शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडीची रेती रेल्वेने जात आहे परप्रांतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:24 IST

महाराष्ट्र शासनाने अजूनपर्यंत बावांथाडी नदीवरील घाट लिलाव केले नाहीत. त्यामुळे परप्रांतीयांचे फावत आहे. मध्यप्रदेश शासनाने बावनथडी नदीवरील अनेक ...

महाराष्ट्र शासनाने अजूनपर्यंत बावांथाडी नदीवरील घाट लिलाव केले नाहीत. त्यामुळे परप्रांतीयांचे फावत आहे. मध्यप्रदेश शासनाने बावनथडी नदीवरील अनेक घाट लिलाव केले आहेत. यात उत्तर प्रदेशातील रेती कंत्राटदाराने घाट घेतले आहेत. बालाघाट जिल्हा प्रशासनाने रेती घाट लिलाव प्रक्रिया राबविली. उत्तर प्रदेशातील एका मोठ्या कंपनीने हे रेती घाट घेतले आहेत. सुकली येथील रेल्वेस्थानकावर रॅक पॉइंट तयार केले आहेत. येथून रेती निर्यात केली जात असल्याची माहिती आहे. रेतीच्या सुरक्षेकरिता खाजगी सुरक्षा गार्ड सदर कंत्राटदाराने नेमले आहेत. परप्रांतात रेती निर्यात करता येते का, हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. बावनथडी नदीवर राज्याचा हक्क :

महाराष्ट्र, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती नदीने निश्चित केले आहे. अर्ध्या नदीवर मध्यप्रदेशाचा, तर अजून अर्ध्या नदीवर महाराष्ट्राचा हक्क आहे. मध्यप्रदेशातील कंत्राटदार राज्याच्या सीमेतून रेतीचे उत्खनन करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्याचे मोठा महसूल बुडत आहे. येथे जिल्हा प्रशासनाने चौकशी करण्याची गरज आहे. बावनथडी नदीतून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत असल्याने भावात थोडी नदीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. रेती उत्खननाचे नियम येथे पायदळी तुडवले जात असल्याची माहिती आहे. नदीमध्ये मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे नदीचा प्रवाह महाराष्ट्राच्या सीमेकडे येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

जलसंकटाची भीती :

बावनथडी नदीवर अनेक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. यात तुमसर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा समावेश असून, मध्यप्रदेशातील तिरोडी व कटंगी येथील पाणीपुरवठा योजना आहेत. नदीपात्रातून बेसुमार रेतीचा उपसा केल्यामुळे नदीमध्ये पाणी न राहण्याची भीती निर्माण झाली आहे. उन्हाळ्यामध्ये पाणीपुरवठा योजना बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

जिल्हा प्रशासन लक्ष देणार का? :

बावनथडी नदी ही दोन्ही राज्यांची जीवनदायिनी आहे. नियमानुसार रेती घाट मध्यप्रदेश शासनाने केले आहेत; परंतु महाराष्ट्राच्या हद्दीतून रेती उपसा होत असल्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेण्याची गरज आहे महसुलीच्या नुकसानाबरोबरच पर्यावरणाच्या मोठा धोका निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे विशेष चौकशी पथक नेमून कारवाई करण्याची गरज आहे.

रेती निर्यातीचे धोरण :

भंडारा जिल्ह्यातील घाटातून मोठ्या प्रमाणावर ट्रक व टिप्परने रेती वाहतूक केली जाते; परंतु प्रथमच रेल्वेने रेती वाहतूक होत असल्याने हा पहिलाच प्रकार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे. परप्रांतात रेती वाहतूक करता येते काय, याबाबतही शंका उपस्थित होत आहे. मध्यप्रदेशातील सुकळी येथील पॉइंटवर असलेला रेतीसाठा रेल्वेने जात असल्यास त्याची दखल घेण्याची गरज आहे.