शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

लाखनी पोलिसांची भूमिका संशयास्पद

By admin | Updated: April 23, 2017 00:43 IST

लाखनी येथील अक्षय नागरी पतसंस्थेतील लाखो रूपयांच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या

मुख्य आरोपींना तात्पुरता जामीन : प्रकरण लाखनी येथील अक्षय पतसंस्थेचे प्रशांत देसाई   भंडारा लाखनी येथील अक्षय नागरी पतसंस्थेतील लाखो रूपयांच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या चार संचालकांना यापूर्वीच तात्पुरता जामीन मिळाला असून उर्वरित तिघांना शुक्रवारला तात्पुरता जामीन मिळाला आहे. या संचालकांना जामीन मिळाल्यामुळे आतापर्यंत या प्रकरणाची पाळेमुळे शोधणाऱ्या तपास करणाऱ्या लाखनी पोलिसांची भूमिकाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अक्षय पतसंस्थेत ३३ लाख ९९ हजार ३७० रूपयांचा घोटाळा झाल्याचे लेखापरिक्षणात स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा लेखापरिक्षक श्रीकांत सुपे यांच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी पतसंस्थेच्या अध्यक्षांसह आठ जणांविरूद्ध गुन्हा नोंदविला. अपहार प्रकरणातील पतसंस्थेचे अध्यक्ष उत्तमराव वरकड, उमराव बावणकुडे, देवाजी पडोळे, देवराम चाचेरे, व्यवस्थापक सूर्यभान गायधने, अभिकर्ता घनश्याम निंबेकर, अभिकर्ता संजय कुंभरे व संगणक आॅपरेटर प्रशांत पाठक या आठजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. व्ही. जीवने यांच्या न्यायालयात उत्तमराव वरकड, उमराव बावनकुळे, देवाजी पडोळे, देवराम चाचेरे यांना यापूर्वीच तात्पुरता जामीन मिळाला होता. व्यवस्थापन सूर्यभान गायधने, धनश्याम निबेंकर, संजय कुंभरे यांना शुक्रवारला तात्पूरता जामीन मिळाला आहे. तर प्रशांत पाठक हा अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा तपास लाखनीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे करीत आहे. यातील सर्व आरोपी हे लाखनी येथील असूनही लाखनी पोलिसांनी जामीन मिळेपर्यंत कोणालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले नव्हते. याबाबत संपर्क साधला असता तपास सुरू असून आरोपी फरार असल्याचे पोलीस सांगत होते. अपहारप्रकरणी ज्यांना अटक करणे गरजेचे होते, त्या सर्वांना पोलिसांनी अभय दिल्याचे यावरून दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता लाखनी पोलिसांकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. ठाणेदारांची भूमिका संशयास्पद लाखनीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे हे स्वत: तपासी अधिकारी आहे. त्यांनी या आरोपींना जामीन मिळू नये यासाठी न्यायालयात बाजू मांडण्याची गरज होती. मात्र, ते स्वत: न्यायालयात हजर न राहता अधिनस्थ कर्मचाऱ्यांना प्रकरणाच्या कागदपत्रांसह पाठविले होते. पहिल्या सुनावनीच्यावेळी पोलीस व सरकारी वकील यांच्यात सामंजस्य जुळून आले नाही. त्यामुळे सरकारी वकीलांनी कागदपत्रांचे वाचन न झाल्याने पुढील तारीख देण्याची विनंती केली होती. त्यामुळे दुसऱ्याच सुनावनीत पतसंस्थेच्या चार संचालकांना तात्पूरता जामीन मिळाला. तसाच प्रकार दुसऱ्या जामीन अर्जावर सुनावणीच्या वेळेस झाल्याची चर्चा आहे. ठाणेदार म्हणतात मिटिंगमध्ये आहे लाखनी पोलिसांच्या भूमिकेमुळे या गंभीर प्रकरणाच्या तपासाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. दोषी कोठडीत जाण्याऐवजी खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांनी यात काय भूमिका घेतली याबाबत विचारणा करण्याकरिता त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी पहिल्यांदा प्रतिसाद दिला नाही, दुसऱ्या वेळेस मिटींगमध्ये असल्याचे सांगून भ्रमणध्वनी बंद केला. दरम्यान शुक्रवारलाही त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नव्हता.