शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जलयुक्त शिवार अभियान गावासाठी संजीवनी

By admin | Updated: May 4, 2015 00:41 IST

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील तलावाचे खोलीकरण करून गाळ उपसा करण्यात येईल.

सिरसी येथे उद्घाटन सोहळा : वंदना वंजारी यांचे प्रतिपादन वरठी : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील तलावाचे खोलीकरण करून गाळ उपसा करण्यात येईल. यामुळे तलावात पाणी साठवून राहील. गाळ उपसादरम्यान निघणारी माती रस्ते व शेतात उपयोगी येईल. गावाची पाण्याची पातळी वाढेल. शेतीकरिता पाणी उपलब्ध होईल. गावातील मजुरांना काम मिळेल. तलावात मासे उत्पादन केल्यास ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढेल. गुराढोरांना उन्हाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध होऊन बारमाही पाणी टंचाई भासणार नाही. जलयुक्त शिवार अभियान हे गावासाठी संजीवनी ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी यांनी केले.जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले. उद्घाटन आमदार रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, सभापती अरविंद भालाधरे, सरपंच संजय वासनिक, उपसरपंच रविंद्र वंजारी, सदस्य सुमित्रा सोनटक्के, तारा वाघमारे, दुगा मदनकर उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत शासनाचे उद्देश व धोरण समजावून सांगितले. यावेळी असर फाउंडेशन विक्रम फडके, वैभव कोलते यांच्या चमूने जनजागरण पथनाट्य सादर केले. संचालन संतोष कारोमोरे, प्रस्ताविक संजय वासनिक व आभार ग्रामसेवक धुर्वे यांनी मानले. कार्यक्रमात शाखा अभियंता एकापुरे, बोरकर, शोभा बारई, कुंडलीक मदनकर, लिला मदनकर, हलमारे, मस्के व उषा वाघमारे उपस्थित होते. (वार्ताहर)पाणी हे निसर्गाचे अमुल्य देणं आहे. पण निसर्गाचा हा अमुल्य ठेवा मानवी प्रवृत्तीमुळे कमी होत आहे. जमिनीच्या पोटातून उपसा होणारे पाणी जमिनीत जीरत नाही. असेच सुरु राहिले तर एक दिवस सभोवताल पाण्यासाठी घरांघरात, गावांगावात युद्ध होईल. पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम सुरु करण्यासह पाण्याचा दुरुपयोग करू नका.अ‍ॅड.रामचंद्र अवसरे आमदार, भंडारा विधानसभा क्षेत्र