शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

लाखनी तालुक्यातील रस्ते गेले खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:58 IST

लाखनी : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात? अशी परिस्थिती आहे. यामुळे ...

लाखनी : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यात? अशी परिस्थिती आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत आहे.

शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याची ओरड आहे. दरवर्षी ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीकरिता शेत रस्ते नाहीत तर, काही ग्रामपंचायत हद्दीमधील गावांमध्ये जाण्यासाठीसुद्धा रस्ते नाहीत. त्यामुळे याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाच्या वतीने जिल्हा परिषद व आमदार निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असतो. मात्र या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. जनतेच्या हितासाठी निधी उपलब्ध करून देऊनसुद्धा त्या निधीचा गैरवापर करून थातूरमातूर रस्त्याचे व नालीची कामे केली जातात, हे वास्तव चित्र आहे.

लाखनी तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतअंतर्गत गावात येणारे मुख्य रस्ते हे अतिशय खराब झाले आहेत. त्या रस्त्याच्या सुधारणेसाठी संबंधित गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार देऊनसुद्धा संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

त्यामुळे एखादे वाहन रस्त्यावर अडकले तर ते काढण्यासाठी भाड्याने दुसरे वाहन आणावे लागत असल्याची परिस्थिती पाहावयास मिळत आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळेच असे प्रसंग नागरिकांवर ओढवत आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधींनी शहरासोबतच ग्रामीण भागातील गावाकडे लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बॉक्स

तालुक्यातील या रस्त्यांची अवस्था बिकट

लाखनी परिसरातील मानेगाव ते आलेसूर, बोरगाव, पिंपळगाव ते सामेवाडा, बोरगाव ते राजेगाव चान्ना ते धानला, नावेझरी, खुर्शीपार, मलकाझरी, पोहरा, पेंढरी ते रेंगोळा, किटाडी, मांगली, पालांदूर ते गोंदी रस्ता, गोंदी-ढीवरखेडा मार्ग, ढीवरखेडा गावातील अंतर्गत रस्ता, जुना मऱ्हेगाव ते नवीन मऱ्हेगाव रस्ता, वाकल ते तई, वाकल ते हरदोली रस्ता, वाकल ते देवरी रस्ता, खराशी ते घोडेझरी रस्ता, खराशी ते पाथरी रस्ता, निमगाव ते घोडेझरी रस्ता, पाथरी ते मऱ्हेगाव रस्ता या सर्व रस्त्यांची अवस्था बिकट आहे.

एखादे निवेदन आल्यास किंवा प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला जाग येते. यावेळी थातूरमातूर दुरुस्ती करण्याचा देखावा केला जातो. अशीच परिस्थिती परिसरातील पांदण रस्त्यांची आहे.