकरण शिक्षक बदलीचे : शिक्षकांमध्ये अजूनही रूजू होण्याबाबत संभ्रमावस्थाअशोक पारधी पवनीबदल्या करताना संबंधीत शाळेत किती शिक्षक शिल्लक राहतील याचा विचार करण्यात आलेला नाही. बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याने कित्येक शाळा शिक्षकांशिवाय सुरू झाल्या. तर काही शाळा सात वर्ग असूनही दोन शिक्षकांवर सुरू झालेल्या आहेत.ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे शासन निर्णयानुसार सार्वजनिक बदल्या २०१६ संबंधाने समुपदेशन कार्याशाळा येण्यात आली. शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांच्या प्रकासकीय विनंती नुसार बदल्या करण्यात आल्या. तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धानोरी व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कन्हाळगाव या दोन्ही शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत. परंतु दोन्ही शाळेत प्रत्येकी दोन शिक्षक शिल्लक आहेत. जोड वर्गाची पद्धत फार जूनी आहे. नव्या पद्धतीने दोन्ही शिक्षकांने तीन तीन वर्ग एकत्र बसविले तरीही एक वर्ग शिल्लक राहतो. म्हणून शासनाचे धोरणानव्ये हा प्रकार म्हणजेच बहुवर्ग अध्यापन पद्धती आहे, असे पालकांनी समजावे काय, असा प्रश्न उद्भवलेला आहे. पवनी नगरपालिका क्षेत्रात एकमेव असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिल्याच दिवशी शिक्षकांशिवाय उघडण्यात आली. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसापूर ही सुद्धा शिक्षकाशिवाय उघडण्यात आली. दोन्ही शाळेमधून प्रत्येकी दोन्ही शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. दोन्ही शाळेत उन्हाळ्याच्या सुटीत शिक्षक रूजू झाले. परंतू शाळेच्या पहिल्याच दिवशी ते शाळेत हजर झाले नाही. पवनी येथील केंद्र प्रमुख जी.एल. गायधने व आसगावचे केंद्रप्रमुख के.डी. भुरे यांनी स्वत: शाळेत उपस्थित राहून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रथम दिवस साजरा केला.प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याचे प्रकरण सुरूवातीला मंत्रालयापर्यंत व नंतर न्यायालयापर्यंत पोहचले. त्यामुळे जिल्हाभर अशी अवस्था निर्माण झालेली आहे. शिक्षण क्षेत्रात असा धोळ करणारांनी विद्यार्थ्यांच्या हिताकडे लक्ष देवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही संकल्पना पुर्णत्वास न्यावे, अशी मागणी होवू लागली आहे.