शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

ग्रामीण एटीएम झाले कॅशलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:57 IST

दिवाळी सण आणि त्यानिमित्ताने आलेल्या सलग सुट्यांमुळे ग्रामीण भागातील एटीएम कॅशलेस झाले आहेत. पैशासाठी शहरात धाव घेवून पैसे काढण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. सणासुदीच्या काळात बाहेरगावी आलेल्यांची तर एटीएम कॅशलेस असल्याने चांगलीच पंचाईत होत आहे. हातात कार्ड घेवून या एटीएमवरून त्या एटीएमवर पैशासाठी भटकंती सुरू आहे.

ठळक मुद्देसलग सुट्यांचा परिणाम : दिवाळीच्या काळात नागरिक त्रस्त, पैशासाठी वणवण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवाळी सण आणि त्यानिमित्ताने आलेल्या सलग सुट्यांमुळे ग्रामीण भागातील एटीएम कॅशलेस झाले आहेत. पैशासाठी शहरात धाव घेवून पैसे काढण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. सणासुदीच्या काळात बाहेरगावी आलेल्यांची तर एटीएम कॅशलेस असल्याने चांगलीच पंचाईत होत आहे. हातात कार्ड घेवून या एटीएमवरून त्या एटीएमवर पैशासाठी भटकंती सुरू आहे.शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागातील जनताही एटीएमचा वापर करू लागले आहे. गावागावात विविध बँकांनी आपले एटीएम सुरू केले आहे. बँकेच्या रांगेतून सुटका मिळत असल्याने तात्काळ पैसे काढण्यासाठी एटीएमचाच पर्याय ग्रामीण जनताही निवडत आहे. आता जणू एटीएमवरून पैसे काढण्याची सवयच झाली आहे. मात्र दिवाळीच्या सणात ग्रामीण भागातील एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट झाला आहे. पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना नो कॅशचा फलक पाहून परत यावे लागते. दिवाळीच्या सणानिमित्त प्रत्येकालाच पैशाची गरज आहे. या काळात प्रत्येजण बाहेरगावी जाण्याचे नियोजन करता. त्यासाठी सोबत पैसा असावा म्हणून एटीएमवरून पैसे काढले जातात. परंतु गत आठ दिवसांपासून ग्रामीण भागातील एटीएममध्ये ठणठणाट झाला आहे. अनेकजण तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी येवून पैसे काढण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्या ठिकाणीही त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.तालुका मुख्यालयासह मोठ्या गावातील अनेक एटीएम गत आठ दिवसांपासून बंद आहेत. दिवाळीसारख्या सणात पैसे उपलब्ध होत नसल्याने अनेकांचे कामे रखडली आहेत. विशेष म्हणजे दिवाळीनिमित्त आलेल्या सलग सुट्यांमुळे रोख पैशांची टंचाई निर्माण झाली आहे. बँका बंद असल्याने बँकेतूनही पैसे काढणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांना बाहेरगावी जाण्याचे नियोजन बदलवावे लागत आहे. आता सोमवारी बँका सुरू होतील. तेव्हाच नागरिकांना पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्यावेळी बँकात मोठी गर्दी उसळणार आहे.लिंक फेलचाही फटकाकाही गावातील एटीएममध्ये पैसे असले तरी लिंक फेलचाही फटका बसत आहे. त्यामुळे अनेक एटीएम शटरबंद दिसत आहे. ग्रामीण भागातील नागरिक याठिकाणी जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु लिंक फेलचा मॅसेज वाचून मनस्ताप सहन करतात. यासर्व प्रकाराने वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.