शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

तुमसर-भंडारा येथे रिवा इतवारी प्रवासी गाडीचा थांबा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:52 IST

तुमसर: रिवा-इतवारी-रिवा ही प्रवासी गाडी २४ फेब्रुवारीपासून धावणार आहे. परंतु तुमसर, भंडारा येथे थांबा देण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाशात ...

तुमसर: रिवा-इतवारी-रिवा ही प्रवासी गाडी २४ फेब्रुवारीपासून धावणार आहे. परंतु तुमसर, भंडारा येथे थांबा देण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाशात असंतोष आहे. महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या येण्याची वेळ ही बदलल्याने सायंकाळी नागपूरवरून परत येण्यास ही गाडी सोयीची ठरणार आहे. बालाघाट येथे लोकप्रतिनिधींच्या दबावापुढे पाच मिनिटाचा थांबा देण्यात आला. असाच दबाव येथे निर्माण करण्याची गरज आहे.

रविवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ४.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा एनोग्रेशन रन या गाडीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. प्रत्यक्षात २४ फेब्रुवारीपासून ही गाडी सुरू होत आहे. रिवा येथून ती सायंकाळी ५ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी इतवारीला ०७.२५ ला पोहोचणार आहे. आठवड्यातून ही गाडी तीन दिवस राहणार असून, रिवा येथून सोमवार, बुधवार, शनिवारला सुटणार आहे. २५ फेब्रुवारीला इतवारीवरून रिवाकरिता ही गाडी धावणार आहे. इतवारीवरून आठवड्यातून मंगळवार, गुरुवार व रविवारला ही गाडी सोडण्यात येणार आहे.

महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या वेळेत बदल :

महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाडीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वी ही गाडी नागपूर वरून ५ वाजता सुटायची. ती आता दुपारी ३.३० वाजता सुटत आहे. त्यामुळे दिवसभर नागपूर येथून काम केल्यानंतर सायंकाळची गाडी नाही. महाराष्ट्र एक्स्प्रेस ही दुपारीच स्वतः असल्याने अनेकांना आता अडचण निर्माण झाली आहे. रिवा-इतवारी एक्स्प्रेस गाडी सायंकाळी ६ वाजता सुटत असल्याने किमान प्रवाशांना तीन दिवस येथे सोयीचे होणार आहे, याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

नागपूर विभागात भंडारा व तुमसर हे मोठे जंक्शन आहेत. येथून रेल्वेला महसूल मोठ्या प्रमाणात मिळतो. प्रवाशांची ये-जा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे, तरीसुद्धा रेल्वे प्रशासनाने रिवा इतवारी एक्स्प्रेस गाडीचा थांबा भंडारा व तुमसर येथे दिला नाही. भंडारा जिल्ह्याचे स्थान आहे, याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोरोना संक्रमण काळात प्रवासी गाड्यांची संख्या कमी आहे तसेच एक्स्प्रेस गाड्यात तिकीट आरक्षण करून प्रवास करावा लागतो. त्यामुळे मोठ्या रेल्वेस्थानकावर किमान एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची गरज आहे.