शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात पाण्याचा उपसा थांबणार!

By admin | Updated: June 9, 2014 23:27 IST

सिहोरा परिसरातील बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात सध्यास्थित ठिकठाक नसतानाही संबंधित विभागाने उपाययोजना करण्यास अद्याप गती दिली नाही.

रंजित चिंचखेडे - चुल्हाड सिहोरा परिसरातील बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात सध्यास्थित ठिकठाक नसतानाही संबंधित विभागाने उपाययोजना करण्यास अद्याप गती दिली नाही. यामुळे यंदा पाण्याचा उपसा थांबणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे पाण्याअभावी ११ हजार हेक्टर जागेतील धान उत्पादन प्रभावित होणार आहे.सिहोरा परिसरात शेतकर्‍यांना सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. ६0 कोटी खर्चून साकारण्यात आलेला हा प्रकल्प पाण्याचा उपसा विस्तीर्ण चांदपूर जलाशयात करीत आहे. या जलाशयात पाण्याची साठवणूक पावसाळ्यात करण्यात येत असल्याने, याच कालावधीत प्रकल्प सुरू ठेवण्यात येत आहे. दरम्यान या प्रकल्पात सध्यास्थित अच्छे दिन नसल्याने येत्या काही दिवसात नवा संकट निर्माण होणार आहे. या प्रकल्पाला कवलेवाडा येथून वीज पुरवठा करण्यात येत आहे. हा पुरवठा आजही सुरू आहे. परंतु प्रकल्प स्थळात ठिक ठाक नाही. पंप गृहाला विज पुरवठा करणार्‍या ५५ बॅटरी नादुरूस्त आहेत. अनेक बॅटरी भंगारात निघाल्या असल्याने विज पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. प्रती बॅटरी २00 वॅटची असून ११ हजार वॅट विज पुरवठा अडचणीत येणार आहे.पंपगृह सुरू करण्यासाठी या बॅटरी महत्वपूर्ण आहेत. परंतु सध्या स्थित या बॅटरी दुरूस्त करण्यासाठी उपसा सिंचन विभागामार्फत उपाययोजना करण्यास सुरूवात करण्यात आली नाही. या प्रकल्प स्थळात विजेचे बोर्ड जळून खाक झाली आहे. संपूर्ण प्रकल्प स्थळात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कोट्यवधीची योजना अंधारात असल्याने योजनाच गुंडाळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकल्प स्थळात पंपगृह आहे. या पंपगृहापैकी ५ पंपगृह बंद आहे. चार पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. सुरू असलेले पंपगृह नादुरूस्त असल्याने हे शेवटच्या घटका मोजत आहेत.या पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यासाठी नदी पात्रात टाकी तयार करण्यात आली आहे. या टाकीला सम असे नाव आहे. पावसाळ्यात या टाकीत साठवणुक होणारे पाणी उपसा करण्यात येत आहे. परंतु टाकीत रेती आणि मातीमिश्रीत गाळ तयार झाली आहे. पाण्याच्या प्रवाहाने ही गाळ टाकीत असल्याने पंपगृह पाण्याचा उपसा करताना दम टाकत आहेत. पाण्याच्या प्रवाहात ही गाळ उपसा होत असून उपकरणावर मोठे संकट निर्माण झाले आहे. या टाकीत गाळ काढण्याची प्रक्रिया वार्षिक नियोजन बद्ध आहे. दरवर्षी गाळ काढण्याचा कृती आराखडा आहे. परंतु गेल्या तीन-चार वर्षापासून टाकीतील गाळ काढण्यात आली नाही. यामुळे यंत्रणात धाकधुकी सुरू झाली आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात यंदा बेजबाबदारपणा असल्याने पाण्याचा उपसा होणार किंवा नाही, असा सवाल आहे. दरम्यान या प्रकल्पाला गेल्या वर्षभरापासून वरिष्ठ अधिकारी भेट देत आहे.प्रकल्पस्थळात उणिवा असल्याची नोंद करीत आहेत. परंतु या उणिवा भरून काढण्यासाठी उपाययोजना होत नाही. दरम्यान पंपगृहात पाण्याचा उपसा सुरू असताना संकट टाळण्यासाठी टँकर तयार करण्यात आली आहेत. पंपगृह अचानक बंद पडल्यास योजनेला आधार देत आहे. संकुलातून मार्ग काढणारी योजना बंद पडली आहेत. यामुळे संकटातच प्रकल्प आणि कार्यरत यंत्रणा आली आहे. दरम्यान नदी पात्रातून पाण्याचा उपसा करण्यास तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. या कालवधीपर्यंत उपसा सिंचन प्रकल्पात असलेल्या समस्या निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती सुत्रानी दिली आहे. परंतु निधीअभावी हे संकट वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पात बिघाड असल्याच्या चर्चेने सिहोरा परिसरातील शेतकर्‍यांचे चेहरे हिरमुसले आहे. येत्या खरीप हंगामात नवे संकट येणार असल्याची चर्चा आहे.