शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

रस्त्यांची दैना वाहनधारकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:38 IST

गावखेड्यातील रस्ते डांबरीकरणाचे झाले. गुळगुळीत झालेल्या रस्त्यांची अवस्था अपघात अन् मृत्यूची प्रतिक्षा करीत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देकान्हळगाव-मोहाडी रस्त्याचे हाल : प्रशासनाला जाग कधी येणार, परिसरातील नागरिकांनी केली रस्ता दुरूस्तीची मागणी.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गावखेड्यातील रस्ते डांबरीकरणाचे झाले. गुळगुळीत झालेल्या रस्त्यांची अवस्था अपघात अन् मृत्यूची प्रतिक्षा करीत असल्याचे दिसून येते. त्यातलाच कान्हळगाव ते मोहाडी हा रस्ता पूर्णत: चाळण झाला आहे. तरीही प्रशासन या रस्त्याकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे प्रशासन जनतेच्या सहनशिलतेची परीक्षाच घेत असल्याचे दिसून येते.डिजीटल इंडिया, बुलेट ट्रेन व मेट्रो आदीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाºया शासनाची खेड्यांच्या रस्त्यांची अवस्था कशी आहे, याकडे दुर्लक्ष केले आहे. गावातील रस्ते तालुक्याला डांबरीकरणाने जोडली खरी, पण दुरुस्तीच केली जात नाही असे दिसून येते. कान्हळगाव-मोरगाव- मोहाडी हा रस्ता तीन दशकापूर्वी तयार करण्यात आला.तथापी, या रस्त्याला पडलेली खड्डे बुजविण्यात प्रशासनाला स्वास्थ्य नाही. मुरम-मातीने खड्डे झाकायचे हा उद्योग केला जातो. पावसाळयात पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती रस्त्याची होते. कंत्राटदारांना हे काम परवडणारे आहेत. कारण डागडूजीच्या नावाखाली मलिंदा चाखायला मिळत असतो. मोहाडी ते मोरगाव- कान्हळगाव हा डांबरीकरण झालेला पाच किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णत: उखळला, चाळणी झालेला आहे. बºयाच जागी जीवघेणे खड्डे पडले आहेत.डांबर बेपत्ता अन् रस्त्याची चाळण झाली आहे. मोहाडीच्या पश्चिमेकडील मोरगाव, महालगाव, कान्हळगाव, सिरसोली, वडेगाव, सालेबर्डी, काटी, पांढराबोडी, हरदोली आदी गावाची रहदारी या रस्त्यांने सकाळपासून रात्रीपर्यंत चालत असते. अतिशय वाईट अवस्था झालेल्या रस्त्याने वाहन चालवित असताना नजर वळती करता येत नाही. नजर चुकली तर अपघात घडलाच म्हणून समजा. अशी भिती येथून मार्गक्रमण करणाºयांना होतो. संवेदनाहित झालेले प्रशासन जनतेच्या सहनशिलतेची कसोटी घेत आहेत.जनप्रतिनिधी या रस्त्यासाठी बोलायला तयार नाहीत. मागील काही महिन्यापूर्वी चौंडेश्वरी मार्गाची थोडीफार दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिमेकडील बºयाचशा गावातील वाहने मोरगाव-महालगाव या मार्गाने जात नाही. पण, काही वाहने या मार्गाने जातात त्यांना किती त्रास होतो याचा अनुभव घेणाºयालाच माहित. कान्हळगाव, मोरगाव, मोहाडी या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील अनेक गावकरी, विद्यार्थ्यांनी केली आहे.धोकादायक पूल...महालगाव-मोरगाव नदीवरचा पूल धोकादायक अवस्थेत आहे. पुलाच्यावरचा सिमेंटचा एका भागाचा थर पूरात वाहून गेला. त्या पुलावर मोठा पॅच पडला आहे. तसेच पुलाच्या कडाजवळ मोठे खड्डे पडले आहेत. तीन-चार वर्षापासून पुलाचा वरचा भाग धोकादायक असतानी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही. इथेही पुलावरील खड्डा मुरमाने भरला जातो. पावसाळ््यात मुरुम वाहून जाते. असा पैश्याचा अपव्यय केला जातो. पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळयात या पुलावर पाणी असते. त्यामुळे रहदारी बंद असते. पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.