शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

अज्याचा जवानांना सलाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 07:15 IST

नऊ-दहा महिन्याचं आर्मी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर  देशसेवेची शप्पथ घेतात आणि खऱ्या अर्थानं फौजी बनतात. हा शप्पथ घेण्याचा अभूतपूर्व सोहळा ‘कसम परेड’ या नावानं ओळखला जातो.

‘लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या  मालिकेने गेल्या वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असे व्यक्तीरेखा म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून  ते फौजी बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. नऊ - दहा महिन्याचं आर्मी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर  देशसेवेची शप्पथ घेतात आणि खऱ्या अर्थानं फौजी बनतात. हा शप्पथ घेण्याचा अभूतपूर्व सोहळा ‘कसम परेड’ या नावानं ओळखला जातो. हा सोहळा फक्त फौजींच्या कुटुंबीयांनाच अनुभवायला मिळतो. पण 'लागीर झालं जी' या मालिकेमुळे प्रेक्षकांना हा कसम परेडचा सोहळा पाहायला मिळाला.

स्वतंत्र दिनाच्या निमित्त नितीशने त्याच्या फौजी साकारण्याचा अनुभव आणि त्याच्या जवानांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. नितीश म्हणाला, "मी ट्रेनिंगसाठी बेळगावला गेलेलो.तिथे मी ३ दिवसाचं ट्रेनिंग घेतला.पहिल्या दिवशी ऑब्स्टॅकल्स, दुसरा दिवशी कसम परेड आणि तिसरा दिवस वॉर सिक्वेन्ससाठी गेला. ऑब्स्टॅकल्सच ट्रेनिंग हे खूप ऍडव्हान्स आणि अवघड असतं ते शिकायला ६ महिने लागतात. ते मी एका दिवसात पूर्ण केलं आणि ते ओरिजनल रायफल घेऊन करायचं असतं. ते करताना रायफल माझ्या डोक्याला लागली आणि त्यामुळे मला चक्कर आली.सगळे बोलत होते कि आपण थोडा वेळ थांबून मग ट्रेनिंग पूर्ण करूया पण ते ट्रेनिंग करताना माझ्यात खूप जिद्द आली आणि त्यामुळे ते ट्रेनिंग मी सलग पूर्ण केलं. 

तसंच कसम परेडचं ट्रेनिंग घेताना देखील तिथल्या कॅप्टन्सनी मला शाबासकी दिली. तिसऱ्या दिवशी मी फायरिंग केली. वॉर सिच्युएशन असताना कसं क्रॉउलिंग करून डोंगराच्या आड राहून फायरिंग करणं याच सर्व ट्रेनिंग तिसऱ्या दिवशी झालं. हे ट्रेनिंग झाल्यावर ब्रिगेडीअन सर्व मुलांना मेडल देतात.या ट्रेनिंगमध्ये मी इतका समरस होऊन गेलेलो कि त्या ब्रिगेडीअन्सना खरंच नव्हतं वाटत कि मी एक अभिनेता आहे आणि हे सर्व मी मालिकेसाठी करतोय. मी या मालिकेत एका जवानाचं आयुष्य जगतोय आणि ते प्रेक्षकांसमोर सादर करतोय पण त्यांचं आयुष्य हे खरंच खडतर असतं. नुकतंच मालिकेत विक्रम शाहिद झाला आणि त्यामुळे एक जवान शाहिद झाल्यावर त्याच्या परिवारावर काय परिस्थिती ओढवते हे मी खूप जवळून पाहिलंय आणि अनुभवलं. त्यामुळे माझ्या मनात जवानांबद्दल असीम आदर आहे. ते सीमेवर दिवसरात्र लढतात म्हणून आपण इकडे सुखाने जगू शकतो. ते स्वतःच परिवार मागे ठेवून तिकडे स्वतःच्या प्राणाची बळी देतात, त्यामुळे त्यांच्या कुटुंबांची ताकद आपण बनलं पाहिजे.”

 

टॅग्स :Lagir Jhala Jiलागिरं झालं जी