शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विरली परिसरात गारपिटीच्या तडाख्याने रबी पिके मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 05:00 IST

शुक्रवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. मात्र रात्री आठच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाला प्रारंभ झाला. गत महिनाभरापासून दर एक- दोन दिवसांनी सातत्याने बरसणाऱ्यां पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल। नुकसानभरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : लाखांदूर तालुक्यातील विरली परिसरात शुक्रवारी रात्री आठ वाजता सुमारास गारपिटीसह वादळी पाऊस आला. यावेळी सुमारे १५ मिनीटे गारांचा वर्षाव झाला. या गारपिटीच्या तडाख्याने रबी पीके मातीमोल झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.शुक्रवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. मात्र रात्री आठच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाला प्रारंभ झाला. गत महिनाभरापासून दर एक- दोन दिवसांनी सातत्याने बरसणाऱ्यां पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत.सध्या लाख, लाखोळी, वाटाणा, हरभरा, गहू आदी पिके काढणीचा हंगाम जोमात सुरु आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात रबी पिकांच्या कडपा पसरलेल्या आहेत. तर काही शेतकºयांच्या शेतात कडपा जमा करुन ढिग तयार झाले आहेत. मात्र वारंवार बरसणाऱ्या पावसाने या कडपा भिजत असून वाटाणा, हरभरा अंकुरण्याच्या मार्गावर आहेत. या कडपा पलटवून वाळविणे आणि पुन्हा पावसाने ओला होणे, असा प्रकार सुरु असल्याने शेतकरी हैराण झाला आहे.दुसरीकडे पिकांच्या कडपा जमा करुन तयार झालेल्या ढिगांवर ताडपत्री, पॉलिथीन आदी झाकून पीक वाचविण्याचा शेतकरी केविलवाणा प्रयत्न करीत आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे या ताडपत्र्या उडून जात असून पिकांचे ढिगही ओले होत आहेत. परिणामी शेतात जमा झालेली पिकेही सडण्याच्या मार्गावर आहेत. जी काढणी योग्य पिके शेतात उभी आहेत ती सातत्याने बरसणाºया पावसाने काळवंटली आहे. उभ्या पिकांचे गारपिटीच्या तडाख्याने अतोनात नुकसान झाले आहे.या रबी हंगामात दर एक- दोन दिवसांनी सातत्याने बरसणाºया पावसाने रबी पिके मातीमोल झाली असून निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंड्यातून घास हिरावून घेतला आहे. दरम्यान, या हंगामातील अवकाळी पावसाच्या तडाख्याने रबी पिकाचंी झालेली हानी लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.शेतकऱ्यांची संकटाची मालीका सुरुचखरीप हंगामामध्ये निसर्गाच्या वक्रदृष्टीने उत्पादनात कमालीची घट झाली. धान खरेदीसाठी रांगा लावण्यात आल्या. काटसकरीनंतर धानाची विक्री झाली. मात्र चुकारे अद्यापही अडले आहे. सदर संकट सुरु असतानाच रबी पिकावर अवकाळी पावसाने भर घातली. त्यामुळे शेतकऱ्यांवर येणारे संकट वाढतच आहे.