शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

रस्त्यांची दैना वाहनधारकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:38 IST

गावखेड्यातील रस्ते डांबरीकरणाचे झाले. गुळगुळीत झालेल्या रस्त्यांची अवस्था अपघात अन् मृत्यूची प्रतिक्षा करीत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देकान्हळगाव-मोहाडी रस्त्याचे हाल : प्रशासनाला जाग कधी येणार, परिसरातील नागरिकांनी केली रस्ता दुरूस्तीची मागणी.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गावखेड्यातील रस्ते डांबरीकरणाचे झाले. गुळगुळीत झालेल्या रस्त्यांची अवस्था अपघात अन् मृत्यूची प्रतिक्षा करीत असल्याचे दिसून येते. त्यातलाच कान्हळगाव ते मोहाडी हा रस्ता पूर्णत: चाळण झाला आहे. तरीही प्रशासन या रस्त्याकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे प्रशासन जनतेच्या सहनशिलतेची परीक्षाच घेत असल्याचे दिसून येते.डिजीटल इंडिया, बुलेट ट्रेन व मेट्रो आदीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाºया शासनाची खेड्यांच्या रस्त्यांची अवस्था कशी आहे, याकडे दुर्लक्ष केले आहे. गावातील रस्ते तालुक्याला डांबरीकरणाने जोडली खरी, पण दुरुस्तीच केली जात नाही असे दिसून येते. कान्हळगाव-मोरगाव- मोहाडी हा रस्ता तीन दशकापूर्वी तयार करण्यात आला.तथापी, या रस्त्याला पडलेली खड्डे बुजविण्यात प्रशासनाला स्वास्थ्य नाही. मुरम-मातीने खड्डे झाकायचे हा उद्योग केला जातो. पावसाळयात पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती रस्त्याची होते. कंत्राटदारांना हे काम परवडणारे आहेत. कारण डागडूजीच्या नावाखाली मलिंदा चाखायला मिळत असतो. मोहाडी ते मोरगाव- कान्हळगाव हा डांबरीकरण झालेला पाच किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णत: उखळला, चाळणी झालेला आहे. बºयाच जागी जीवघेणे खड्डे पडले आहेत.डांबर बेपत्ता अन् रस्त्याची चाळण झाली आहे. मोहाडीच्या पश्चिमेकडील मोरगाव, महालगाव, कान्हळगाव, सिरसोली, वडेगाव, सालेबर्डी, काटी, पांढराबोडी, हरदोली आदी गावाची रहदारी या रस्त्यांने सकाळपासून रात्रीपर्यंत चालत असते. अतिशय वाईट अवस्था झालेल्या रस्त्याने वाहन चालवित असताना नजर वळती करता येत नाही. नजर चुकली तर अपघात घडलाच म्हणून समजा. अशी भिती येथून मार्गक्रमण करणाºयांना होतो. संवेदनाहित झालेले प्रशासन जनतेच्या सहनशिलतेची कसोटी घेत आहेत.जनप्रतिनिधी या रस्त्यासाठी बोलायला तयार नाहीत. मागील काही महिन्यापूर्वी चौंडेश्वरी मार्गाची थोडीफार दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिमेकडील बºयाचशा गावातील वाहने मोरगाव-महालगाव या मार्गाने जात नाही. पण, काही वाहने या मार्गाने जातात त्यांना किती त्रास होतो याचा अनुभव घेणाºयालाच माहित. कान्हळगाव, मोरगाव, मोहाडी या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील अनेक गावकरी, विद्यार्थ्यांनी केली आहे.धोकादायक पूल...महालगाव-मोरगाव नदीवरचा पूल धोकादायक अवस्थेत आहे. पुलाच्यावरचा सिमेंटचा एका भागाचा थर पूरात वाहून गेला. त्या पुलावर मोठा पॅच पडला आहे. तसेच पुलाच्या कडाजवळ मोठे खड्डे पडले आहेत. तीन-चार वर्षापासून पुलाचा वरचा भाग धोकादायक असतानी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही. इथेही पुलावरील खड्डा मुरमाने भरला जातो. पावसाळ््यात मुरुम वाहून जाते. असा पैश्याचा अपव्यय केला जातो. पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळयात या पुलावर पाणी असते. त्यामुळे रहदारी बंद असते. पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.