शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

भंगारासाठी विकल्या सलाईनच्या बॉटल्स

By admin | Updated: December 11, 2015 00:55 IST

एक्सपायरी असतानाही सलाईन बॉटल्स चिरा मारून ती नष्ट केल्यानंतर उरलेला कबाड भंगारात विकायला नेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला ग्रामस्थांनी रंगेहात पकडले.

सावरला आरोग्य केंद्रातील प्रकार : नागरिक धडकले केंद्रावरपवनी : एक्सपायरी असतानाही सलाईन बॉटल्स चिरा मारून ती नष्ट केल्यानंतर उरलेला कबाड भंगारात विकायला नेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला ग्रामस्थांनी रंगेहात पकडले. विषयाचे गांभीर्य ओळखून सरतेशेवटी जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डोईफोडे यांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांना दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. ही घटना काल बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास सावरला प्राथमिक आरोग्य केंद्रात उघडकीला आली.प्राथमिक आरोग्य केंद्र सावरला येथील परिचर मनोहर बन्सोड हे सलाईनच्या चिरा मारलेल्या १२६ बॉटल्स भंगार विक्रेत्याला विकतांनी ग्रामस्थांनी रंगेहात पकडले. सदर बॉटल्स दवाखान्याच्या आवारात फेकलेल्या स्थितीत मिळाल्याने ते विक्री केल्याचे कबुलही केले. या प्रकरणाची माहिती ग्रामस्थांना होताच सरपंच उत्तम सावरबांधे, उपसरपंच मुरलीधर थेरे, पोलीस पाटील रविंद्र जिभकाटे, पंचायत समिती सदस्य बंडूजी ठेंगरे, जि.प. सदस्य मनोरथा जांभुळे यांच्या नेतृत्वात आज गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास रुग्णांसाठी देण्यात आलेल्या औषधी साठा मुदत असतानाही नष्ट करण्यात आला, याचा जाब विचारण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात धडकले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना पाचारण केले होते. शेकडो नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात धडकल्याने दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी विकास मेश्राम यांना बोलाविले. जोपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी घटनास्थळी येत नाही व दोषींवर कारवाई करीत नाहीत तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. दुपारच्या सुमारास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डोईफोडे सावरला येथे उपस्थित झाले व ग्रामस्थांची चर्चा करीत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यात प्राथमिक तपासात औषधी निर्माता देवगडे यांच्या ताब्यात असलेल्या व रुग्णांकरिता वापरात न आलेल्या १२६ सलाईन बॉटल ब्लेडने चिरा मारलेल्या निव्वळ ३० रुपयात विकण्याचे प्रकरण घडल्याची कबुली दिली. यात मुदत न संपलेल्या सलाईनच्या बॉटल्सचा समावेश होता. याची मुदत जानेवारी २०१६ पर्यंत होती. सदर सलाईन बॉटल्सची मुदत संपत येत असल्याने त्याची विल्हेवाट लावण्यात व साठा जास्त असल्यामुळे ते नष्ट केल्याचे स्पष्ट करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)