शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

रोहयोची कामे जिल्ह्यात ठरू शकतात कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:35 IST

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होईपर्यंत तरी जिल्हाधिकाऱ्यांनी रोहयो कामांना स्थगिती द्यावी, अशी मागणी भंडारा तालुक्यातील एका रोजगार सेवकाच्या ...

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होईपर्यंत तरी जिल्हाधिकाऱ्यांनी रोहयो कामांना स्थगिती द्यावी, अशी मागणी भंडारा तालुक्यातील एका रोजगार सेवकाच्या व भंडारा पंचायत समितीतील रोहयो विभागाच्या व कृषी विभागातील एका क्लार्कलाही कोरोनामुळे आपला कर्तव्यावर असताना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने किमान आता तरी रोहयो कामे थांबवावीत, अशी मागणी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी करू लागले आहेत.

गोंदिया जिल्ह्यात एका रोजगार सेवकामुळे ३२ जण पॉझिटिव्ह झाले होते. त्यानंतर भंडारा तालुक्यातील एका रोजगार सेवकाला, एका पंचायत समितीतील रोहयो विभागाच्या व कृषी विभागातील एका क्लार्कलाही कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याने कर्मचारीवर्गातूनही संताप व्यक्त होत आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी काही दिवस रोहयो कामांना स्थगिती देण्याची मागणी आता गावागावांतून होऊ लागली आहे.

बॉक्स

रोहयो कामांसाठी कर्मचाऱ्यांचा

अनेक विभागांशी येतो संपर्क

शासकीय कर्मचाऱ्यांना दररोज रोहयो कामाचे मस्टर काढावे लागत असल्याने शासकीय, अधिकारी कर्मचाऱ्यांना तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कृषी विभाग, वन विभाग व विविध ग्रामपंचायती, तसेच सरपंच, रोजगारसेवकांशी संपर्क येत असल्याने रोहयोची कामे सुरू केल्यास रोहयो कामे कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र ठरू शकतात. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आताच तीस हजारांच्या घरात गेला आहे. रोहयो कामाने हा आकडा आणखी वाढू शकतो. त्यामुळे कोरोना संसर्गाचा आकडा रोखायचा असेल, तर किमान आणखी काही दिवस तरी रोहयो कामांना स्थगिती देण्याची गरज आहे.

बॉक्स

रोहयो अधिकारी, रोजगार सेवकाच्या

मृत्यूने कर्मचारी संतप्त

शासनाने अद्यापही कृषी अधिकारी, कर्मचारी, तसेच काही शासकीय कर्मचाऱ्यांसह रोजगार सेवकांना कोरोना संकटात विमा सुरक्षेचे कवच दिलेले नाही. त्यामुळे रोहयोची कामे करताना जिल्ह्यात कोणाचा मृत्यू झाल्यास शासन त्याची जबाबदारी घेणार काय, असा प्रश्नही ग्रामसेवक, कृषी सहायक, पंचायत समिती रोहयो विभागातील कार्यरत अधिकारी, कर्मचारी, वनरक्षक, रोजगार सेवक करू लागले आहेत. रोहयो कामे करताना अनेकांचा संपर्क येत असल्याने अशा स्थितीत कोरोना संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही.