शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीची भूमेश्वरी गहाणे जिल्ह्यात अव्वल

By admin | Updated: May 26, 2016 01:30 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता आॅनलाईनद्वारे बारावीचा निकाल घोषित केला.

निकाल ८८.३५ टक्के : लाखनी आघाडीवर तर लाखांदूर पिछाडीवरभंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी १ वाजता आॅनलाईनद्वारे बारावीचा निकाल घोषित केला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८८.३५ टक्के इतका लागला. साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयाची भूमेश्वरी केशव गहाणे ही विद्यार्थिनी ९२.३० टक्के (६०० गुण) घेऊन जिल्ह्यातून प्रथम आली आहे. यावर्षीच्याही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी केतकी संजय पदवाड आणि जे.एम. पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी राज रोशन कटकवार यांनी ९१.८४ टक्के (५९७ गुण) घेऊन जिल्ह्यातून संयुक्तपणे द्वितीय आले आहे. लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची रक्षंदा कोल्हेकर हिला ९१.६५ टक्के (५९६ गुण) घेऊन तृतीय आली आहे. बारावीच्या निकालात भंडारा जिल्हा नागपूर विभागात दुसऱ्या स्थानावर आहे. यावर्षीही मुलींनी बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.३१ इतकी असून मुलांची टक्केवारी ८५.८६ इतकी आहे. जे.एम. पटेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी सरगम चंद्रकांत ठाकरे हिला ९१.५३ टक्के, नूतन कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या रमेश गहेरवार हिला ९०.९२ टक्के (५९१ गुण) प्राप्त केले. बुधवारला दुपारपर्यंत नूतन कन्या विद्यालयाची केतकी पदवाड व जे.एम. पटेल महाविद्यालयाचा राज कटकवार हे दोघे संयुक्तपणे अव्वल असल्याचे वाटत असतानाच सायंकाळी साकोलीची भुमेश्वरी गहाणे या विद्यार्थिनी अव्वल असल्याचे माहिती मिळाली. त्यानंतर भूमेश्वरीशी संपर्क साधला असता तिने वैद्यकीय शाखेत करीअर करायचे असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)श्रेणीनिहाय निकालयावर्षी जिल्ह्यातून १६ हजार १७८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १६ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १४ हजार २८८ विद्यार्थी ऊतीर्ण झाले. विद्यार्थ्यांमध्ये ६ हजार ६६९ मुले तर ७ हजार ६१९ मुलींचा समावेश आहे. यात ५३२ विद्यार्थी प्राविण्यप्राप्त ठरले. ३,९०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ९,१८४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ६६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.शाखानिहाय निकालजिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९५.९६ टक्के, कला शाखेचा निकाल ८१.५० टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९३.७३ टक्के तर एमसीव्हीसी शाखेचा निकाल ८९.७१ टक्के लागला आहे. शाखानिहाय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेचे ६,२९१ विद्यार्थी, कला शाखेचे ६,६२९ विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे ८९७ तर एमसीव्हीसी शाखेचे ४७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लाखनी तालुका अव्वलभंडारा जिल्ह्याचा निकाल ८८.३५ टक्के लागला असून जिल्ह्यातील सातही तालुक्यातून लाखनी तालुका विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत आघाडीवर आहे. लाखांदूर तालुक्याचा निकाल पिछाडीवर आहे. यात लाखनीची टक्केवारी ९३.०७, भंडारा ८९.५९, पवनी ८८.७२, साकोली ९२.२१, तुमसर ९०.३२, मोहाडी ७९.९१ तर लाखांदूर तालुक्याची टक्केवारी ७९.१९ इतकी आहे. सातही तालुक्यातून मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८५.७३ असून मुलींची टक्केवारी ९०.७८ आहे. तालुकानिहाय ऊत्तीर्ण विद्यार्थी१४ हजार २८८ उतीर्ण विद्यार्थ्यांमध्ये भंडारा तालुक्यातून ४,३०२ पैकी ३,८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लाखांदूर तालुक्यातून १,२५९ पैकी ९९७ विद्यार्थी, लाखनी तालुक्यातून २,०५० पैकी १,९०८ विद्यार्थी, मोहाडी तालुक्यातून २,०२१ पैकी १,६१५ विद्यार्थी, पवनी तालुक्यातून १,९५१ पैकी १,७३१ विद्यार्थी, साकोली तालुक्यातून २,०१६ पैकी १,८५९ विद्यार्थी, तुमसर तालुक्यातून २,५७३ पैकी २,३२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात सात शाळा १०० टक्केयंदाच्या १२ वी परीक्षेत जिल्ह्यातील सात शाळांनी निकालाच्या टक्केवारीत शंभरी गाठली आहे. यात भंडारा तालुक्यातून २, लाखनी २ तर मोहाडी, पवनी व तुमसर येथील एका शाळेचा समावेश आहे.