शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

रस्त्यांची दैना वाहनधारकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:38 IST

गावखेड्यातील रस्ते डांबरीकरणाचे झाले. गुळगुळीत झालेल्या रस्त्यांची अवस्था अपघात अन् मृत्यूची प्रतिक्षा करीत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देकान्हळगाव-मोहाडी रस्त्याचे हाल : प्रशासनाला जाग कधी येणार, परिसरातील नागरिकांनी केली रस्ता दुरूस्तीची मागणी.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गावखेड्यातील रस्ते डांबरीकरणाचे झाले. गुळगुळीत झालेल्या रस्त्यांची अवस्था अपघात अन् मृत्यूची प्रतिक्षा करीत असल्याचे दिसून येते. त्यातलाच कान्हळगाव ते मोहाडी हा रस्ता पूर्णत: चाळण झाला आहे. तरीही प्रशासन या रस्त्याकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे प्रशासन जनतेच्या सहनशिलतेची परीक्षाच घेत असल्याचे दिसून येते.डिजीटल इंडिया, बुलेट ट्रेन व मेट्रो आदीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाºया शासनाची खेड्यांच्या रस्त्यांची अवस्था कशी आहे, याकडे दुर्लक्ष केले आहे. गावातील रस्ते तालुक्याला डांबरीकरणाने जोडली खरी, पण दुरुस्तीच केली जात नाही असे दिसून येते. कान्हळगाव-मोरगाव- मोहाडी हा रस्ता तीन दशकापूर्वी तयार करण्यात आला.तथापी, या रस्त्याला पडलेली खड्डे बुजविण्यात प्रशासनाला स्वास्थ्य नाही. मुरम-मातीने खड्डे झाकायचे हा उद्योग केला जातो. पावसाळयात पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती रस्त्याची होते. कंत्राटदारांना हे काम परवडणारे आहेत. कारण डागडूजीच्या नावाखाली मलिंदा चाखायला मिळत असतो. मोहाडी ते मोरगाव- कान्हळगाव हा डांबरीकरण झालेला पाच किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णत: उखळला, चाळणी झालेला आहे. बºयाच जागी जीवघेणे खड्डे पडले आहेत.डांबर बेपत्ता अन् रस्त्याची चाळण झाली आहे. मोहाडीच्या पश्चिमेकडील मोरगाव, महालगाव, कान्हळगाव, सिरसोली, वडेगाव, सालेबर्डी, काटी, पांढराबोडी, हरदोली आदी गावाची रहदारी या रस्त्यांने सकाळपासून रात्रीपर्यंत चालत असते. अतिशय वाईट अवस्था झालेल्या रस्त्याने वाहन चालवित असताना नजर वळती करता येत नाही. नजर चुकली तर अपघात घडलाच म्हणून समजा. अशी भिती येथून मार्गक्रमण करणाºयांना होतो. संवेदनाहित झालेले प्रशासन जनतेच्या सहनशिलतेची कसोटी घेत आहेत.जनप्रतिनिधी या रस्त्यासाठी बोलायला तयार नाहीत. मागील काही महिन्यापूर्वी चौंडेश्वरी मार्गाची थोडीफार दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिमेकडील बºयाचशा गावातील वाहने मोरगाव-महालगाव या मार्गाने जात नाही. पण, काही वाहने या मार्गाने जातात त्यांना किती त्रास होतो याचा अनुभव घेणाºयालाच माहित. कान्हळगाव, मोरगाव, मोहाडी या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील अनेक गावकरी, विद्यार्थ्यांनी केली आहे.धोकादायक पूल...महालगाव-मोरगाव नदीवरचा पूल धोकादायक अवस्थेत आहे. पुलाच्यावरचा सिमेंटचा एका भागाचा थर पूरात वाहून गेला. त्या पुलावर मोठा पॅच पडला आहे. तसेच पुलाच्या कडाजवळ मोठे खड्डे पडले आहेत. तीन-चार वर्षापासून पुलाचा वरचा भाग धोकादायक असतानी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही. इथेही पुलावरील खड्डा मुरमाने भरला जातो. पावसाळ््यात मुरुम वाहून जाते. असा पैश्याचा अपव्यय केला जातो. पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळयात या पुलावर पाणी असते. त्यामुळे रहदारी बंद असते. पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.