शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

संकटग्रस्त शेतकऱ्यांवर ‘साडेसाती’ सुरूच

By admin | Updated: April 10, 2015 00:42 IST

यावर्षी खरीप हंगामापासून तर रब्बी हंगामापर्यंत शेतकरी संकटावर संकट सोसत आलेला आहे.

भंडारा : यावर्षी खरीप हंगामापासून तर रब्बी हंगामापर्यंत शेतकरी संकटावर संकट सोसत आलेला आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांवर 'साडे साती'चे सावट भेडसावत असून संकटातून बाहेर निघण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीची प्रतिक्षा आहे. खरीप हंगामातील धानपिकाचे अपुऱ्या पावसामुळे नुकसान झाले. कसेबसे उत्पन्न झाले. त्याचे आधारभूत किंमत मिळाले नाही. खर्च वजा केले असता केवळ माती शिल्लक राहिली, हे पहिले संकट. हिम्मत न हारता रब्बी पिकाची पेरणी केली. गहू, हरभरा, लाखोरी, वाटाणा, मसूर, उळीद आदी उभ्या पिकावर महाशिवरात्रीच्या पर्वावर अवकाळी गारपिटीसह पावसाने उभ्या पिकाची राख रांगोळी केली, हे दुसरे संकट.शेतातील उभे असलेल्या पिकावर फुल व फळ धारणा होईल या आशेने दुकानातील उसनवार, औषधी व खते घेवून फवारणी केली. कसे बसे हातात येणारे उत्पन्न तेही निसर्गाला मान्य झाले नाही. पुन्हा २९ मार्चच्या सायंकाळी वादळ व अवकाळी पावसासह निसर्ग कोपला, सर्व पिक नष्ट करून गेला. फळबाग, वांगी, कांदा, कारले, भोपळा, पालेभाज्या, टमाटर आदी पिकांचे महागडे बियाणे घेवून लागवट केलेले सर्व पिक जमिनदोस्त झाले, हे तीसरे संकट. खरीप हंगामात राष्ट्रीय बँक, सहकारी बँक यामधून पिक कर्ज काढले. एवढ्यावरच भागविले नाही कारण महागडे बियाणे औषधी, खते, मशागत व मजुरीतच पूर्ण कर्ज गेले. म्हणून सावकारकडून ऊसणवार घेतलेले वेगळे कर्ज डोक्यावर घेवून या पिकात नाही तर पुढच्या पिकात परतफेड करता येईल, या आशेने जगता जगता कर्जांचा डोंगर वाढला आहे. आता मात्र परतफेड करायची कसी, हे चवथे संकट आहे.मार्चअखेर राष्ट्रीय बँक, सहकारी बँक, सावकार, उसनवारीचे पैसे, मागणीचा तगादा शेतकऱ्यांवर येत आहे. राष्ट्रीय व सहकारी बँक व्याजासह पैसे भरा अन्यथा कारवाई होईल, असा धाक देत आहेत. पूर्वी व्याजासह चालू पिक कर्ज भरा नंतर शासन व्याजमुक्त करेल तेव्हा भरलेला व्याज तुमच्या खात्यात जमा होईल, असा बळजबरीने शेतकऱ्यांना धमकावित आहे. खरीप हंगामात दुष्काळनिधी केंद्र व राज्य शासनाने हेक्टरी सात हजार ५०० रूपये जाहिर केली होती ती अजुनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. पीक कर्ज भरायचे कसे व कर्ज मुक्त होणार कधी हे नेहमीचे पाचवे संकट.संकटावर संकट झेलणारा शेतकऱ्यांचा खरा वाली कोण, असा सवाल जिल्हा भारत कृषक समाज भंडारा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. नैसर्गीक आपत्तीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. परंतु जिल्हा प्रशासन व राज्य शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्काराने सन्मानित भारत कृषक समाज जिल्हा शाखातर्फे जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, खरीप हंगामातील दुष्काळनिधी हेक्टरी सात हजार ५०० रूपये त्वरीत जमा करावी, चालू वर्षातील पिक कर्ज भरण्याची मुदत आॅगस्ट २०१५ पर्यंत वाढवून नवीन पीक कर्ज बिनव्याजी ताबडतोब द्यावी, बँकेकडून घेतलेले पीक कर्ज भरण्याविषयीचे कठोर धोरण रद्द करावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा भारत कृषक समाजाचे जिल्हाध्यक्ष अविनाश चौधरी, प्रगतशील शेतकरी नाना पंचबुद्धे, कृषी भूषण रामभाऊ कडव, श्रीराम येळणे, देश मिरासे, देवानंद चौधरी, प्रभू फेंडर, अरुण बोरकर यांनी दिला आहे.(नगर प्रतिनिधी)