शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

विजेच्या नियोजनासाठी सरपंचांची बैठक

By admin | Updated: May 4, 2017 00:32 IST

वाढत्या उन्हामुळे वीजेच्या समस्या वाढू लागल्या आहेत. त्यांना कमी करण्याकरीता व सुरक्षित वीज पुरविण्याकरीता ....

सहकार्य अपेक्षित : वीज विभागाने दिली योजनांची माहितीपालांदूर : वाढत्या उन्हामुळे वीजेच्या समस्या वाढू लागल्या आहेत. त्यांना कमी करण्याकरीता व सुरक्षित वीज पुरविण्याकरीता गावकऱ्यांची अर्थात सरपंचांची भूमिका सकारात्मक असावी. वेळी अवेळी खंडीत वीजेला सुरळित करण्याकरीता लागणाऱ्या विलंबनाला समजून घेत वीज विभागाला सहकार्य करावे, असे उपकार्यकारी अभियंता अमीत शहारे व सहायक अभियंता पंकज आखाडे यांनी सरपंचांना केले. मे हिट सुरू झाल्याने वीजेची मागणी वाढली आहे. पुरवठा कायम असून मागणीत लक्षणीय वाढ झाल्याने यंत्रणेवर ताण वाढला आहे. यामुळे खंडीत वीजेचे प्रमाण वाढून तत्काळ सेवेला विलंब होत असल्याने लाईनमन व ग्राहक यांच्या दुरावा वाढून संबंध बिगडतात, हे होऊ नये वास्तविकता काय असते याची जाणीव करूनच निर्णय घ्यावा, असेही यावेळी सांगण्यात आले.पालांदूर परिसरातील बरेच गावच्या सरपंचांनी वीज विभागच्या निमंत्रणाला साथ देत वीज कार्यालय पालांदुरात हजेरी लावली होती. सरपंचांनी गावातील समस्यांचे निवेदन अभियंत्यांना देत आमच्या समस्या वरिष्ठांना कळविण्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच शुभांगी मदनकर (पालांदूर), गजानन शिवणकर (ढिवरखेडा), हेमंतकुमार सेलोकर (खुनारी) यांनी १६ तासांच्या थ्री फेज कृषीवीज वीजे संबंधाने तक्रार मांडली. यात १६ तासांच्या सलग वीजपुरवठ्याने गावातील सार्वजनिक, वैयक्तीक विहिरी आटल्या. हातपंप यात पाणी नाही, नळयोजनेलाही मुबलक पाणी नाही तसेच सिंगल फेजमुळे विजेच्या दाबाची समस्या आहे.शेतीपेक्षा पिण्याच्या पाण्याला महत्व अधिक देत वीज विभागाने सुद्धा सावधगिरी बाळगावी. सार्वजनिक हिताला जिथे बांधा निर्माण होते अशाठिकाणी वीज पुरवठा करू नये, तसेच गावातनू ५०० मीटरच्या लांबच धानपिकाला वीज द्यावी. सध्या गावाला लागूनच धानपिक घेतले जात असल्याने पाण्याचा उपसा अधिक होत असून गावतलाव, विहिरींनी तळ गाठला आहे. वीज विभागाने कर्मचारी वाढवावे त्यांना ग्राहकांशी बोलण्याची परिभाषा समजावी ताण कितीही वाढला तरी ग्राहक याला जबाबदार नाही याची जाणीव लाईनमनला असावी. गावातील वीजवाहक तार लोंबकळत असतात त्यांना तणाव देवून अपघात टाळण्याला सहकार्य करावे. जीर्ण खांब बदलवावे, वाढीव खांब त्वरीत कार्यान्वीत करावे. कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट असावी, आदी सुचना वीज विभागाला सरपंचानी दिला. विशेष म्हणजे सहायक अभियंता पंकज आखाडे यांनी बोलविलेली सभा प्रेरणादाई व मार्गदर्शक ठरल्याने नियमित बैठका होण्याचे सुद्धा सरपंचानी सांगितले. यावेळी सरपंच पुरूषोत्तम फटे (खराशी), यशवंत कठाणे (गुरठा), जयमाला राघोर्ते (रेंगोळा), जितेंद्र बोरकर (गोंडेगाव), प्रशांत मासुरकर (मांगली) आदी उपस्थितीत होते. (वार्ताहर)पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामीण जीवन ज्योती योजनेअंतर्गत २.६८ कोटीचा निधी मंजुर झाला आहे. लवकरच कामाचा शुभारंभ करण्यात येईल. यामुळे गावातील कमी दाबाचा प्रश्न निकाली निघायला मोठी मदत होईल. गावातील कमी दाबाचा प्रश्न निकाली निघायला मोठी मदत होईल. मे महिन्यात मान्सूनपूर्व देखभाल दुरूस्तीचे कामे युद्धस्तरावर केली जाणार असून यावेळेत खंडीत वीजेचे प्रमाण वाढणार आहे. नवीन जीव कनेक्शन मागणीनुसार टप्पाटप्याने यांत्रिक सामुग्री तपासून घेण्यात येतील. तेव्हा सहकार्याची अपेक्षा अपेक्षित आहे.-अमित शहारे, कार्यकारी अभियंता पालांदूर (लाखनी).