शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

लाखनी तालुक्यातील रस्ते गेले खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:58 IST

लाखनी : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात? अशी परिस्थिती आहे. यामुळे ...

लाखनी : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात? अशी परिस्थिती आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत आहे.

शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याची ओरड आहे. दरवर्षी ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीकरिता शेत रस्ते नाहीत तर, काही ग्रामपंचायत हद्दीमधील गावांमध्ये जाण्यासाठीसुद्धा रस्ते नाहीत. त्यामुळे याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाच्या वतीने जिल्हा परिषद व आमदार निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असतो. मात्र या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. जनतेच्या हितासाठी निधी उपलब्ध करून देऊनसुद्धा त्या निधीचा गैरवापर करून थातूरमातूर रस्त्याचे व नालीची कामे केली जातात, हे वास्तव चित्र आहे.

लाखनी तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतअंतर्गत गावात येणारे मुख्य रस्ते हे अतिशय खराब झाले आहेत. त्या रस्त्याच्या सुधारणेसाठी संबंधित गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार देऊनसुद्धा संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

त्यामुळे एखादे वाहन रस्त्यावर अडकले तर ते काढण्यासाठी भाड्याने दुसरे वाहन आणावे लागत असल्याची परिस्थिती पाहावयास मिळत आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळेच असे प्रसंग नागरिकांवर ओढवत आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधींनी शहरासोबतच ग्रामीण भागातील गावाकडे लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बॉक्स

तालुक्यातील या रस्त्यांची अवस्था बिकट

लाखनी परिसरातील मानेगाव ते आलेसूर, बोरगाव, पिंपळगाव ते सामेवाडा, बोरगाव ते राजेगाव चान्ना ते धानला, नावेझरी, खुर्शीपार, मलकाझरी, पोहरा, पेंढरी ते रेंगोळा, किटाडी, मांगली, पालांदूर ते गोंदी रस्ता, गोंदी-ढीवरखेडा मार्ग, ढीवरखेडा गावातील अंतर्गत रस्ता, जुना मऱ्हेगाव ते नवीन मऱ्हेगाव रस्ता, वाकल ते तई, वाकल ते हरदोली रस्ता, वाकल ते देवरी रस्ता, खराशी ते घोडेझरी रस्ता, खराशी ते पाथरी रस्ता, निमगाव ते घोडेझरी रस्ता, पाथरी ते मऱ्हेगाव रस्ता या सर्व रस्त्यांची अवस्था बिकट आहे.

एखादे निवेदन आल्यास किंवा प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला जाग येते. यावेळी थातूरमातूर दुरुस्ती करण्याचा देखावा केला जातो. अशीच परिस्थिती परिसरातील पांदण रस्त्यांची आहे.