शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट धान्याचा पुरवठा

By admin | Updated: May 22, 2014 23:39 IST

सावली तालुक्यात येणार्‍या अनेक स्वस्त धान्य दुकानात मागील दोन महिन्यांपासून निकृष्ठ दर्जाचा धान्य पुरवठा होत असल्याने ग्राहकांत असंतोष पसरला आहे.

उपरी : सावली तालुक्यात येणार्‍या अनेक स्वस्त धान्य दुकानात मागील दोन महिन्यांपासून निकृष्ठ दर्जाचा धान्य पुरवठा होत असल्याने ग्राहकांत असंतोष पसरला आहे. ग्राहकांची बोंब असूनही संबंधित विभाग मात्र या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नागरिकात शासनाच्या कार्यप्रणालीबाबत रोष व्यक्त केला जात आहे. केंद्र सरकारने मागील तीन महिन्यापूर्वी नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून तांदुळ ३ रु. प्रति किलो तर गहू २ रु. प्रति किलो प्रमाणे धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. हे धान्य अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती ५ किलो धान्य देण्याची अंमलबजावणी केली. यात अंत्योदय, बिपीेल कार्डधारकांचा समावेश आहे. यापूर्वी एका राशन कार्डवर ३५ किलो धान्य मिळत होते. मात्र अन्न सुरक्षा योजना आल्यापासून अंत्योदय कार्ड धारकांना ३५ किलो धान्य तर बिपीएल कार्डधारकांना प्रत्येक मताला ५ किलो धान्य देण्यात येत आहे. यामुळे बर्‍याच कुटुंबाना या योजनेचा फटका बसला आहे. दोन-तीन जणांचे कुटुंब असल्यास त्या कुटुंबास फक्त १० ते १५ किलो धान्य मिळत आहे. यात महिनाभराचे राशन घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे या योजनेत सुधारणा करून पूर्वीप्रमाणे ३५ किलो धान्य देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे एपीेल काळे धारकांचे तांदुळ गहू पुर्णत: बंद झाल्याने कार्ड धारकांना धान्य पुरवठा करण्यात यावा अशीही मागणी होत आहे.सदर योजना लागू झाल्यापासून मागील तीन महिन्यापासून साखर पुरवठा बंद पडला असल्याने स्वस्त धान्य दुकानातील साखर नागरिकांसाठी कडू झाली आहे. तर दुसरीकडे स्वस्त दरात धान्य पुरवठा होत असल्याने स्वस्त धान्य दुकानात येणारा गहू निकृष्ट दर्जाचा, सडका पद्धतीचा येत आहे. स्वस्त धान्य दुकानदार त्या गव्हाची विल्हेवाट कार्डधारकांकडे लावत आहे. त्यामुळे नागरिकात बोंब उडाली आहे.(वार्ताहर)