शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

वन्यप्राण्यांची गावांकडे धाव

By admin | Updated: March 28, 2015 00:35 IST

वनप्रदूषण, पाणी प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे बरेच जंगली प्राणी जंगलातून निघून शेतशिवारात न थांबता थेट गावांमध्ये, मानववस्तीत आश्रय घेत असतानाचे चित्र सध्या गावागावात पाहायला मिळत आहे.

मासळ : वनप्रदूषण, पाणी प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे बरेच जंगली प्राणी जंगलातून निघून शेतशिवारात न थांबता थेट गावांमध्ये, मानववस्तीत आश्रय घेत असतानाचे चित्र सध्या गावागावात पाहायला मिळत आहे. एरवी माकडे ही शेतशिवारात किंवा जंगलात दिसायची. परंतु ुउपरोक्त सर्व बाबींमुळे माकडांनी मनुष्याच्या वस्तीमध्ये आपले बस्तान मांडले आहे.जैतपूर येथील नरेंद्र कॉलनी, एरिगेशन कॉलनी तसेच कावळे राईस मिल परिसरात माकडांचा धुमाकुळ नित्याचीच बाब ठरलीअ ाहे. पुरुषवर्ग दिवसभर कामानिमित्त घराबाहेर जातात. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांना व लहान मुलांना याचा सर्वात जास्त त्रास होत आहे. नर वानर हे अतिशय उग्र असतात व महिला व मुलांवर हल्ला करण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिलांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. माकड हा एकच प्राणी असा आहे की तो रंगातील फरक ओळखू शकतो. लाल रंगावर माकड हे जास्त राग व्यक्त करतात. माकडांनी गावात बस्तान मांडल्यामुळे परसबागातील रोपटे, फुलझाडे, टीव्हीचे अँटीना, घरावरच्या कवेलू यांचे अतोनात नुकसान झालेले आहणे. एवढेच नाही तर पाणी पिण्यासाठी बाथरूममध्ये घुसून पाणी पितात. बाहेरील नळाचे पाईप सुद्धा तोडण्याचा प्रताप सुद्धा माकडांनी केलेला आहे. तसेच जीवनोपयोगी वस्तू, दाळ, धान्ये व इतर किरकोळ वस्तू उन्हात बाहेर वाळवायला घालणे सुद्धा गृहिणींना कठीण होत आहे.अशाप्रकारे माकडांच्या माकडचेष्टांवर आवर घालण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा या परिसरातील माकडांचा बंदोबस्त वनाधिकाऱ्यांनी करावा असे मत विजय ब्राम्हणकर, योगेश ब्राम्हणकर, विनोद पिल्लारे, चंदा झलके, सुनिल चौधरी यांनी व्यक्त केले आहे. तसेच जंगलामध्ये पाणवठ्याची संख्या वाढवून वृक्षाचे संवर्धन केल्यास माकडांचे मानववस्तीत होणारे स्थलांतर थांबविता येईल असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)