शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

चुलबंदच्या तीरावर पिकते कारले, चवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:56 IST

चुलबंद नदीच्या सुपीक खोऱ्यात आता शेतकरी धाना ऐवजी भाजीपाला पीक घेण्याकडे वळला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेतकºयांनी कारले आणि चवळीच्या पिकातून समृद्धीचा मार्ग धरला आहे. एकरी एक ते दीड लाख रूपयांचे उत्पन्न घेतले जात आहेत.

ठळक मुद्देआधुनिक तंत्रज्ञानाची कास : धानाला भाजीपाला पिकाचा पर्याय

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : चुलबंद नदीच्या सुपीक खोऱ्यात आता शेतकरी धाना ऐवजी भाजीपाला पीक घेण्याकडे वळला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेतकºयांनी कारले आणि चवळीच्या पिकातून समृद्धीचा मार्ग धरला आहे. एकरी एक ते दीड लाख रूपयांचे उत्पन्न घेतले जात आहेत.लाखांदूर आणि लाखनी तालुक्यातून चुलबंद नदी वाहते. चुलबंदच्या खोऱ्यातील गाळाची सुपीक जमीन पाण्याचा निचरा करणारी आहे. परंतु या जमिनीवर आतापर्यंत केवळ धानाचेच पीक घेतले जात होते. धान पिकातून हवे तसे उत्पन्न मिळत नाही. सतत नापिकीचा सामना करावा लागतो. सर्वसाधन सामुग्री असतानाही कर्जबाजारीपणा नशीबी येतो. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा भाजीपाला पिकाकडे वळविला आहे.चुलबंद नदीच्या खोऱ्यातील खोलमारा, मारेगाव, नरव्हा, वाकल, तावशी, खाऊशी आदी गावात गत दोन वर्षांपासून भाजीपाला पीक घेतले जात आहे. राज्यात भाजीपाल्याला भाव मिळत नसले तरी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र बीटीबी भाजी मंडीच्या माध्यमातून योग्य भाव मिळत आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी आता भाजीपाला उत्पादनाकडे वळले आहे.आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी या शेतकऱ्यांना कृषी विभागाची सातत्याने मार्गदर्शन मिळते. शेतकरी नवनवीन प्रयोग करून आता कारले आणि चवळी घेत आहे. खोलमारा येथील प्रयोगशील शेतकरी प्रमोद भुसारी यांनी आपल्या दीड एकरात कारले आणि चवळीची लागवड केली आहे. त्यातून त्यांना एकरी एक ते दीड लाख रूपयांचे कारले आणि एक लाख रूपयांच्या चवळीचे पीक झाले आहे. घरी खाण्यापुरता धान ते पेरतात. सर्व शेतात आता भाजीपाल्याचे पीक घेत असून गुणात्मक दर्जा वाढविण्यावरही त्यांचा भर आहे. खोलमाराचे सरपंच अमृत मदनकर म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाची शेतीला जोड दिल्याने प्रगती साधने शक्य होत आहे. मलचिंग, सुक्ष्म सिंचन, कागदी आवरण, प्लॉस्टिक कॅरेट, गावाकरीता भाजीपाला, फिरते व्हॅन अशा सुविधा अनुदानावर किंवा शंभरटक्के सुटीवर पुरविल्यास खोलमारा राज्यात कृषी मॉडेल म्हणून पुढे येईल, असे सांगितले. कारले व चवळीच्या पिकाला जमिनीवर न ठेवता दोरी बांधून लटकवून ठेवले जाते. त्यामुळे फळांची जोमदार वाढ होते.कॅपल्थॉन्ट पद्धतीचा वापरभाजीपाला पीक रोगमुक्त राहण्यासाठी सुरूवातीच्या काळात कॅपल्थॉन्ट (कागदी आवरण) दिले जात आहे. चुलबंद खोऱ्यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हा प्रयोग केला आहे. यामुळे पीक लहान असताना त्यावर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. उन, वारा, पाऊस यापासूनही बचाव होतो. कमी श्रमात अपेक्षित उत्पादन मिळते.शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील बदल स्विकारण्याची गरज आहे. त्यासाठी स्वत: अभ्यास करावा. बाजारपेठेचा अभ्यासही महत्वाचा आहे. कोणत्या हंगामात कोणते वाण घ्यावे हेही महत्वाचे आहे. खोलमारा येथून बीटीबीमध्ये कारले, चवळी, मोठ्या प्रमाणात येत असून येथील शेतकरी प्रयोगशिल आहे.-बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी भंडारा