शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य नाही

By admin | Updated: May 9, 2016 00:38 IST

शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याबाबतची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू केली आहे.

पाचवी व आठवीची प्रवेश प्रक्रिया : शिक्षण संचालकांचे निर्देशभंडारा : शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याबाबतची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू केली आहे. पण चवथी किंवा सातवी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखल देण्यात येत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे या वर्गांमध्ये प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य नसल्याचे आदेश शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी दिले आहे. शासनामार्फत जिल्हा परिषद शाळांमध्ये यंदाच्या सत्रापासून गरज असेल तिथे पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे विद्यार्थी टिकवून ठेवण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांची धडपड सुरू आहे. पण अनेक ठिकाणी पाचवी किंवा आठवीत इतर शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू आहे. त्यामुळे ते शाळा सोडल्याचा दाखला मागत आहे. पण जिल्हा परिषद शिक्षक पालकांना शाळा सोडल्याचा दाखला द्यायला तयार नाही. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००८ नुसार प्रत्येक बालकास शिक्षणाचा हक्क आहे. नजीकच्या कुठल्याही शाळेत शिक्षण घेण्याचा नैतिक अधिकारही आहे. त्यामुळे अशा प्रकारे शासन निर्णयाचा चुकीचा अन्वयार्थ लावून बालकाचा शाळा सोडल्याचा दाखल रोखून धरणे योग्य नाही. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांस त्याच्या ऐच्छिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी शाळा सोडल्याचा दाखल देणे बंधककारक आहे. त्यामुळे शिक्षणाचा हक्क अधिनियमातील तरतुदीनुसार नवीन शाळेत प्रवेश घेताना शाळा सोडल्याचा दाखल सादर करणे अनिवार्य नसल्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. (शहर प्रतिनिधी)