शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

आॅटोचालक संजय मृत्यूनंतर ठरला ‘दृष्टिदाता’

By admin | Updated: May 16, 2017 00:25 IST

नेत्रदान हे फार मोठे सामाजिक कार्य आहे. एका माणसाने नेत्रदान केले तर दोन आंधळ्या माणसांना दृष्टी मिळू शकते.

कुटुंबांनी केले नेत्रदान : अल्पशा आजाराने मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नेत्रदान हे फार मोठे सामाजिक कार्य आहे. एका माणसाने नेत्रदान केले तर दोन आंधळ्या माणसांना दृष्टी मिळू शकते. भारतामध्ये अंदाजे कोट्यवधी माणसे आंधळी आहेत. पैकी ६० टक्के बारा वषार्खालील मुले आहेत. रोज हजारो माणसे कोणत्या ना कोणत्या कारणाने मरतात. पण त्यापैकी फक्त काहीजण नेत्रदान करतात. अशाच एका आॅटोचालकाच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी नेत्रदान करून त्यांना नेत्ररूपी जिवंत ठेवले आहे.संजय श्रीराम बांते असे मृत आॅटो चालकाचे नाव आहे. भंडारा शहरातील शितला माता मंदिरजवळील बजरंग चौकात राहणारे व्यवसायाने आॅटोचालक होते. त्यांचा पत्नी आशा व १२ वर्षाची श्रेया व १० वर्षाची रिया असा संसार होता. शहरातील प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी ने-आण करणाऱ्या संजयने व्यवसायातून अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. कुटुंबाचा गाडा सुरूळीत सुरू असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. अल्पआजारात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे हातावर आणुन पानावर खाणाऱ्या कुटुंबासमोर मोठे संकट उभे ठाकले. संजयच्या आकस्मिक मृत्यूने पत्नी व मुलींनी हंबरडा फोडला. धकाधकीचे जीवन जगणाऱ्या बांते कुटुंबावर तर आभाळ कोसळले. या दु:खातून सावरण्यासाठी पत्नीला आप्तस्वकीयांनी त्यांना धीर दिला. संजय अचानक सर्वांना सोडून निघून गेल्याने तो नेत्ररूपी जीवंत रहावा व त्याच्या डोळ्यांनी अंधत्व आलेल्यांना जग बघता यावे, यासाठी कुटुंबीयांनी संजयचे नेत्रदान करण्याचा संकल्प केला. त्यानुसार नेत्रपेढीशी संपर्क साधून संजयची नेत्रदान प्रक्रिया पार पाडली. वेगवेगळ्या कारणांमुळे अंधत्व येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मधुमेह हे त्यातील एक प्रमुख कारण आहे. या पाश्वभूमीवर नेत्रदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शहारत वर्षाला हजारोंचा मृत्यू होतो. मात्र, त्यात बोटावर मोजण्याइतक्याच व्यक्तींचे नेत्रदान होते. अशास्थितीत आॅटोचालक म्हणून प्रवाशांसाठी दिवसरात्र एक करून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या संजयच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबांनी घेतलेला नेत्रदानाचा पुढाकार सर्वांसमोर आदर्शवत ठरला आहे.अर्ज भरला नसला तरी नेत्रदानमरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला असेल तरच नेत्रदान करता येते आणि तसा अर्ज भरला नसेल तर नेत्रदान करता येत नाही, असा एक मोठा गैरसमज लोकांमध्ये पसरला असल्याकडेही ते लक्ष वेधतात. खरे तर तसे काहीही नाही. एखाद्या व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला नसला तरीही त्याच्या मृत्यूनंतर जवळच्या नातेवाईकांनी ठरविले तर ते जवळच्या नेत्रपेढीला नुसता एक दूरध्वनी करून मृत व्यक्तीचे नेत्रदान करू शकतात.