शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

‘सगुना’ भात लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:03 IST

शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा, तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भिलेवाडा येथे आश्विन गोस्वामी यांच्या शेतावर सगुना भात लागवडीविषयी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देअविनाश कोटांगले : कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या भेटीला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा, तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भिलेवाडा येथे आश्विन गोस्वामी यांच्या शेतावर सगुना भात लागवडीविषयी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी मार्गदर्शन केले.गेल्या वर्षी झालेल्या तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट येवू नये तसेच कमी खर्चात, पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेतीच्या मार्गदर्शनासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. पारंपारिक शेती करताना शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. दरवर्षी उद्भवणाऱ्या पावसाच्या अनियमिततेमुळे वेळेवर रोवणी होत नाही. परिणामी उत्पादनात घट येते. पावसाच्या पाण्यावरील भात लागवडीमुळे एकाच वेळेस रोवणी होत असल्यामुळे मजुरीचे दर वाढतात. लागवडीवर जास्त खर्च येतो. जेवढी जास्त उशिरा रोवणी होते तेवढा रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ व उत्पन्न कमी येते. त्या तुलनेत शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला बगल देत सगुना भात लावणी पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होवून त्यांचे उत्पन्न वाढवून जीवनमान उंचावण्यासाठी सगुना पद्धत फायदेशीर असल्याचे कोटांगले यांनी सांगितले.सगुना भात लागवड पद्धतीने भाताची लागवड जून जुलै महिन्यात रोटावेटरच्या मदतीने जमीन तयार करून १३५ सेमी रुंदीचे व ३० ते ४५ सेमी उंचीचे गादीवाफे तयार करून गादी वाफ्यावर मार्करच्या सहाय्याने २५ बाय २५ सेमीवर मार्क तयार करून २ ते ३ बियाणे मजुरांच्या सहाय्याने पेरणी करावी. या पद्धतीत एकरी ८ किलो बियाणे वापरावे. तणांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उगवणीपूर्व तणनाशकांचा वापर करावा. खताच्या व्यवस्थापनासाठी युरिया ब्रिकेटची १ गोळी एका चौफुलीवर टाकून द्यावी.सगुणा पद्धतीमुळे अगोदरच्या पिकांची मुळे वाफ्यामध्येच ठेवल्यामुळे मुळांची जाळी तयार होते. त्यामुळे पिकांच्या सेंद्रीय कर्जाची गरज मुळे भागवतात. या पद्धतीने भात पिक ८ ते १० दिवस लवकरच तयार होते.मजुरी, लागवड खर्च, बियाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. जमिनीची सुपिकता टिकून राहते. कीड व रोगाचा प्रादूर्भाव कमी होवून उत्पादनात चांगली वाढ होते. ८ ते १० दिवस भात पिक लवकर तयार होते. एकंदरीत सगुना भात पद्धत शेतकºयांसाठी फायद्याची आहे. या पद्धतीत वाढीव उतारा मिळू शकतो. पावसाचा ताण पडला तरी जमीन भेगाळत नाही. पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. या पद्धतीत भात पिकानंतर पालेभाज्या, हरभरा, गहू, मका, सोयाबीन अशी फेरपालट पिके घेतात.-अविनाश कोटांगले, तालुका कृषी अधिकारी, भंडारा.