शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

सहा कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश

By admin | Updated: June 21, 2017 00:23 IST

खरीपाचा हंगाम सुरु झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बि बियाणे खरेदीसाठी लगबग सुरु झालेली आहे.

भरारी पथकाची कारवाई : बियाणे विक्रीत आढळली अनियमिततालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीपाचा हंगाम सुरु झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बि बियाणे खरेदीसाठी लगबग सुरु झालेली आहे. या संधीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना कमी दर्जाचे बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार कृषी केंद्र संचालकांकडून होत असतो. त्यामुळे भरारी पथकाने कृषी केंद्राची तपासणी केली असता सहा केंद्रांमध्ये अनियमितता आढळून आल्याने त्यांना विक्रीबंदचे आदेश बजावले आहे.भंडारा येथील मे श्री साई कृषी केंद्र, बोरगाव येथील मे राधाकृषी केंद्र, बारव्हा येथील लोथे कृषी केंद्र, बारव्हा येथील कृषी साधना कृषी केंद्र, दिघोरी मोठी येथील श्रीराम कृषी केंद्र व लाखांदूर येथील पुर्ती कृषी केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली आहे. कृषी हंगामात मागील वर्षी वर्धा जिल्ह्यातील यशोदा या सिड्स कंपनीने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली होती. उपवन क्षमता नसलेले बियाणे बाजारात विकून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी त्या कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. ही बाब जिल्ह्यात घडली असतानाच या सहा कृषी केंद्र धारकांनी केलेल्या काळेबेर प्रकरण उघडकीस आले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याकरिता जिल्हा परिषद कृषी विभागाने भरारी पथकाची नेमणूक केली आहे. यात एक पूर्ण वेळ व २३ अर्धवेळ गुणवत्तानियंत्रण निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर देखरेख ठेवतात. गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी जिल्ह्यातील कृषी केंद्रांची नियुक्ती केली असता त्यात उपवन केंद्राची परवान्यात नोंद न घेता परस्पर साठा विक्री करणे, बिल बुकामध्ये तफावत असणे, बिल बुक साठा नोंदी व दुय्यम या तिन्हीची बेरीज न जुळणे, विक्री अहवाल सादर न करणे, विक्री अहवाल आॅनलाईनवर न टाकणे, चांगल्या ब्रांडखाली नकली निविष्टा विक्री करणे, विक्री बिल शेतकऱ्यांना न देणे व सही न घेणे, दस्तावेज बरोबर न ठेवणे आदी त्रृट्या आढळून आल्यामुळे भंडारा व लाखांदूर तालुक्यातील या सहा कृषी साहित्य विक्रेत्यांवर बंदी घातली. बियाणे नियंत्रण आदेश १९८३, बि बियाणे अधिनियम १९६८ व बियाणे अधिनियम १९६६ च्या कलमान्वये कारवाई करून कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिले आहेत.शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना फसवणुकीचे प्रमाण वाढल्याने भरारी पथकाने तपासणी दरम्यान अनियमितता आढळली. कृषी केंद्र संचालकांनी फसवणूक न करता त्यांना मार्गदर्शन करून चांगल्या प्रतीचे बि बियाणे विक्री करावी, शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची बाब निदर्शनास येताच कृषीविभागाकडे तक्रार दाखल करावी.- एस.एस. किरवे, कृषी विकास अधिकारी, जि.प.भंडारा