शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

रोवणी @ ६० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:18 IST

पावसाने दडी मारल्याने वर्षभरासाठी आवश्यक असणाºया पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे, तर धरणे अजून अर्धीही भरलेली नाहीत.

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : पाण्याचे संकट कायम, पावसाची उघडझाप

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाने दडी मारल्याने वर्षभरासाठी आवश्यक असणाºया पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे, तर धरणे अजून अर्धीही भरलेली नाहीत. त्यामुळे यावर्षी पाण्याचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी ६२३.१ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी आत्तापर्यंत सरासरी ६७७.६ मिमी इतका पाऊस झाला होता. जिल्ह्यात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात आहे. लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत असलेल्या प्रकल्पात केवळ २८.६४ टक्के जलसाठा आहे. भंडारा जिल्ह्यात १ लाख ८२ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी आतापर्यंत केवळ १ लाख २ हजार ८१३ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली. यातही रोवणीची टक्केवारी ६० टक्के असल्याची सांगण्यात येते.कमी पावसामुळे तलाव, बोड्यात अजुनही अत्यल्प जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरमधील शेती धोक्यात सापडली आहे. नैसर्गिक संकट गंभीर दिसू लागले असून भिषण दुष्काळाची परिस्थिती आजही कायम आहे. सिंचनाच्या पाण्याची बोंबाबोंब आहे. अपुºया पावसामुळे हजारों एकर शेती अजुनही पडीत आहे. रोवणी झालेली नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची पर्याप्त साधने आहेत. त्यांनी कशीबशी रोवणी आटोपली असली तरी बेपत्ता पावसाने शेतीला पडलेल्या भेगा अजुनही शेतकºयांच्या मनात खोलवर जखम करुन आहेत. पºह्यांचा कालावधी दोन ते अडीच महिन्यापर्यंत पोहचला आहे. आता हलक्या धानाची रोवणी करण्यास शेतकºयांचा नकार असून हजारो एकर शेती पडीत राहणार आहे. पावसाने दडी मारल्याने पºहे वाळली, रोग व किडीची प्रादुर्भाव जाणवल्याने शेतकरी हतबल आहे.