शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षा स्थगित करावी, अन्यथा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST

भंडारा : कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इयत्ता ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शासनाला यापूर्वी ...

भंडारा : कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इयत्ता ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शासनाला यापूर्वी पत्र देऊन मागणी केली होती. मात्र, शासनाकडून अजूनही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. उलट परीक्षा परिषदेने सुपरव्हिजनचे नियोजन पत्र पाठवून संभ्रम वाढविला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेलाही याविषयी निवेदन दिल्यानंतर परीक्षा परिषदेने हा विषय शासनाकडे टोलविला असून, शासनाने याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही.

देशपातळीवरील प्रमुख परीक्षा पुढे ढकललेल्या असतानाही, तसेच विद्यापीठाच्या परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होत असताना लहान मुलांच्या परीक्षा मात्र ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याचा हट्ट मुद्दामहून का आहे? असे पालक व शिक्षक विचारत आहेत. केंद्र शासनाच्या सूचनांकडे, शिक्षक संघटना, पालक यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्यभरात एकूण ६ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत.

एका परीक्षा केंद्रावर २०० ते ५०० परीक्षार्थी असतात. तेवढ्याच प्रमाणात पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑफलाइन परीक्षा कोविडच्या काळात घेणे, खरंच आवश्यक आहे का? काही दिवसांपूर्वीच केंद्र शासनाने कोणत्याही परीक्षा या काळात घेण्यात येऊ नयेत, असे निर्देश दिलेले असतानाही ५ मे रोजी परीक्षा परिषदेने परीक्षा होणार असल्याचे नियोजन पत्र काढणे, म्हणजे हा मुद्दाम केलेला हट्टवादच आहे.

शासनाने शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा आपला अट्टहास असाच चालू ठेवल्यास विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांच्या आरोग्यासाठी या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा आमदार नागो गणार, योगेश बन, अजय वानखेडे, सुनील पाटील, रंजना कावळे, जुगल बोरकर, अमोल देठे, विलास बोबडे, विजय साळवे यांनी दिला आहे.

बॉक्स

शासकीय दुटप्पीपणा

२ मे पासून २८ जूनपर्यंत उन्हाळी सुटी देण्यात आलेली असल्यामुळे अनेक पालक व शिक्षक त्यांच्या मूळगावी गेले आहेत. काहींनी तसे नियोजन केले आहे. एकीकडे शिक्षकांना उन्हाळी सुटी जाहीर करायची नि त्याच काळात अशी परीक्षा ठेवून त्यांना त्यांची रजा अर्धवट सोडून पुन्हा शाळेत बोलावणे म्हणजे शासनाचा दुटप्पीपणा आहे, असे वाटते, तसेच केवळ या परीक्षेसाठी शिक्षकांना बोलावायचे का? असा प्रश्न मुख्याध्यापकांकडून विचारला जात आहे. कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात लहान मुलांची परीक्षा घेण्यात येऊ नये, असे मत अनेक पालकांनी व्यक्त केले आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालकांनी केली आहे. शिक्षक परिषदेनेही या सगळ्या मागण्या शासनापर्यंत वेळोवेळी पोहोचवूनसुद्धा शासनाने अजून निर्णय घेतला नाही. उशिरा निर्णय घेण्याची परंपरा शिक्षण विभागाने जपली आहे. त्यामुळे पालक व शिक्षक यांच्यामध्ये संताप व्यक्त होत आहे.