भंडारा : राज्य शासनाने एका परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश देण्यासाठी सहा वर्षे व नर्सरीसाठी तीन वर्ष पूर्ण असावे, अशी सक्ती केली आहे. अभ्यासक्रमाचा वाढलेला आवाका, विद्यार्थ्यांची बौद्धिकक्षमता यादृष्टीने हा निर्णय सर्वसमावेशक व स्तुत्य आहे. परंतु, सध्याच्या स्थितीत नर्सरीला वर्ग जोडण्यात आलेल्या शाळा या निर्णयामुळे अडचणीत आलेल्या आहेत. आधीच विद्यार्थी मिळविण्यासाठी स्पर्धा असल्यामुळे खासगी शाळांची डोकेदुखी वाढली आहे.काही प्राथमिक शाळांना केजी वर्ग जोडण्यात आले असून सीबीएसई तसेच पूर्ण इंग्रजी माध्यमाच्या शाळा आदी शाळांमध्ये नर्सरी किंवा बालवाडीत केजी १, केजी २ चे वर्ग जोडलेले असतात. परंतु, नव्या निर्णयानुसार चार वर्ष पूर्ण झालेल्या केजीच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसावे लागणार आहे. यामुळे अतिरिक्त शैक्षणिक शुल्काचा भुर्दंड पालकांवर बसणार आहे. पहिल्या वगार्साठी सहा वर्ष वयाची अट व्यवस्थापनाची व पालकाची डोकेदुखी ठरली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा प्रवेशासाठी कार्यपद्धती ठरविताना वयाबाबतच्या अटीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आतापर्यंत पहिलीसाठी पाच वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पात्र ठरविले जात होते. परंतु, पूर्व प्राथमिक वर्गाकरिता वयाची कोणतीही अट नव्हती. मात्र आता पहिलीसाठी सहा वर्ष व नर्सरी प्ले ग्रुपसाठी तीन वर्ष ही वयोर्मयादा निश्चित करण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक वगार्तील प्रवेशासाठी निश्चित अशी वयाची अट नव्हती. यात एक वाक्यता आणण्यासाठी प्रवेशाचे वय निश्चित करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)अंमलबजावणी होणारयेत्या शैक्षणिक वर्षात ज्या मुलाने आपल्या वयाची पाच वर्ष पूर्ण केली आहे, त्याला पहिल्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. प्ले ग्रुप किंवा नर्सरी प्रवेशासाठी २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी वयाची तीन वर्ष पूर्ण केल्याची अट ठेवण्यात आली आहे. २०१८-१९ पर्यंत पहिल्या वर्गाच्या प्रवेशासाठी वयाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार आहे.
वयोमर्यादेच्या निर्णयाने शाळा अडचणीत
By admin | Updated: March 29, 2015 00:58 IST