शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

संजय गांधी निराधार समिती झाली "निराधार"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:40 IST

तुमसर: निराधारांना आधार देण्याकरिता शासनाने संजय गांधी निराधार समिती गठित केली आहे. परंतु गत दोन वर्षापासून या समितीचे गठन ...

तुमसर: निराधारांना आधार देण्याकरिता शासनाने संजय गांधी निराधार समिती गठित केली आहे. परंतु गत दोन वर्षापासून या समितीचे गठन करण्यात आले नाही. त्यामुळे शासनाने तात्पुरता अधिकार तहसीलदार, बीडीओ व पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. मात्र त्यानंतरही तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेची ५०० प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सुमारे दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. मात्र शासनाने तालुकास्तरीय संजय गांधी निराधार समिती गठित केली नाही. त्यामुळे निराधार योजनेची प्रकरणे प्रलंबित आहेत. लाभार्थ्यांची फरफट होऊ नये म्हणून शासनाने संजय गांधी निराधार समितीची प्रकरणे मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदार, गटविकास अधिकारी, पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले. त्या अनुषंगाने तिन्ही अधिकारी सोपस्कार पार पाडत आहेत. परंतु लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने त्यात वेळ लागत आहे. संजय गांधी निराधार प्रकरण दाखल करण्यासाठी लाभार्थ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. त्यानंतर प्रकरण सादर केल्यानंतर अर्जांची छाननी होते. त्रुटी असल्या तर त्या दूर केल्या जातात. त्यानंतर अंतिम यादी तयार केले जाते. त्यानंतर हे सर्व प्रकरण समितीपुढे येते. समितीने अंतिम स्वाक्षरी केल्यानंतरच प्रकरण मंजूर झाल्याचे समजण्यात येते.

समितीची नियुक्ती होईल अशी आशा महाविकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांना होती. परंतु त्यावर पाणी फेरले गेले. अद्यापही अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली नाही. त्यामुळे शासनानेच त्या तिन्ही अधिकाऱ्यांना येथे अधिकार दिल्याची माहिती आहे.

बॉक्स

नायब तहसीलदारांची नियुक्ती नाही

संपूर्ण राज्यात संजय गांधी निराधार समितीसाठी स्वतंत्र नायब तहसीलदाराची नियुक्ती करण्यात आली. आहे परंतु भंडारा जिल्ह्यात संजय गांधी निराधार समितीसाठी स्वतंत्र नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली नाही. इतर नायब तहसीलदारांना संजय गांधी निराधार समितीचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे नायब तहसीलदारांना इतर कामासोबतच निराधार समितीचे काम पाहावे लागते. त्यामुळे प्रकरण मंजुरीसाठी बराच वेळ लागतो. शासनाने समितीसाठी स्वतंत्र नायब तहसीलदारांची नियुक्ती करण्याची गरज आहे.