शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:32 IST

भंडारा : कोराेना महामारीने वर्ग १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण करण्यात ...

भंडारा : कोराेना महामारीने वर्ग १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण करण्यात येणार असल्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला. यामुळे जिल्ह्यातील वर्ग १ ते ८ पर्यंतवीच्या १ लाख ३६ हजार ४०६ विद्यार्थ्यांना यंदा परीक्षा न देताच उत्तीर्ण केले जाणार आहे. एकीकडे शासन शिष्यवृत्तीची परीक्षा घेणार आहे मात्र शाळेची परीक्षा घेणार नाही, हे कसले धोरण याबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

भंडारा जिल्ह्यात ७० हजार ६४५ मुलगे, तर ६५ हजार ७६१ मुली असे एकूण १ लाख ३६ हजार ४०६ विद्यार्थी आहेत. यात इयत्ता १ ते ५ ची विद्यार्थी संख्या ४२ हजार ६९५ असून, इयत्ता ६ ते ८ मध्ये २७ हजार ९५० विद्यार्थी आहेत. याचप्रमाणे इयत्ता १ ते ५वीमध्ये ३९ हजार ५११ विद्यार्थिनी असून, इयत्ता १ ते ८ मध्ये २६ हजार २५० विद्यार्थिनींची संख्या आहे. अभ्यास न करता पुढच्या वर्गात जाण्याचा आनंद विद्यार्थ्यांना होत आहे. मात्र, कोरोनामुळे आपला पाल्य मागे पडत आहे, आता शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाणार असल्याने मग इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षा का घेण्यात आल्या नाहीत, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

पालक आपल्याच विवंचनेत असल्याचे दृश्य आहे. विद्यार्थी अभ्यास न करता ते पुढच्या वर्गात जात आहेत. यंदा कोरोनामुळे शाळा सुरू झाल्या परंतु कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून सुरू झालेल्या शाळांना बंद करण्यात आले. शाळा सुरू झाल्यावर सर्वच बेजबाबदारपणाने वागू लागल्याने कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला. परिणामी सुरू झालेल्या शाळा बंद करण्याची वेळ शासनावर आली आहे.

परीक्षेबाबत तज्ज्ञ काय म्हणतात...

सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. कारण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, हा यामागील उद्देश आहे. जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. यासाठी शासनाने घेतलेला निर्णय विचार करूनच घेतला आहे.

- आशिष मेश्राम,

मुख्याध्यापक, जि.प.शाळा, मुंढरी खु.

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना एकत्रित बसवून परीक्षा घेणे शक्य नाही. शिष्यवृती परीक्षेत विद्यार्थी संख्या कमी असेल. त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे, असे वाटत नाही. जीवन जगू तरच आपण समोर शिकू.

-बाळासाहेब मुंडे,

शिक्षक, जि.प. शाळा, वरठी

शाळेत बोलावून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे कोरोनाच्या काळात योग्य नाही. तसेही कोणत्याही मुलाला ८ वी पर्यंत नापास करू नये, असे आधीचेच नियम आहेत. यंदा विना परीक्षा उत्तीर्ण केले जाणार आहे. आता १० वी वगळता ११ वी पर्यंतच्या सर्व मुलांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचे स्वागतच करावे लागेल.

-केशर बोकडे, मुख्याध्यापिका, शास्त्री विद्यालय, भंडारा

पालक काय म्हणतात...

कोरोनामुळे शासनाने वर्ग १ ते ८ वी च्या मुलांना सरसकट पुढच्या वर्गात उत्तीर्ण करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु या वर्गातील अभ्यासच झाला नाही आणि पुढच्या वर्गात टाकणे हेदेखील मनाला पटत नाही. परंतु कोरोनाची स्थिती पाहून घेतलेला निर्णय योग्यच म्हणावा लागेल.

- हेमकृष्ण वाडीभस्मे, पालक, साकोली

विद्यार्थ्यांच्या शाळा बंद, शिक्षण बंद मात्र त्यांना पुढच्या वर्गात टाकणे हा निर्णय योग्य म्हणण्यापेक्षा याशिवाय शासनाकडे पर्याय नाही. त्यामुळे या निर्णयामुळे विद्यार्थी तर खुश होतील पण मुलांना त्या वर्गातील ज्ञान यावे यासाठी असा पालकांचा आग्रह आहे.

- तुकडूदास दुधबरैय्या, पालक, भंडारा

ही ढकलगाडी काय कामाची

अभ्यास न करता व परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रमोट केले जाते. ही ढकलपास गाडी काय कामाची, असा प्रश्न सर्वांच्या समोर येतो. एकही धडा न वाचता पुढच्या वर्गात जाण्याची संधी देणे म्हणजे विद्यार्थ्यांना खुळे बनविण्यासारखेच आहे. शिक्षणाची प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे. पहिल्या वर्गापासूनचे शिक्षण तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे पदवीचे शिक्षण आहे.