शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

स्वच्छता अभियान पाठ सोडेना

By admin | Updated: November 3, 2014 23:21 IST

महात्मा गांधी जयंतीपासून स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली. सर्वच शाळा व महाविद्यालयांनी हे अभियान मोठा प्रमाणात राबविले. मात्र स्वच्छता अभियान पाठ सोडण्याची चिन्हे दिसत नसून

भंडारा : महात्मा गांधी जयंतीपासून स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली. सर्वच शाळा व महाविद्यालयांनी हे अभियान मोठा प्रमाणात राबविले. मात्र स्वच्छता अभियान पाठ सोडण्याची चिन्हे दिसत नसून १४ नोव्हेंबर (बालक दिन) ते १९ नोव्हेंबर (जागतिक शौचालय दिन) या कालावधीत आणखी स्वच्छता अभियान राबविण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची फार मोठी तारंबळ उडाली आहे. स्वच्छतेचे महत्व कळावे, त्याचबरोबर रोगांना आळा घालता यावा, यासाठी केंद्र शासनाने २ आॅक्टोबरपासून स्वच्छता अभियान संपूर्णदेशात राबविण्यास सुरूवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: हातात झाडू घेऊन साफसफाई केली. त्याचबरोबर देशातल्या प्रत्येक शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, शिक्षण संस्था यांनी स्वच्छता मोहिम राबविण्याचे निर्देश दिले. त्याला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसादही मिळाला. मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. हा टप्पा बालक दिनापासून सुरूवात होऊन जागतिक शौचालय दिनाला संपणार आहे. यामध्ये १४ नोव्हेंबर रोजी प्रभातफेरी काढणे, विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करणे, १५ नोव्हेंबर रोजी मुनादीद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करणे, १६ नोव्हेंबर रोजी वर्तमान पत्रामध्ये बातमी देणे, शाळेमध्ये जाऊन स्वच्छतेचा संदेश देणे, १७ नोव्हेंबर रोजी खुल्या जागेवर शौचास करण्यास बंदी आणणे, यासाठी नागरिक, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य घेणे, १८ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करणे, साफसफाईचे वेळापत्रक तयार करून नागरिकांना साफसफाईचे व आरोग्यविषयक महत्व समजावून सांगणे, १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रत्येक शाळेमध्ये कार्यक्रम आयोजित करून शौचालयाचे व आरोग्याचे महत्व समजावून सांगणे आदी कामे आहेत. (नगर प्रतिनिधी)