शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

प्रभारींच्या खांद्यावर साकोली तालुक्याची धुरा

By admin | Updated: September 14, 2015 00:27 IST

तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्थेवर लोकप्रतिनिधींचे किती लक्ष आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तालुक्यात चाललेला प्रभारी कारभार.

व्यवस्था बिघडली : नागरिकांची वणवण थांबता थांबेनासाकोली : तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्थेवर लोकप्रतिनिधींचे किती लक्ष आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे तालुक्यात चाललेला प्रभारी कारभार. तालुक्यातील अनेक अधिकारी प्रभारी असल्याने जनतेची कामे खोळंबली आहेत.जिल्ह्यातील साकोली प्रशासकीय यंत्रणेतील एक उपविभाग आहे. या विभागात महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी हे प्रभारी आहेत. साकोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक अनेक वषार्पासून प्रभारी आहेत. यासोबत येथे डॉक्टरांचीही टंचाई आहे. माणसांच्या जीवाचे आरोग्य सांभाळणारी यंत्रणाच आजारी आहे. काही दिवसांपूर्वीच साकोली पंचायत समितीचे प्रभारी खंडविकास अधिकारी सेवानवृत्त झाल्याने ते पद पुन्हा प्रभारीवर आहे. गटशिक्षणाधिकारी यांचे स्थानांतर झाल्याने तेही पद प्रभारी आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी, तालुका विकास प्रकल्प अधिकारी, तालुका अन्न पुरवठा निरीक्षक, पिंडेकेपारचे केंद्रप्रमुख यांच्यासह अनेक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी प्रभारीच आहेत. तहसीलदार हंसा मोहने यांचे नागपूरला स्थानांतरण झाले. त्यानंतर त्यांचे जागी नवीन तहसीलदार शातांराम मोटघरे रूजू झाले. ते सुध्दा ७ महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत. म्हणजे तहसीलदारांचे पदही काही महिन्यांनी रिक्त होऊन प्रभारी होईल, असे म्हणायला हरकत नाही. भाजपासह, कॉग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे मुंबईत-दिल्लीत मोठे वजन ठेवणाऱ्या नेत्यांचे मुख्यालय असलेल्या साकोलीला प्रभारी हा नवीन आजार लागला आहे.कोण, कुठे अधिकारी आहेत किंवा नाही, याचेशी जनतेला घेणेदेणे नाही. परंतु,जनतेची कामे वेळेवर व्हावीत हा महत्वाचा भाग आहे. प्रभारी अधिकाऱ्यांचा कारभार म्हणजे त्यांच्या प्रभारावर नियमित अधिकारी आले की, परत आपल्या पूर्वीच्या जागेवर जावे लागते. आज नाही उद्या हे प्रभार सांभाळणारे अधिकारी नियोजित जागेवर परत जाणर असल्याने प्रभारी व्यवस्थापनात या प्रभारी अधिकाऱ्यांचा प्रभाव कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर किती पडतो? हे न उलगडणारे कोडे आहे.शासन अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली करते. कुणी सेवानिवृत्त होतात. परंतु, त्यांचे रिक्तपदे त्वरित भरण्यासाठी बराच कालावधी लागतो. अशा आजारी यंत्रणेवर औषधोपचार लवकर व्हावा म्हणुन लोकशाहीमध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लोक प्रतिनिधी निवडण्याची पद्धत आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनता आणि शासन यांना जोडणारा महत्वाचा भाग आहे. परंतु, निवडणुकीत विकासाचे तुणतुणे वाजविणारे लोकप्रतिनिधींचा आपला क्षेत्रातील प्रशासनावर किती लक्ष आहे हे साकोलीच्या प्रभारी कारभारावरून लक्षात येते. गावागावातील विविध कार्यालयाची आकडेवारी घेतली तर प्रभारींची मोठी यादीच तयार होईल. शासनाने नोकरभरती बंद करून लाखो बेरोजगारांची फौज उभी केली. त्या कर्मचारी अधिकाऱ्यांना भरमसाठ पगार वाढ करण्याची युक्ती सुरू केली. पगारवाढ करण्यापेक्षा नोकरभरती करा आणि राज्यातील प्रभारी रोग नाहीसा करा असे काही तज्ज्ञांचे मत आहे. प्रभारींचा डाग केव्हा मिटणार? याची चर्चा आता तालुक्यात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)