शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राखीव जागेवर श्रीमंतांची वर्णी

By admin | Updated: May 6, 2015 00:40 IST

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमात तथा गरीब विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागेवर

आरटीई कायद्याचे उल्लंघन : प्रकरण शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाततुमसर : इंग्रजी माध्यमांच्या शाळेत अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमात तथा गरीब विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागेवर श्रीमंताच्या पाल्यांना प्रवेश देण्यात येत असल्याची माहिती आहे. सोडत पध्दतीला येथे फाटा देत बंद खोलीत यादीला अंतीम रुप देण्यात आले. प्रकरण तालुक्यापासून जिल्हा स्तरावर गेल्याने वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्याचे समजते.शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मागास आणि आर्थिकदृष्टया दुर्बल विद्यालयाकरिता २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. शहरातील एका नामांकित शाळेत ३० मागास विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अनिवार्य आहे. याकरिता ३७ विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज केले होते. अधिकचे अर्ज आल्याने सोडत पध्दतीने प्रवेश निश्चित करण्याचे ठरले होते. संबंधित पालकांना बोलविण्यात आले. तुमसर पंचायत समितीचे शिक्षण विभागातील अधिकारी व मुख्याध्यापकाने बंद खोलीत यादी अंतीम केली. राखीव ३० पैकी २८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. दस्ताऐवज नसल्याने दोन विद्यार्थ्यांची नावे प्रतिक्षा यादीत ठेवण्यात आली. उर्वरित सात विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत पुरेसे दस्ताऐवज जोडले नसल्याचे सांगून त्यांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. येथे प्रत्यक्षात सोडत पध्दतीचा अवलंब केला गेला नाही हे विशेष. २८ विद्यार्थ्यांत श्रीमंत तथा व्यापाऱ्यांची मुले असल्याची तक्रार अन्यायग्रस्त पालकांनी केली आहे.पंचायत समती सभापती कलाम शेख, गटशिक्षणाधिकारी सी. आर. नंदनवार, खंडविकास अधिकारी स्रेहा कुळचे यांचेकडे तक्रार करण्यात आली. खंडविकास अधिकारी तथा सभापती कलाम शेख यांनी प्रवेश प्रक्रिया रद्द करुन नव्याने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले, पंरतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात आता प्रकरण गेले आहे.आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रीयेत घोळ प्रकरणी अत्यंत कडक नियम आहेत. गरीब व राखीव जागेवर नियमबाहय प्रवेश प्रक्रिया राबविल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाले तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असे पंचायत समिती सभापती कलाम शेख यांनी लोकमतला सांगितले. गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणापासून ठेवल्यास खपवून घेणार नाही असे सांगून शहरातील व परिसरातील २५ टक्के जागांची तपासणी करण्यात येईल असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)