शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सामान्य माणसाला सेवा घेण्याचा अधिकार

By admin | Updated: October 10, 2015 01:08 IST

सामान्य माणसाला अधिक प्रभावी, पारदर्शक आणि तत्पर सेवा मिळावी यासाठी अनेक कायद्याच्या माध्यमातून शासन व प्रशासन पूर्वीपासून काम करीत आहेत.

अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण : सुनील धापटे यांचे प्रतिपादनभंडारा : सामान्य माणसाला अधिक प्रभावी, पारदर्शक आणि तत्पर सेवा मिळावी यासाठी अनेक कायद्याच्या माध्यमातून शासन व प्रशासन पूर्वीपासून काम करीत आहेत. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमामुळे सामान्य माणसाला सेवा देण्यासाठी प्रशासन स्वत:वर बंधन घालून घेतेय, असा या कायद्याचा अर्थ अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन यशदाच्या राज्य प्रशिक्षण मुल्यमापन यंत्रणचे संचालक डॉ. सुनील धापटे यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ या कायद्याची माहिती सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होण्यासाठी प्रशिक्षकांचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. शासकीय अध्यापक विद्यालयात आयोजित या प्रशिक्षण कार्यशाळेत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना धापटे बोलत होते. यावेळी यशदाचे प्रशिक्षक घनशाम महाजन, शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अभय परिहार उपस्थित होते. शासकीय कामात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असावे त्यासाठी शासनाने दप्तर दिरंगाई, नागरिकांची सनद, विलंबाचा कायदा अशा कायद्याच्या व निर्णयाच्या माध्यमातून जनतेला वेळेत आणि प्रभावीपणे सेवा मिळवून घेण्याचा अधिकार दिला. मात्र, शासनाने २८ एप्रिल २०१५ रोजी लागू केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम या नवीन कायद्याव्दारे आता जनतेला वेळेत सेवा उपलब्ध करुन देणे प्रशासकीय अधिकाऱ्यांना बंधनकारक झाले आहे. प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाला त्यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करुन त्यासाठी नियत कालमर्यादा घोषित करणे बंधनकारक आहे. दिलेल्या नियत कालमर्यादेत पात्र व्यक्तीला सेवा न दिल्यास पात्र व्यक्तीस अपिलीय अधिकाऱ्यांकडे अपिल करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करतांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दंड बसणार नाही याची काळजी घेवून सामान्य जनतेला वेळेत सेवा पुरवाव्यात, असे आवाहन धापटे यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, दिलीप तलमले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, भंडारा नगर परिषद मुख्याधिकारी रवंीद्र देवतळे, गटविकास अधिकारी मंजुषा ठवकर, महिला व बालकल्याण अधिकारी मनीषा आंबेडारे तसेच सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)