शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चार दाणे वाचवू या, चिमण्या पाखरांसाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 22:36 IST

लग्न म्हटलं की कुणाच्याही तोंडून सहज निघतात, चार अक्षता टाकून येतो. या चार अक्षता पाहता पाहता चार किलोच्या होतात. हे कुणाच्या ध्यानी येत असले तरी त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. वाढत्या महागाईमुळे सामान्यांना धान्य मिळणे कठिण झाले आहे.

ठळक मुद्देलग्न मंडपात तांदळाचा खच : पाखरांना, मागणाऱ्यांना मिळतो नकार, पारंपरिक पद्धतीला फाटा देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लग्न म्हटलं की कुणाच्याही तोंडून सहज निघतात, चार अक्षता टाकून येतो. या चार अक्षता पाहता पाहता चार किलोच्या होतात. हे कुणाच्या ध्यानी येत असले तरी त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. वाढत्या महागाईमुळे सामान्यांना धान्य मिळणे कठिण झाले आहे. यामुळे येणाऱ्या युवा पिढीवर याच चार अक्षतांचे दाणे वाचविण्याची वेळ आली आहे. या चार दाण्यातून कुणाच्या दोन वेळेच्या जेवणाची सोय होऊ शकते हे विसरता कामा नये.लग्नात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता टाकण्याची पद्धत अनादी काळापासून सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि ज्वारी या धान्याची नासाडी होते. लग्न लागण्याच्या वेळी येणाºया प्रत्येक वºहाड्याच्या हातात अक्षता म्हणून तांदळाला कुंकू व ज्वारीला हळद लावण्यात येते. आजघडीला अक्षता वाटण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. मंडपात प्रवेश होताच प्लॉस्टिकच्या छोट्या पाकिटात तांदळाची व दुसºया पाकिटात ज्वारीची अक्षता हातात पडते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर मंडपात कुठे प्लॉस्टिकची रिकामी पाकिटे तर तर कुठे रंगबेरंगी तांदळाचा सडा दिसून येतो. मंडपात असणाऱ्यांचे याकडे लक्ष जाते. मात्र कुण्या गरजवंतांची चार मुले जेवू शकतील, याचा विचार कुणाच्या मनात येत नाही.लग्न समारंभ दिवसेंदिवस प्रतिष्ठेचा सोहळा ठरत आहे.या प्रतिष्ठेमुळे धान्य पायदळी तुडवल्या जात आहे. मात्र त्यात बदल करण्याची इच्छा कुणाच्याही मनात येत नाही. जीवनाचे वास्तव सांगणाºया राष्ट्रसंतांनी या गोष्टीचा उलगडा तेव्हाच केला होता. त्यांनी सांगितलेले वास्तव अनेकांना कळले असले तरी अंमलबजावणी मात्र कुणीही करीत नसल्याचेच दिसून येत आहे.आतातरी तांदळाचे महत्त्व लक्षात घेता पुरातन रुढी परपंरेचा पगडा मिरविणे सोडून तांदळाची नासाडी थांबविण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घेतल्यास यावर आळा बसू शकेल, यात शंका नाही.रूढ झाली अक्षतांची पद्धतलग्नात वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकतात. ही पद्धत पुरातन आहे. अक्षता हे पुर्णतेचे लक्षण आहे. धान्यात तांदूळ हे संपन्नतेचे लक्षण असल्यामुळे हा प्रकार सुरू झाला. प्राचीन काळापासून देशात धान्याच्या अक्षता तयार करून त्या वधू वरांच्या डोक्यावर टाकण्यााची ही प्रथा आजही कायम आहे.अन्न हे पोट भरण्याचे साधन आहे. अन्न पायाखाली आल्यास त्याचा अपमान होतो, असे भारतीय संस्कृतीत म्हटले आहे. अन्न वाचविण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. परंतु लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात धान्य पायदळी तुडविले जातात.पाखरांना धान्य देण्याकडे कानाडोळावाढत्या उन्हात पक्ष्यांना अन्न मिळणे कठिण होते. यामुळे छतावर, घरी असलेल्या झाडावर पाणी आणि अन्न ठेवण्याची गरज आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. हीच मंडळी लग्नात अक्षतांच्या रुपाने धान्य फेकण्यात पुढे राहतात.फुलांना पसंतीकुणाचे स्वागत करायचे असेल तर फुलांचा वापर करण्यात येतो. फुलांशिवाय स्वागत अशक्यच असल्याचे दिसत आहे. फुलांशिवाय धार्मिक कार्य होत नाही. लग्नाच्या वेळी नवदाम्पत्याचे स्वागत फुलांच्या माध्यमातून केले तर वावगे काय. वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता फेकण्यापेक्षा त्यांच्यावर पुष्पवर्षाव करण्याचा विचार करणे गरजेचे आहे.आज ती परिस्थिती नाहीवधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकण्याची सुपिकतेमुळे अस्तित्वात आल्याचा उल्लेख आहे. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. उत्पन्नही घटले आहे. सुपिकताही कमी झाली. शेतात पीक येत नसल्याने शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. यामुळे अक्षतांच्या नावावर धान्य फेकण्याच्या या पद्धतीला बगल देण्याची गरज आहे.वाया घालविणार पण देणार नाहीलग्न समारंभात अक्षतांच्या नावावर धान्य फेकणाºयांकडे जर कुणी धान्य मागण्याकरिता गेले तर त्याला समोर जा, असे सांगून हाकलून लावणारे अनेक महाभाग आहेत. मात्र विवाहाची वेळ आल्यास धान्याची उधळण करीत प्रतिष्ठा जोपासणारेही कमी नाहीत.