शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

विजेच्या नियोजनासाठी सरपंचांची बैठक

By admin | Updated: May 4, 2017 00:32 IST

वाढत्या उन्हामुळे वीजेच्या समस्या वाढू लागल्या आहेत. त्यांना कमी करण्याकरीता व सुरक्षित वीज पुरविण्याकरीता ....

सहकार्य अपेक्षित : वीज विभागाने दिली योजनांची माहितीपालांदूर : वाढत्या उन्हामुळे वीजेच्या समस्या वाढू लागल्या आहेत. त्यांना कमी करण्याकरीता व सुरक्षित वीज पुरविण्याकरीता गावकऱ्यांची अर्थात सरपंचांची भूमिका सकारात्मक असावी. वेळी अवेळी खंडीत वीजेला सुरळित करण्याकरीता लागणाऱ्या विलंबनाला समजून घेत वीज विभागाला सहकार्य करावे, असे उपकार्यकारी अभियंता अमीत शहारे व सहायक अभियंता पंकज आखाडे यांनी सरपंचांना केले. मे हिट सुरू झाल्याने वीजेची मागणी वाढली आहे. पुरवठा कायम असून मागणीत लक्षणीय वाढ झाल्याने यंत्रणेवर ताण वाढला आहे. यामुळे खंडीत वीजेचे प्रमाण वाढून तत्काळ सेवेला विलंब होत असल्याने लाईनमन व ग्राहक यांच्या दुरावा वाढून संबंध बिगडतात, हे होऊ नये वास्तविकता काय असते याची जाणीव करूनच निर्णय घ्यावा, असेही यावेळी सांगण्यात आले.पालांदूर परिसरातील बरेच गावच्या सरपंचांनी वीज विभागच्या निमंत्रणाला साथ देत वीज कार्यालय पालांदुरात हजेरी लावली होती. सरपंचांनी गावातील समस्यांचे निवेदन अभियंत्यांना देत आमच्या समस्या वरिष्ठांना कळविण्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच शुभांगी मदनकर (पालांदूर), गजानन शिवणकर (ढिवरखेडा), हेमंतकुमार सेलोकर (खुनारी) यांनी १६ तासांच्या थ्री फेज कृषीवीज वीजे संबंधाने तक्रार मांडली. यात १६ तासांच्या सलग वीजपुरवठ्याने गावातील सार्वजनिक, वैयक्तीक विहिरी आटल्या. हातपंप यात पाणी नाही, नळयोजनेलाही मुबलक पाणी नाही तसेच सिंगल फेजमुळे विजेच्या दाबाची समस्या आहे.शेतीपेक्षा पिण्याच्या पाण्याला महत्व अधिक देत वीज विभागाने सुद्धा सावधगिरी बाळगावी. सार्वजनिक हिताला जिथे बांधा निर्माण होते अशाठिकाणी वीज पुरवठा करू नये, तसेच गावातनू ५०० मीटरच्या लांबच धानपिकाला वीज द्यावी. सध्या गावाला लागूनच धानपिक घेतले जात असल्याने पाण्याचा उपसा अधिक होत असून गावतलाव, विहिरींनी तळ गाठला आहे. वीज विभागाने कर्मचारी वाढवावे त्यांना ग्राहकांशी बोलण्याची परिभाषा समजावी ताण कितीही वाढला तरी ग्राहक याला जबाबदार नाही याची जाणीव लाईनमनला असावी. गावातील वीजवाहक तार लोंबकळत असतात त्यांना तणाव देवून अपघात टाळण्याला सहकार्य करावे. जीर्ण खांब बदलवावे, वाढीव खांब त्वरीत कार्यान्वीत करावे. कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट असावी, आदी सुचना वीज विभागाला सरपंचानी दिला. विशेष म्हणजे सहायक अभियंता पंकज आखाडे यांनी बोलविलेली सभा प्रेरणादाई व मार्गदर्शक ठरल्याने नियमित बैठका होण्याचे सुद्धा सरपंचानी सांगितले. यावेळी सरपंच पुरूषोत्तम फटे (खराशी), यशवंत कठाणे (गुरठा), जयमाला राघोर्ते (रेंगोळा), जितेंद्र बोरकर (गोंडेगाव), प्रशांत मासुरकर (मांगली) आदी उपस्थितीत होते. (वार्ताहर)पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामीण जीवन ज्योती योजनेअंतर्गत २.६८ कोटीचा निधी मंजुर झाला आहे. लवकरच कामाचा शुभारंभ करण्यात येईल. यामुळे गावातील कमी दाबाचा प्रश्न निकाली निघायला मोठी मदत होईल. गावातील कमी दाबाचा प्रश्न निकाली निघायला मोठी मदत होईल. मे महिन्यात मान्सूनपूर्व देखभाल दुरूस्तीचे कामे युद्धस्तरावर केली जाणार असून यावेळेत खंडीत वीजेचे प्रमाण वाढणार आहे. नवीन जीव कनेक्शन मागणीनुसार टप्पाटप्याने यांत्रिक सामुग्री तपासून घेण्यात येतील. तेव्हा सहकार्याची अपेक्षा अपेक्षित आहे.-अमित शहारे, कार्यकारी अभियंता पालांदूर (लाखनी).