शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

शिक्षकांविना गावातच झाडाखाली भरली शाळा

By admin | Updated: September 25, 2015 00:08 IST

गावापासून तीन कि.मी. दूर शाळा, रस्त्यावरून रेतीने भरलेल्या ट्रकांची दिवसभर वर्दळ, जीवघेणे खड्डेमय रस्ते, वाहनामधून उडणाऱ्या रेतीच्या कणांचा त्रास.

दूरच्या शाळेचा विद्यार्थ्यांनी केला विरोध : तीन दिवसांपासून शिक्षण विभागाचे दुर्लक्षलाखांदूर : गावापासून तीन कि.मी. दूर शाळा, रस्त्यावरून रेतीने भरलेल्या ट्रकांची दिवसभर वर्दळ, जीवघेणे खड्डेमय रस्ते, वाहनामधून उडणाऱ्या रेतीच्या कणांचा त्रास. असह्य झाल्याने विद्यार्थ्यांनी दूरच्या शाळेचा विरोध करीत गावातील चौकात शिक्षकांविना झाडाखाली शाळा भरविल्याचा प्रकार इटान या लहानशा गावात घडला. तीन दिवसांपासून शिक्षण विभागाचे अधिकारी याठिकाणी न फिरकल्यामुळे पालकांमध्ये असंतोष पसरला आहे.वैनगंगा नदी काठावर वसलेल्या लाखांदूर तालुक्यातील इटान या गावाला पुराचा तडाखा बसत असल्याने सन १९७४ मध्ये या गावाचे पुनर्वसन करून तीन कि.मी. अंतरावर जागा उपलब्ध करून देण्यात आली. शाळा, ग्रामपंचायत इमारत बांधण्यात आली. आजपर्यंत इटान येथील ७५ विद्यार्थी आबादी भूखंडावरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जात होते. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत चार शिक्षक आहेत. येथील १५ विद्यार्थी असे एकूण ९१ विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. महसूल विभागाने इटान रेतीघाटाचा लिलाव केल्याने इटान आबादी हा मार्ग दिवसभर ओव्हरलोड रेतीच्या ट्रकने वर्दळीचा ठरला आहे. तीन कि.मी. चा शाळेचा प्रवास लहान मुलांसाठी त्रासदायक ठरला असला तरी खड्डेमय रस्ते, ट्रकांमुळे अपघाताची भीती, रेतीच्या कणांमुळे होणारा त्रास असह्य झाल्याने ऐन पावसाळ्यात पालकांनी त्या ७५ विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेत गावातील मुख्य चौकात झाडाखाली उघड्यावर शिक्षकांशिवाय शाळा भरवली. यातील एका विद्यार्थ्याला दररोज शिक्षकाची भूमिका वठवावी लागत आहे. आबादी येथील शाळा ओस पडली असून केवळ १५ विद्यार्थ्यांची शाळेतील हजेरी विनोदाचा विषय ठरला आहे. शालेय पोषण आहार तयार करून व्यर्थ ठरत आहे. दुसरीकडे राज्य शासनाचा शिक्षण विभागाने ‘गाव तिथे शाळा’चा नारा देत सर्वशिक्षा अभियानावर कोट्यवधीचा निधी खर्च करीत आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले असले तरी मुख्य प्रवाहातील होतकरू विद्यार्थ्यांना प्रवाहाबाहेर नेण्याचा प्रयत्न तालुका शिक्षण विभागाकडून होत असल्याचा आरोप सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी केला आहे. जोपर्यंत गावात शाळा सुरु होणार नाही तोपर्यंत विद्यार्थी झाडाखालीच बसतील असा निर्धार पालकांनी केल्याने आता शिक्षण विभाग कोणता निर्णय घेतात याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)