शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

सारडा विद्यालयाचा विज्योत सिल्लारे जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2022 05:00 IST

सावित्रीदेवी शिवनारायण सारडा महिला समाज विद्यालयाने यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली असून या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. दहावीतून जिल्ह्यात अव्वल ठरलेल्या विज्योतला अभियंता व्हायचे आहे. बारावीनंतर त्याला एरोनॉरटिकल किंवा मरीन इंजिनियरिंगमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्यादृष्टीने त्याने अभ्यासालाही सुरुवात केली आहे. त्याचे वडील गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात तर आई भंडारा येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दहावीच्या परीक्षेत येथील सावित्रीदेवी शिवनारायण सारडा महिला समाज विद्यालयाचा विद्यार्थी विज्योत विजय सिल्लारे हा जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. त्याला बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८१ गुण मिळाले मिळाले आहे. तर प्राईड कॉन्व्हेंटची अमिषा प्रमोद बेदपुरीया आणि मोहाडी येथील अनिमेश कैलास गभने बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८० गुण घेवून जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. सावित्रीदेवी शिवनारायण सारडा महिला समाज विद्यालयाने यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली असून या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. दहावीतून जिल्ह्यात अव्वल ठरलेल्या विज्योतला अभियंता व्हायचे आहे. बारावीनंतर त्याला एरोनॉरटिकल किंवा मरीन इंजिनियरिंगमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्यादृष्टीने त्याने अभ्यासालाही सुरुवात केली आहे. त्याचे वडील गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात तर आई भंडारा येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. शिक्षणाचा वसा त्याला घरातूनच लाभला आहे. खासगी शिकवणीसोबतच त्याला मुख्याध्यापिका वैशाली धारस्कर यांच्यासह शिक्षकांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्या अध्यक्ष डॉ. विशाखा गुप्ते, सचिव नूतन मोघे यांनी त्याचे कौतुक केले. भंडारा येथील प्राईड कॉन्व्हेंटची विद्यार्थीनी अमिषा प्रमोद बेदपुरीया जिल्ह्यात द्वितीय आली आहे. तिला बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८० गुण मिळाले आहे. आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका प्रियंका रिनके यांना देत आहे. संस्थेचे संस्थापक राजेश काटगरे यांनी त्याचे कौतुक केले आहे. तर मोहाडी येथील सुदामा विद्यालयाचा विद्यार्थी अनिमेश कैलास गभने याला बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ४८० गुण मिळाले आहे. त्याचे वडील शेतकरी असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने घवघवीत यश मिळविल्याने कौतुक होत आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. शाळांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांचा सत्कार करण्यात    आला. 

 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल