शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य नाही

By admin | Updated: May 9, 2016 00:38 IST

शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याबाबतची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू केली आहे.

पाचवी व आठवीची प्रवेश प्रक्रिया : शिक्षण संचालकांचे निर्देशभंडारा : शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याबाबतची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू केली आहे. पण चवथी किंवा सातवी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखल देण्यात येत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे या वर्गांमध्ये प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य नसल्याचे आदेश शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी दिले आहे. शासनामार्फत जिल्हा परिषद शाळांमध्ये यंदाच्या सत्रापासून गरज असेल तिथे पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे विद्यार्थी टिकवून ठेवण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांची धडपड सुरू आहे. पण अनेक ठिकाणी पाचवी किंवा आठवीत इतर शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू आहे. त्यामुळे ते शाळा सोडल्याचा दाखला मागत आहे. पण जिल्हा परिषद शिक्षक पालकांना शाळा सोडल्याचा दाखला द्यायला तयार नाही. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००८ नुसार प्रत्येक बालकास शिक्षणाचा हक्क आहे. नजीकच्या कुठल्याही शाळेत शिक्षण घेण्याचा नैतिक अधिकारही आहे. त्यामुळे अशा प्रकारे शासन निर्णयाचा चुकीचा अन्वयार्थ लावून बालकाचा शाळा सोडल्याचा दाखल रोखून धरणे योग्य नाही. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांस त्याच्या ऐच्छिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी शाळा सोडल्याचा दाखल देणे बंधककारक आहे. त्यामुळे शिक्षणाचा हक्क अधिनियमातील तरतुदीनुसार नवीन शाळेत प्रवेश घेताना शाळा सोडल्याचा दाखल सादर करणे अनिवार्य नसल्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. (शहर प्रतिनिधी)