शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर-भंडारा येथे रिवा इतवारी प्रवासी गाडीचा थांबा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:52 IST

तुमसर: रिवा-इतवारी-रिवा ही प्रवासी गाडी २४ फेब्रुवारीपासून धावणार आहे. परंतु तुमसर, भंडारा येथे थांबा देण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाशात ...

तुमसर: रिवा-इतवारी-रिवा ही प्रवासी गाडी २४ फेब्रुवारीपासून धावणार आहे. परंतु तुमसर, भंडारा येथे थांबा देण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाशात असंतोष आहे. महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या येण्याची वेळ ही बदलल्याने सायंकाळी नागपूरवरून परत येण्यास ही गाडी सोयीची ठरणार आहे. बालाघाट येथे लोकप्रतिनिधींच्या दबावापुढे पाच मिनिटाचा थांबा देण्यात आला. असाच दबाव येथे निर्माण करण्याची गरज आहे.

रविवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ४.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा एनोग्रेशन रन या गाडीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. प्रत्यक्षात २४ फेब्रुवारीपासून ही गाडी सुरू होत आहे. रिवा येथून ती सायंकाळी ५ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी इतवारीला ०७.२५ ला पोहोचणार आहे. आठवड्यातून ही गाडी तीन दिवस राहणार असून, रिवा येथून सोमवार, बुधवार, शनिवारला सुटणार आहे. २५ फेब्रुवारीला इतवारीवरून रिवाकरिता ही गाडी धावणार आहे. इतवारीवरून आठवड्यातून मंगळवार, गुरुवार व रविवारला ही गाडी सोडण्यात येणार आहे.

महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या वेळेत बदल :

महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाडीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वी ही गाडी नागपूर वरून ५ वाजता सुटायची. ती आता दुपारी ३.३० वाजता सुटत आहे. त्यामुळे दिवसभर नागपूर येथून काम केल्यानंतर सायंकाळची गाडी नाही. महाराष्ट्र एक्स्प्रेस ही दुपारीच स्वतः असल्याने अनेकांना आता अडचण निर्माण झाली आहे. रिवा-इतवारी एक्स्प्रेस गाडी सायंकाळी ६ वाजता सुटत असल्याने किमान प्रवाशांना तीन दिवस येथे सोयीचे होणार आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

नागपूर विभागात भंडारा व तुमसर हे मोठे जंक्शन आहेत. येथून रेल्वेला महसूल मोठ्या प्रमाणात मिळतो. प्रवाशांची ये-जा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे, तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाने रिवा इतवारी एक्स्प्रेस गाडीचा थांबा भंडारा व तुमसर येथे दिला नाही. भंडारा जिल्ह्याचे स्थान आहे, याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोरोना संक्रमण काळात प्रवासी गाड्यांची संख्या कमी आहे तसेच एक्स्प्रेस गाड्यात तिकीट आरक्षण करून प्रवास करावा लागतो. त्यामुळे मोठ्या रेल्वेस्थानकावर किमान एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची गरज आहे.