शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळा सुरू, महाविद्यालये मात्र बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST

भंडारा : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालये केव्हा सुरू होणार? याची चर्चा सुरू ...

भंडारा : इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालये केव्हा सुरू होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. महाविद्यालये सुरू करावीत यासाठी विद्यार्थी संघटनांनीही चंग बांधला असून राज्य शासनाकडे तशी मागणीही लावून धरली आहे. यात विशेषत: अभाविपने पुढाकार घेतल्याचे समजते.

भंडारा जिल्ह्यात नागपूर विद्यापीठाशी अधिकृत असलेली जवळपास ७० महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांतून जवळपास ४० हजार विद्यार्थी शिक्षणासाठी नोंदणीकृत आहेत. मात्र कोरोना संसर्ग काळात शाळा व महाविद्यालये सुरू झालीच नाहीत. विद्यमान स्थितीत नववी ते बारावी व त्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाल्यानंतर महाविद्यालये बंदच राहणार काय, असा सवाल उपस्थित करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महाविद्यालये सुरू करण्यासाठी २ फेब्रुवारीला जिल्ह्यातील एकूण १० शाखांमध्ये आंदोलन केले. ‘विद्येचे मंदिर का उघडण्यात येत नाही?’ असा सवाल उपस्थित करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात सरकारने आता गांभीर्यपूर्वक विचार करून महाविद्यालय सुरू करण्याबाबत निर्देश द्यावेत, असा सूरही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. आता जिल्हाभरातील महाविद्यालये सुरू होण्याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

४० हजार विद्यार्थी प्रतीक्षेत

जिल्ह्यात जवळपास ७० महाविद्यालये असून त्यातून ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोना संसर्गामुळे गत आठ महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यातही शाळा सुरू झाल्या; मात्र महाविद्यालये बंद असल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ४० हजार विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित आहेत. अनेक विद्यार्थी ग्रामीण क्षेत्रातून असल्याने त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशात मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम होऊ शकतो.

गत आठ महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी त्यातून नेमक्या अडचणींचे निदान होत नाही. विशेषत: ग्रामीण क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. आधीच बहुतांश अभ्यासक्रम झाला नसल्याने त्याचे टेंशन वेगळे आहे.

- रजत जीभकाटे, विद्यार्थी

कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे महाविद्यालय बंदचा चांगलाच फटका आम्हाला बसत आहे. ग्रामीण क्षेत्रात तर मार्गदर्शनासाठी गुरुवर्यांची मदत घ्यावीच लागते. आता शाळांपाठोपाठ महाविद्यालयेही लवकरात लवकर सुरू करावीत, अशी आमची मागणी आहे. जेणेकरून शिक्षणाच्या प्रवाहात सामावून जाता येईल.

- आर्यन चुऱ्हे, विद्यार्थी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे महाविद्यालये सुरू करण्याची मागणी घेऊन वेळोवेळी राज्य शासनाला अवगत करण्यात आले आहे. मात्र आधीच्या व आजच्या स्थितीत फरक असल्याने महाविद्यालये सुरू करण्याबाबत कुठलीच अडचण नसावी.

- अखिलेश भारतीय, जिल्हा संघटनमंत्री अभाविप, भंडारा

राज्यात शासकीय कार्यालये, सिनेमागृहे, एसटी, मंदिरे व आता शाळाही सुरू झाल्यानंतर महाविद्यालये बंद ठेवण्याचे काहीच प्रयोजन नाही. कोरोना संसर्गाअंतर्गत नियमांचे पालन करून महाविद्यालये सुरू करावीत अशी आमची मुख्य मागणी आहे.

- सार्थक कुंभलकर, नगरमंत्री अभाविप, शाखा भंडारा