शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

शालेय पोषण आहाराचे धान्य वाहनासह पकडले

By admin | Updated: August 5, 2014 23:20 IST

मानेगाव येथील चैतन्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आलेल्या शालेय पोषण आहाराचे धान्य काळ्या बाजारात विक्रीस नेण्यात येत होते. ही बाब लक्षात येताच शिक्षक पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी धान्य

भंडारा : मानेगाव येथील चैतन्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आलेल्या शालेय पोषण आहाराचे धान्य काळ्या बाजारात विक्रीस नेण्यात येत होते. ही बाब लक्षात येताच शिक्षक पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी धान्य साठ्यासह गाडी पकडली. यामुळे शिक्षण संस्था चालकांचे धाबे दणाणले आहेत. तालुक्यातील मानेगाव येथील चैतन्य शिक्षण संस्थेच्या वतीने चैतन्य विद्यालय चालविल्या जाते. या शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या मध्यांन्ह भोजण योजनेच्या अंतर्गत पोषण आहाराचा पुरवठा होतो. विद्यार्थ्यांचे जीवनमान व त्यांची शरीरीक वाढ योग्य व्हावी या दृष्टीने राज्य शासन शालेय पोषण आहार योजना राबवित आहे. यावर लाखो रूपयांचा खर्च करण्यात येतो. सदर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आलेले शालेय भोजन योजनेचे धान्य काळ्या बाजारात विक्रीस जात असल्याची माहिती शाळेच्या शिक्षक पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती.यानुसार त्यांनी मागील काही दिवसांपासून पाळत ठेवली होती. सोमवारला श्रावण सोमवार असल्याने दुपारच्या सुमारास शाळा सुटली. त्यानंतर शालेय पोषण आहाराचे धान्य एमएच-४०/वाय-८२६१ या बोलोरो गाडीत भरीत असल्याची माहिती पालक शिक्षक संघाचे किशोर हरडे व माजी सरपंच नत्थू बांते यांना मिळाली. यावरून त्यांनी गाडीचा पाठलाग केला. धान्यसाठा भरून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या सदर वाहनाला सिल्ली येथे थांबवून गाडीचालक मंगेश कांबळे याची विचारणा केली व गाडीची तपासणी केली असता त्यात १२ पोते तांदूळ, तेलाचे पिंप, अर्धा पोते जिरा, तुवर दाळ १० बॅग, अर्धा बॅग मिठ, हळद, मिरची पावडर, दोन बॅग चनादाळ हे धान्य साठा आढळून आला. विद्यार्थ्यांचे शालेय पोषणाचे साहित्य परस्पर विक्रीस जात असल्याची बाब लक्षात आल्याने ती जप्त करून गाडीसह ते ग्रामपंचायत येथे आले. यानंतर सदर घटनेची माहिती शालेय पोषण आहाराच्या अधिकारी मंजुषा गजभिये, कारधा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शेट्टे, केंद्रप्रमुख डुंभरे, तलाठी भेंडारकर, बीट जमादार बहादुरे आदींना देण्यात आली. सदर माल जप्त करण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या शालेय पोषणाची विक्री करू पाहणाऱ्या संस्था चालक, मुख्याध्यापक व यात सहभागी असणाऱ्या अन्य लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी किशोर हरडे, नत्थू बांते, कैलास कोटांगले, कुलदीप सुखदेवे, रणविर डोरले, दिवाकर मने, विलास सुर्यवंशी, श्रीकांत गभणे आदींनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)