शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

शिक्षकांविना गावातच झाडाखाली भरली शाळा

By admin | Updated: September 25, 2015 00:08 IST

गावापासून तीन कि.मी. दूर शाळा, रस्त्यावरून रेतीने भरलेल्या ट्रकांची दिवसभर वर्दळ, जीवघेणे खड्डेमय रस्ते, वाहनामधून उडणाऱ्या रेतीच्या कणांचा त्रास.

दूरच्या शाळेचा विद्यार्थ्यांनी केला विरोध : तीन दिवसांपासून शिक्षण विभागाचे दुर्लक्षलाखांदूर : गावापासून तीन कि.मी. दूर शाळा, रस्त्यावरून रेतीने भरलेल्या ट्रकांची दिवसभर वर्दळ, जीवघेणे खड्डेमय रस्ते, वाहनामधून उडणाऱ्या रेतीच्या कणांचा त्रास. असह्य झाल्याने विद्यार्थ्यांनी दूरच्या शाळेचा विरोध करीत गावातील चौकात शिक्षकांविना झाडाखाली शाळा भरविल्याचा प्रकार इटान या लहानशा गावात घडला. तीन दिवसांपासून शिक्षण विभागाचे अधिकारी याठिकाणी न फिरकल्यामुळे पालकांमध्ये असंतोष पसरला आहे.वैनगंगा नदी काठावर वसलेल्या लाखांदूर तालुक्यातील इटान या गावाला पुराचा तडाखा बसत असल्याने सन १९७४ मध्ये या गावाचे पुनर्वसन करून तीन कि.मी. अंतरावर जागा उपलब्ध करून देण्यात आली. शाळा, ग्रामपंचायत इमारत बांधण्यात आली. आजपर्यंत इटान येथील ७५ विद्यार्थी आबादी भूखंडावरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जात होते. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत चार शिक्षक आहेत. येथील १५ विद्यार्थी असे एकूण ९१ विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. महसूल विभागाने इटान रेतीघाटाचा लिलाव केल्याने इटान आबादी हा मार्ग दिवसभर ओव्हरलोड रेतीच्या ट्रकने वर्दळीचा ठरला आहे. तीन कि.मी. चा शाळेचा प्रवास लहान मुलांसाठी त्रासदायक ठरला असला तरी खड्डेमय रस्ते, ट्रकांमुळे अपघाताची भीती, रेतीच्या कणांमुळे होणारा त्रास असह्य झाल्याने ऐन पावसाळ्यात पालकांनी त्या ७५ विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेत गावातील मुख्य चौकात झाडाखाली उघड्यावर शिक्षकांशिवाय शाळा भरवली. यातील एका विद्यार्थ्याला दररोज शिक्षकाची भूमिका वठवावी लागत आहे. आबादी येथील शाळा ओस पडली असून केवळ १५ विद्यार्थ्यांची शाळेतील हजेरी विनोदाचा विषय ठरला आहे. शालेय पोषण आहार तयार करून व्यर्थ ठरत आहे. दुसरीकडे राज्य शासनाचा शिक्षण विभागाने ‘गाव तिथे शाळा’चा नारा देत सर्वशिक्षा अभियानावर कोट्यवधीचा निधी खर्च करीत आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले असले तरी मुख्य प्रवाहातील होतकरू विद्यार्थ्यांना प्रवाहाबाहेर नेण्याचा प्रयत्न तालुका शिक्षण विभागाकडून होत असल्याचा आरोप सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी केला आहे. जोपर्यंत गावात शाळा सुरु होणार नाही तोपर्यंत विद्यार्थी झाडाखालीच बसतील असा निर्धार पालकांनी केल्याने आता शिक्षण विभाग कोणता निर्णय घेतात याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)