शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

विरली परिसरात गारपिटीच्या तडाख्याने रबी पिके मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 05:00 IST

शुक्रवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. मात्र रात्री आठच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाला प्रारंभ झाला. गत महिनाभरापासून दर एक- दोन दिवसांनी सातत्याने बरसणाऱ्यां पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल। नुकसानभरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील विरली परिसरात शुक्रवारी रात्री आठ वाजता सुमारास गारपिटीसह वादळी पाऊस आला. यावेळी सुमारे १५ मिनीटे गारांचा वर्षाव झाला. या गारपिटीच्या तडाख्याने रबी पीके मातीमोल झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.शुक्रवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. मात्र रात्री आठच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाला प्रारंभ झाला. गत महिनाभरापासून दर एक- दोन दिवसांनी सातत्याने बरसणाऱ्यां पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत.सध्या लाख, लाखोळी, वाटाणा, हरभरा, गहू आदी पिके काढणीचा हंगाम जोमात सुरु आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रबी पिकांच्या कडपा पसरलेल्या आहेत. तर काही शेतकºयांच्या शेतात कडपा जमा करुन ढिग तयार झाले आहेत. मात्र वारंवार बरसणाऱ्या पावसाने या कडपा भिजत असून वाटाणा, हरभरा अंकुरण्याच्या मार्गावर आहेत. या कडपा पलटवून वाळविणे आणि पुन्हा पावसाने ओला होणे, असा प्रकार सुरु असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.दुसरीकडे पिकांच्या कडपा जमा करुन तयार झालेल्या ढिगांवर ताडपत्री, पॉलिथीन आदी झाकून पीक वाचविण्याचा शेतकरी केविलवाणा प्रयत्न करीत आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे या ताडपत्र्या उडून जात असून पिकांचे ढिगही ओले होत आहेत. परिणामी शेतात जमा झालेली पिकेही सडण्याच्या मार्गावर आहेत. जी काढणी योग्य पिके शेतात उभी आहेत ती सातत्याने बरसणाºया पावसाने काळवंटली आहे. उभ्या पिकांचे गारपिटीच्या तडाख्याने अतोनात नुकसान झाले आहे.या रबी हंगामात दर एक- दोन दिवसांनी सातत्याने बरसणाºया पावसाने रबी पिके मातीमोल झाली असून निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंड्यातून घास हिरावून घेतला आहे. दरम्यान, या हंगामातील अवकाळी पावसाच्या तडाख्याने रबी पिकाचंी झालेली हानी लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.शेतकऱ्यांची संकटाची मालीका सुरुचखरीप हंगामामध्ये निसर्गाच्या वक्रदृष्टीने उत्पादनात कमालीची घट झाली. धान खरेदीसाठी रांगा लावण्यात आल्या. काटसकरीनंतर धानाची विक्री झाली. मात्र चुकारे अद्यापही अडले आहे. सदर संकट सुरु असतानाच रबी पिकावर अवकाळी पावसाने भर घातली. त्यामुळे शेतकऱ्यांवर येणारे संकट वाढतच आहे.