शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी सत्याग्रह आंदोलन

By admin | Updated: June 22, 2014 23:57 IST

दोन वेळा पिण्याचे पाणी देण्याचे आणि भंडारा शहराच्या सर्वांगीण विकासाच्या १९ मुद्यांचे येत्या बुधवारपर्यंत लिखीत उत्तर देण्याचे आश्वासन सत्याग्रह आंदोलनाच्या अनुषंगाने नगराध्यक्ष वर्षा धुर्वे यांनी

भंडारा : दोन वेळा पिण्याचे पाणी देण्याचे आणि भंडारा शहराच्या सर्वांगीण विकासाच्या १९ मुद्यांचे येत्या बुधवारपर्यंत लिखीत उत्तर देण्याचे आश्वासन सत्याग्रह आंदोलनाच्या अनुषंगाने नगराध्यक्ष वर्षा धुर्वे यांनी नगरसेवक हिवराज उके व शिष्टमंडळाला चर्चेदरम्यान दिले.भंडारा नगर परिषदेसमोर नगरसेवक हिवराज उके यांच्या नेतृत्वात शहर सुधार समितीचे अध्यक्ष भैय्याजी साकुरे महाराज, सदानंद इलमे, माणिकराव कुकडकर, आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णा ठवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन वेळा पिण्याचे पाणी, सुजल निर्मल योजना, साफसफाई व घनकचऱ्याचे योग्य नियोजन, विद्युत पुरवठ्याची समस्या, शहर विकास आराखडा, विकास पुस्तिका, रोड, नाला, नाल्या, त्यावर स्लॅब, फेरीवाला धोरण, तलावाचे संरक्षण व सौंदर्यीकरण, चौरस्त्याचा विकास व सौंदर्यीकरण, प्रसाधन गृहे, घाटाचे बांधकाम, घरकुल योजना आदी १९ मागण्यांसाठी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. संबंधित विभागाशी चर्चा करुन बुधवारपर्यंत लिखीत उत्तर देण्याचे अध्यक्षांनी मान्य केले. यावर नगरसेवक हिवराज उके म्हणाले, सर्व १९ मागण्यांचे लिखीत उत्तर न मिळाल्यास व समाधान न झाल्यास १५ दिवसानंतर आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल. शिष्टमंडळाशी चर्चेच्यावेळी धर्मेंद्र साखरकर, प्रदीप पटेल, बोंद्रे, नगरसेवक हिवराज उके, भैय्याजी साकुरे, सदानंद इलमे, झुलनबाई नंदागवळी, ज्ञानेश्वर बोळखे, सुनंदा तईकर, मोहनलाल तईकर, विना नागदेवे, हेमलता वंजारी, माधुरी वाघमारे, गीता नागपूरे, पुष्पा तिघरे, बबलू साकुरे, कृष्णा ठवकर यांची उपस्थिती होती.(वार्ताहर)