शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

मृत वनमजुराचे काढले वेतन

By admin | Updated: May 26, 2016 01:40 IST

तुमसर वनपरिक्षेत्राअंतर्गत काही वनकर्मचाऱ्यांचे दोनदा वेतन अदा करण्यात आले असून एका वनमजुराचा मृत्यू झाल्यानंतरही वेतन काढण्यात आले.

तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालयाचा कारभार : कर्मचाऱ्यांच्या वेतनात नेहमीच फेरबदलतुमसर : तुमसर वनपरिक्षेत्राअंतर्गत काही वनकर्मचाऱ्यांचे दोनदा वेतन अदा करण्यात आले असून एका वनमजुराचा मृत्यू झाल्यानंतरही वेतन काढण्यात आले. या कार्यालयांतर्गत १ लक्ष २१ हजार ५७७ रुपयांची शासकीय रकमेचा गैरवापर करण्यात आला. एप्रिल महिन्याचे वेतन रखडले आहे. या प्रकरणी चौकशी व निराकरण न झाल्यास २६ मे पाूसन लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा वनकर्मचारी संघटनेने दिला आहे.उपवनसंरक्षक, भंडारा यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, तुमसर वनपरिक्षेत्रातील काही वनकर्मचाऱ्यांना माहे मे २०१४ चे दोनदा वेतन अदा करण्यात आले असून १,२१,५७७ रुपयांचा शासकीय रकमेत गैरवापर करण्यात आला आहे. तुमसर वनपरिक्षेत्रातील वनमजूर सुरेश अनंतराम शेंडे व शरद अनंतराम शेंडे स्थायी वनमजूर असून यांच्या वेतन बिलात नेहमी फेरबदल होत असते. लेखापाल यांच्या वेतन देयकात सुधारणा करीत नाही.तुमसर वनपरिक्षेत्रातील मृत कर्मचारी सुखदेव यादो शरणागत स्थायी वनमजुर २६ फेब्रुवारी २०१६ ला मृत्युमुखी पडले, परंतु मार्च २०१६ मध्ये वेतन काढण्यात आले. शासनाने दर महिन्याला ५ तारखेला वेतन देण्याच्या सूचना केल्या आहेत, परंतु दर महिन्याला २० ते २५ तारखेला वेतन मिळते. माहे एप्रिलचे वेतन अजूनपर्यंत मिळाले नाही.यापूर्वी वेतनासंबंधी समस्यांचे तथा इतर समस्यांचे निराकरण करण्याचे मौखिक आदेश तुमसर वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना दिले होते. परंतु त्यांची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही. वेतनवाढ आदेश, रजा मंजुरी, भनिनि प्रकरणे, सेवानिवृत्त वनकर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्याचे थकबाकीची रक्कम तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम, वनरक्षक व वनपाल यांदा देण्यात येणारी विशेष प्रवास भत्ता रकमेची थकबाकी अद्यापही अदा करण्यात आली नाही. काही शासकीय रकमा स्वत:च्या मनमर्जीप्रमाणे चुकीच्या स्वरुपात अदा करणे तथा रजा मंजूरी आदेश पारित होऊनसुध्दा कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात येत नाही. दर महिन्याला वेतन अदा केल्यावर कर्मचाऱ्यांना वेतन चिठ्ठी देणे आवश्यक असूनही वेतन चिठ्ठी देण्यात येत नाही. वेतनात मोठा फरक येत असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी लेखापाल अपशब्दात बोलतात.या प्रकारामुळे वन कर्मचाऱ्यात असंतोष व्याप्त आहे. वन कर्मचाऱ्यांवर येथे आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. २६ मे पासून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता काम बंद आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे. येथील वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांचे येथे नियंत्रण नसल्याचे दिसून येते. उपवनसंरक्षकांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेण्याची गरज आहे. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना कर्तव्यात कसून प्रकरणी कारवाईची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)