शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारींच्या खांद्यावर साकोली तालुक्याची धुरा

By admin | Updated: September 14, 2015 00:27 IST

तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्थेवर लोकप्रतिनिधींचे किती लक्ष आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तालुक्यात चाललेला प्रभारी कारभार.

व्यवस्था बिघडली : नागरिकांची वणवण थांबता थांबेनासाकोली : तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्थेवर लोकप्रतिनिधींचे किती लक्ष आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तालुक्यात चाललेला प्रभारी कारभार. तालुक्यातील अनेक अधिकारी प्रभारी असल्याने जनतेची कामे खोळंबली आहेत.जिल्ह्यातील साकोली प्रशासकीय यंत्रणेतील एक उपविभाग आहे. या विभागात महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी हे प्रभारी आहेत. साकोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक अनेक वषार्पासून प्रभारी आहेत. यासोबत येथे डॉक्टरांचीही टंचाई आहे. माणसांच्या जीवाचे आरोग्य सांभाळणारी यंत्रणाच आजारी आहे. काही दिवसांपूर्वीच साकोली पंचायत समितीचे प्रभारी खंडविकास अधिकारी सेवानवृत्त झाल्याने ते पद पुन्हा प्रभारीवर आहे. गटशिक्षणाधिकारी यांचे स्थानांतर झाल्याने तेही पद प्रभारी आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी, तालुका विकास प्रकल्प अधिकारी, तालुका अन्न पुरवठा निरीक्षक, पिंडेकेपारचे केंद्रप्रमुख यांच्यासह अनेक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी प्रभारीच आहेत. तहसीलदार हंसा मोहने यांचे नागपूरला स्थानांतरण झाले. त्यानंतर त्यांचे जागी नवीन तहसीलदार शातांराम मोटघरे रूजू झाले. ते सुध्दा ७ महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. म्हणजे तहसीलदारांचे पदही काही महिन्यांनी रिक्त होऊन प्रभारी होईल, असे म्हणायला हरकत नाही. भाजपासह, कॉग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे मुंबईत-दिल्लीत मोठे वजन ठेवणाऱ्या नेत्यांचे मुख्यालय असलेल्या साकोलीला प्रभारी हा नवीन आजार लागला आहे.कोण, कुठे अधिकारी आहेत किंवा नाही, याचेशी जनतेला घेणेदेणे नाही. परंतु,जनतेची कामे वेळेवर व्हावीत हा महत्वाचा भाग आहे. प्रभारी अधिकाऱ्यांचा कारभार म्हणजे त्यांच्या प्रभारावर नियमित अधिकारी आले की, परत आपल्या पूर्वीच्या जागेवर जावे लागते. आज नाही उद्या हे प्रभार सांभाळणारे अधिकारी नियोजित जागेवर परत जाणर असल्याने प्रभारी व्यवस्थापनात या प्रभारी अधिकाऱ्यांचा प्रभाव कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर किती पडतो? हे न उलगडणारे कोडे आहे.शासन अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली करते. कुणी सेवानिवृत्त होतात. परंतु, त्यांचे रिक्तपदे त्वरित भरण्यासाठी बराच कालावधी लागतो. अशा आजारी यंत्रणेवर औषधोपचार लवकर व्हावा म्हणुन लोकशाहीमध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लोक प्रतिनिधी निवडण्याची पद्धत आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनता आणि शासन यांना जोडणारा महत्वाचा भाग आहे. परंतु, निवडणुकीत विकासाचे तुणतुणे वाजविणारे लोकप्रतिनिधींचा आपला क्षेत्रातील प्रशासनावर किती लक्ष आहे हे साकोलीच्या प्रभारी कारभारावरून लक्षात येते. गावागावातील विविध कार्यालयाची आकडेवारी घेतली तर प्रभारींची मोठी यादीच तयार होईल. शासनाने नोकरभरती बंद करून लाखो बेरोजगारांची फौज उभी केली. त्या कर्मचारी अधिकाऱ्यांना भरमसाठ पगार वाढ करण्याची युक्ती सुरू केली. पगारवाढ करण्यापेक्षा नोकरभरती करा आणि राज्यातील प्रभारी रोग नाहीसा करा असे काही तज्ज्ञांचे मत आहे. प्रभारींचा डाग केव्हा मिटणार? याची चर्चा आता तालुक्यात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)