शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

रोवणी @ ६० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:18 IST

पावसाने दडी मारल्याने वर्षभरासाठी आवश्यक असणाºया पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे, तर धरणे अजून अर्धीही भरलेली नाहीत.

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : पाण्याचे संकट कायम, पावसाची उघडझाप

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाने दडी मारल्याने वर्षभरासाठी आवश्यक असणाºया पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे, तर धरणे अजून अर्धीही भरलेली नाहीत. त्यामुळे यावर्षी पाण्याचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी ६२३.१ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी आत्तापर्यंत सरासरी ६७७.६ मिमी इतका पाऊस झाला होता. जिल्ह्यात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात आहे. लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत असलेल्या प्रकल्पात केवळ २८.६४ टक्के जलसाठा आहे. भंडारा जिल्ह्यात १ लाख ८२ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी आतापर्यंत केवळ १ लाख २ हजार ८१३ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली. यातही रोवणीची टक्केवारी ६० टक्के असल्याची सांगण्यात येते.कमी पावसामुळे तलाव, बोड्यात अजुनही अत्यल्प जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरमधील शेती धोक्यात सापडली आहे. नैसर्गिक संकट गंभीर दिसू लागले असून भिषण दुष्काळाची परिस्थिती आजही कायम आहे. सिंचनाच्या पाण्याची बोंबाबोंब आहे. अपुºया पावसामुळे हजारों एकर शेती अजुनही पडीत आहे. रोवणी झालेली नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची पर्याप्त साधने आहेत. त्यांनी कशीबशी रोवणी आटोपली असली तरी बेपत्ता पावसाने शेतीला पडलेल्या भेगा अजुनही शेतकºयांच्या मनात खोलवर जखम करुन आहेत. पºह्यांचा कालावधी दोन ते अडीच महिन्यापर्यंत पोहचला आहे. आता हलक्या धानाची रोवणी करण्यास शेतकºयांचा नकार असून हजारो एकर शेती पडीत राहणार आहे. पावसाने दडी मारल्याने पºहे वाळली, रोग व किडीची प्रादुर्भाव जाणवल्याने शेतकरी हतबल आहे.