शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सहा कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश

By admin | Updated: June 21, 2017 00:23 IST

खरीपाचा हंगाम सुरु झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बि बियाणे खरेदीसाठी लगबग सुरु झालेली आहे.

भरारी पथकाची कारवाई : बियाणे विक्रीत आढळली अनियमिततालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीपाचा हंगाम सुरु झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बि बियाणे खरेदीसाठी लगबग सुरु झालेली आहे. या संधीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना कमी दर्जाचे बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार कृषी केंद्र संचालकांकडून होत असतो. त्यामुळे भरारी पथकाने कृषी केंद्राची तपासणी केली असता सहा केंद्रांमध्ये अनियमितता आढळून आल्याने त्यांना विक्रीबंदचे आदेश बजावले आहे.भंडारा येथील मे श्री साई कृषी केंद्र, बोरगाव येथील मे राधाकृषी केंद्र, बारव्हा येथील लोथे कृषी केंद्र, बारव्हा येथील कृषी साधना कृषी केंद्र, दिघोरी मोठी येथील श्रीराम कृषी केंद्र व लाखांदूर येथील पुर्ती कृषी केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली आहे. कृषी हंगामात मागील वर्षी वर्धा जिल्ह्यातील यशोदा या सिड्स कंपनीने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली होती. उपवन क्षमता नसलेले बियाणे बाजारात विकून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी त्या कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. ही बाब जिल्ह्यात घडली असतानाच या सहा कृषी केंद्र धारकांनी केलेल्या काळेबेर प्रकरण उघडकीस आले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याकरिता जिल्हा परिषद कृषी विभागाने भरारी पथकाची नेमणूक केली आहे. यात एक पूर्ण वेळ व २३ अर्धवेळ गुणवत्तानियंत्रण निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर देखरेख ठेवतात. गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी जिल्ह्यातील कृषी केंद्रांची नियुक्ती केली असता त्यात उपवन केंद्राची परवान्यात नोंद न घेता परस्पर साठा विक्री करणे, बिल बुकामध्ये तफावत असणे, बिल बुक साठा नोंदी व दुय्यम या तिन्हीची बेरीज न जुळणे, विक्री अहवाल सादर न करणे, विक्री अहवाल आॅनलाईनवर न टाकणे, चांगल्या ब्रांडखाली नकली निविष्टा विक्री करणे, विक्री बिल शेतकऱ्यांना न देणे व सही न घेणे, दस्तावेज बरोबर न ठेवणे आदी त्रृट्या आढळून आल्यामुळे भंडारा व लाखांदूर तालुक्यातील या सहा कृषी साहित्य विक्रेत्यांवर बंदी घातली. बियाणे नियंत्रण आदेश १९८३, बि बियाणे अधिनियम १९६८ व बियाणे अधिनियम १९६६ च्या कलमान्वये कारवाई करून कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिले आहेत.शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना फसवणुकीचे प्रमाण वाढल्याने भरारी पथकाने तपासणी दरम्यान अनियमितता आढळली. कृषी केंद्र संचालकांनी फसवणूक न करता त्यांना मार्गदर्शन करून चांगल्या प्रतीचे बि बियाणे विक्री करावी, शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची बाब निदर्शनास येताच कृषीविभागाकडे तक्रार दाखल करावी.- एस.एस. किरवे, कृषी विकास अधिकारी, जि.प.भंडारा