लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अवकाळी पाऊस आणि वादळाच्या तडाख्यात भंडारा तालुक्यातील खराडी येथील साईबाबा राईस मिलचे टिनपत्रे तसेच ३० फूट लांबीची भिंत कोसळल्याची घटना गुरूवारी घडली. यात सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खराडी येथे गुरूवारी सायंकाळी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाचा तडखा बसला. त्यात अनेक घरांवरील टिनपत्रे उडली तर वृक्ष उन्मळून पडली. याच वादळात साईबाबा राईस मीलचे पत्रे उडून अचानक भींत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र यामध्ये मिलमध्ये ठेवलेले ३० ते ४० धान पोते भीजले. शुक्रवारी महसूल विभागाच्या पथकाने भेट दिली. यावेळी खरबीचे तलाठी इप्पर, सरपंच रत्नमाला वाडीभस्मे, उपसरपंच संजय आकरे, सुरेश गिरीपुंजे, रंजीत गिरीपुंजे, विक्की गिरीपुंजे यांनी पाहणी केली. यावेळी साईबाबा राईस मिलचे मालक सुनील गिरीपुंजे यांनी महसूल विभागाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.गावात झालेल्या या वादळी पावसाने काही काळ हाहाकार उडाला होता. अचानक आलेल्या वादळाने अनेकांची त्रेधा उडाली. दुसºया दिवशी प्रत्येकजण आपले घर सावरतांना दिसत होते. शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या सर्वांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.अवकाळी पाऊस गत काही दिवसांपासून सारखा कोसळत आहे. गत आठ दिवसांपासून तर गारांचा वर्षावही होत आहे. वादळी वातावरणाने शेतकरी हवालदिल झाले आहे. अनेकांचे शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
वादळाच्या तडाख्यात राईस मिलची भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 05:00 IST
तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खराडी येथे गुरूवारी सायंकाळी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाचा तडखा बसला. त्यात अनेक घरांवरील टिनपत्रे उडली तर वृक्ष उन्मळून पडली. याच वादळात साईबाबा राईस मीलचे पत्रे उडून अचानक भींत कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र यामध्ये मिलमध्ये ठेवलेले ३० ते ४० धान पोते भीजले. शुक्रवारी महसूल विभागाच्या पथकाने भेट दिली.
वादळाच्या तडाख्यात राईस मिलची भिंत कोसळली
ठळक मुद्देखराडी येथील घटना। महसूल विभागाने केली पाहणी