शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य नाही

By admin | Updated: May 9, 2016 00:38 IST

शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याबाबतची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू केली आहे.

पाचवी व आठवीची प्रवेश प्रक्रिया : शिक्षण संचालकांचे निर्देशभंडारा : शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याबाबतची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू केली आहे. पण चवथी किंवा सातवी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखल देण्यात येत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे या वर्गांमध्ये प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य नसल्याचे आदेश शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी दिले आहे. शासनामार्फत जिल्हा परिषद शाळांमध्ये यंदाच्या सत्रापासून गरज असेल तिथे पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे विद्यार्थी टिकवून ठेवण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांची धडपड सुरू आहे. पण अनेक ठिकाणी पाचवी किंवा आठवीत इतर शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू आहे. त्यामुळे ते शाळा सोडल्याचा दाखला मागत आहे. पण जिल्हा परिषद शिक्षक पालकांना शाळा सोडल्याचा दाखला द्यायला तयार नाही. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००८ नुसार प्रत्येक बालकास शिक्षणाचा हक्क आहे. नजीकच्या कुठल्याही शाळेत शिक्षण घेण्याचा नैतिक अधिकारही आहे. त्यामुळे अशा प्रकारे शासन निर्णयाचा चुकीचा अन्वयार्थ लावून बालकाचा शाळा सोडल्याचा दाखल रोखून धरणे योग्य नाही. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांस त्याच्या ऐच्छिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी शाळा सोडल्याचा दाखल देणे बंधककारक आहे. त्यामुळे शिक्षणाचा हक्क अधिनियमातील तरतुदीनुसार नवीन शाळेत प्रवेश घेताना शाळा सोडल्याचा दाखल सादर करणे अनिवार्य नसल्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. (शहर प्रतिनिधी)