शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात पाण्याचा उपसा थांबणार!

By admin | Updated: June 9, 2014 23:27 IST

सिहोरा परिसरातील बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात सध्यास्थित ठिकठाक नसतानाही संबंधित विभागाने उपाययोजना करण्यास अद्याप गती दिली नाही.

रंजित चिंचखेडे - चुल्हाड सिहोरा परिसरातील बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात सध्यास्थित ठिकठाक नसतानाही संबंधित विभागाने उपाययोजना करण्यास अद्याप गती दिली नाही. यामुळे यंदा पाण्याचा उपसा थांबणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे पाण्याअभावी ११ हजार हेक्टर जागेतील धान उत्पादन प्रभावित होणार आहे.सिहोरा परिसरात शेतकर्‍यांना सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. ६0 कोटी खर्चून साकारण्यात आलेला हा प्रकल्प पाण्याचा उपसा विस्तीर्ण चांदपूर जलाशयात करीत आहे. या जलाशयात पाण्याची साठवणूक पावसाळ्यात करण्यात येत असल्याने, याच कालावधीत प्रकल्प सुरू ठेवण्यात येत आहे. दरम्यान या प्रकल्पात सध्यास्थित अच्छे दिन नसल्याने येत्या काही दिवसात नवा संकट निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला कवलेवाडा येथून वीज पुरवठा करण्यात येत आहे. हा पुरवठा आजही सुरू आहे. परंतु प्रकल्प स्थळात ठिक ठाक नाही. पंप गृहाला विज पुरवठा करणार्‍या ५५ बॅटरी नादुरूस्त आहेत. अनेक बॅटरी भंगारात निघाल्या असल्याने विज पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. प्रती बॅटरी २00 वॅटची असून ११ हजार वॅट विज पुरवठा अडचणीत येणार आहे.पंपगृह सुरू करण्यासाठी या बॅटरी महत्वपूर्ण आहेत. परंतु सध्या स्थित या बॅटरी दुरूस्त करण्यासाठी उपसा सिंचन विभागामार्फत उपाययोजना करण्यास सुरूवात करण्यात आली नाही. या प्रकल्प स्थळात विजेचे बोर्ड जळून खाक झाली आहे. संपूर्ण प्रकल्प स्थळात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कोट्यवधीची योजना अंधारात असल्याने योजनाच गुंडाळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकल्प स्थळात पंपगृह आहे. या पंपगृहापैकी ५ पंपगृह बंद आहे. चार पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. सुरू असलेले पंपगृह नादुरूस्त असल्याने हे शेवटच्या घटका मोजत आहेत.या पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यासाठी नदी पात्रात टाकी तयार करण्यात आली आहे. या टाकीला सम असे नाव आहे. पावसाळ्यात या टाकीत साठवणुक होणारे पाणी उपसा करण्यात येत आहे. परंतु टाकीत रेती आणि मातीमिश्रीत गाळ तयार झाली आहे. पाण्याच्या प्रवाहाने ही गाळ टाकीत असल्याने पंपगृह पाण्याचा उपसा करताना दम टाकत आहेत. पाण्याच्या प्रवाहात ही गाळ उपसा होत असून उपकरणावर मोठे संकट निर्माण झाले आहे. या टाकीत गाळ काढण्याची प्रक्रिया वार्षिक नियोजन बद्ध आहे. दरवर्षी गाळ काढण्याचा कृती आराखडा आहे. परंतु गेल्या तीन-चार वर्षापासून टाकीतील गाळ काढण्यात आली नाही. यामुळे यंत्रणात धाकधुकी सुरू झाली आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात यंदा बेजबाबदारपणा असल्याने पाण्याचा उपसा होणार किंवा नाही, असा सवाल आहे. दरम्यान या प्रकल्पाला गेल्या वर्षभरापासून वरिष्ठ अधिकारी भेट देत आहे.प्रकल्पस्थळात उणिवा असल्याची नोंद करीत आहेत. परंतु या उणिवा भरून काढण्यासाठी उपाययोजना होत नाही. दरम्यान पंपगृहात पाण्याचा उपसा सुरू असताना संकट टाळण्यासाठी टँकर तयार करण्यात आली आहेत. पंपगृह अचानक बंद पडल्यास योजनेला आधार देत आहे. संकुलातून मार्ग काढणारी योजना बंद पडली आहेत. यामुळे संकटातच प्रकल्प आणि कार्यरत यंत्रणा आली आहे. दरम्यान नदी पात्रातून पाण्याचा उपसा करण्यास तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. या कालवधीपर्यंत उपसा सिंचन प्रकल्पात असलेल्या समस्या निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती सुत्रानी दिली आहे. परंतु निधीअभावी हे संकट वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पात बिघाड असल्याच्या चर्चेने सिहोरा परिसरातील शेतकर्‍यांचे चेहरे हिरमुसले आहे. येत्या खरीप हंगामात नवे संकट येणार असल्याची चर्चा आहे.