शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता झाली त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:25 IST

पालांदूर : वाढत्या महागाईने सर्वसामान्य लोकांचे जगणे सध्या कठीण झाले आहे. रोजच्या मिळकतीत जीवन जगणे तारेवरची कसरत होत आहे. ...

पालांदूर : वाढत्या महागाईने सर्वसामान्य लोकांचे जगणे सध्या कठीण झाले आहे. रोजच्या मिळकतीत जीवन जगणे तारेवरची कसरत होत आहे. इंधन व गॅस दरवाढीने कुटुंबाचा आर्थिक बोजवारा उडाला आहे. शेतकरी वर्ग इंधन दरवाढीच्या चक्रात सापडला असून, रोवणीसह इतरही खर्चाची झालेली दरवाढ डोईजड होत आहे. सरकारने भरमसाठ कर लावत सामान्यांचे आर्थिक बजेट बिघडवले आहे. अमर्याद इंधन दरवाढ झाल्याने गोरगरीब भरडला जात आहे. जीवनावश्यक वस्तूंसह इतरही पूरक वस्तूंच्या किमती इंधन दरवाढीच्या कारणाने वाढल्या आहेत. सरकार गरिबांची आहे, का मोजक्याच धनिकांचे? असा प्रश्न चर्चेत आला आहे. राजकारणी कोणत्याही पक्षाचा असो. मात्र, इंधन दरवाढ सगळ्यांचे दुखणे झाले आहे. एवढी दरवाढ यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. दोनशे रुपये मजुरी करणारा मजूर मात्र जगताना पावलोपावली शासनाला शाप देत आहे. डिझेल महागल्याने शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने होणाऱ्या कामांच्या दरातसुद्धा वाढ झाली आहे. ही दरवाढ सहन करावी लागत आहे. शेतकऱ्याला मिळालेले पीक कर्जसुद्धा महागाईच्या अमर्याद चक्राने खर्चाकरिता अपुरे पडत आहे. शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे शेतकऱ्याची पावलोपावली अडवणूक होत आहे.

कोट

सरकारने तेलाचे दर कमी करावेत. शेतीला ट्रॅक्टरशिवाय पर्याय नसल्याने इंधन दरवाढ परवडणारी नाही. रोजच्या खर्चात मोठी वाढ झाल्याने जगणे मुश्कील होत आहे. शेती उत्पादन खर्चात भरीव वाढ झाली आहे. ही शेतकऱ्यांना अजिबात परवडणारी नाही.

-कृष्णा पराते, शेतकरी पालांदूर