शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ग्रामीण एटीएम झाले कॅशलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:57 IST

दिवाळी सण आणि त्यानिमित्ताने आलेल्या सलग सुट्यांमुळे ग्रामीण भागातील एटीएम कॅशलेस झाले आहेत. पैशासाठी शहरात धाव घेवून पैसे काढण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. सणासुदीच्या काळात बाहेरगावी आलेल्यांची तर एटीएम कॅशलेस असल्याने चांगलीच पंचाईत होत आहे. हातात कार्ड घेवून या एटीएमवरून त्या एटीएमवर पैशासाठी भटकंती सुरू आहे.

ठळक मुद्देसलग सुट्यांचा परिणाम : दिवाळीच्या काळात नागरिक त्रस्त, पैशासाठी वणवण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवाळी सण आणि त्यानिमित्ताने आलेल्या सलग सुट्यांमुळे ग्रामीण भागातील एटीएम कॅशलेस झाले आहेत. पैशासाठी शहरात धाव घेवून पैसे काढण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. सणासुदीच्या काळात बाहेरगावी आलेल्यांची तर एटीएम कॅशलेस असल्याने चांगलीच पंचाईत होत आहे. हातात कार्ड घेवून या एटीएमवरून त्या एटीएमवर पैशासाठी भटकंती सुरू आहे.शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागातील जनताही एटीएमचा वापर करू लागले आहे. गावागावात विविध बँकांनी आपले एटीएम सुरू केले आहे. बँकेच्या रांगेतून सुटका मिळत असल्याने तात्काळ पैसे काढण्यासाठी एटीएमचाच पर्याय ग्रामीण जनताही निवडत आहे. आता जणू एटीएमवरून पैसे काढण्याची सवयच झाली आहे. मात्र दिवाळीच्या सणात ग्रामीण भागातील एटीएममध्ये पैशाचा ठणठणाट झाला आहे. पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना नो कॅशचा फलक पाहून परत यावे लागते. दिवाळीच्या सणानिमित्त प्रत्येकालाच पैशाची गरज आहे. या काळात प्रत्येजण बाहेरगावी जाण्याचे नियोजन करता. त्यासाठी सोबत पैसा असावा म्हणून एटीएमवरून पैसे काढले जातात. परंतु गत आठ दिवसांपासून ग्रामीण भागातील एटीएममध्ये ठणठणाट झाला आहे. अनेकजण तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी येवून पैसे काढण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्या ठिकाणीही त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.तालुका मुख्यालयासह मोठ्या गावातील अनेक एटीएम गत आठ दिवसांपासून बंद आहेत. दिवाळीसारख्या सणात पैसे उपलब्ध होत नसल्याने अनेकांचे कामे रखडली आहेत. विशेष म्हणजे दिवाळीनिमित्त आलेल्या सलग सुट्यांमुळे रोख पैशांची टंचाई निर्माण झाली आहे. बँका बंद असल्याने बँकेतूनही पैसे काढणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांना बाहेरगावी जाण्याचे नियोजन बदलवावे लागत आहे. आता सोमवारी बँका सुरू होतील. तेव्हाच नागरिकांना पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्यावेळी बँकात मोठी गर्दी उसळणार आहे.लिंक फेलचाही फटकाकाही गावातील एटीएममध्ये पैसे असले तरी लिंक फेलचाही फटका बसत आहे. त्यामुळे अनेक एटीएम शटरबंद दिसत आहे. ग्रामीण भागातील नागरिक याठिकाणी जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु लिंक फेलचा मॅसेज वाचून मनस्ताप सहन करतात. यासर्व प्रकाराने वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.