शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

रोवणी @ ६० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:18 IST

पावसाने दडी मारल्याने वर्षभरासाठी आवश्यक असणाºया पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे, तर धरणे अजून अर्धीही भरलेली नाहीत.

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : पाण्याचे संकट कायम, पावसाची उघडझाप

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाने दडी मारल्याने वर्षभरासाठी आवश्यक असणाºया पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे, तर धरणे अजून अर्धीही भरलेली नाहीत. त्यामुळे यावर्षी पाण्याचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी ६२३.१ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी आत्तापर्यंत सरासरी ६७७.६ मिमी इतका पाऊस झाला होता. जिल्ह्यात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात आहे. लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत असलेल्या प्रकल्पात केवळ २८.६४ टक्के जलसाठा आहे. भंडारा जिल्ह्यात १ लाख ८२ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी आतापर्यंत केवळ १ लाख २ हजार ८१३ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली. यातही रोवणीची टक्केवारी ६० टक्के असल्याची सांगण्यात येते.कमी पावसामुळे तलाव, बोड्यात अजुनही अत्यल्प जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरमधील शेती धोक्यात सापडली आहे. नैसर्गिक संकट गंभीर दिसू लागले असून भिषण दुष्काळाची परिस्थिती आजही कायम आहे. सिंचनाच्या पाण्याची बोंबाबोंब आहे. अपुºया पावसामुळे हजारों एकर शेती अजुनही पडीत आहे. रोवणी झालेली नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची पर्याप्त साधने आहेत. त्यांनी कशीबशी रोवणी आटोपली असली तरी बेपत्ता पावसाने शेतीला पडलेल्या भेगा अजुनही शेतकºयांच्या मनात खोलवर जखम करुन आहेत. पºह्यांचा कालावधी दोन ते अडीच महिन्यापर्यंत पोहचला आहे. आता हलक्या धानाची रोवणी करण्यास शेतकºयांचा नकार असून हजारो एकर शेती पडीत राहणार आहे. पावसाने दडी मारल्याने पºहे वाळली, रोग व किडीची प्रादुर्भाव जाणवल्याने शेतकरी हतबल आहे.