शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

रानगव्यांचा शेतात धुडघूस, पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST

आमगाव येथील दिलीप बोंद्रे राजू बोंद्रे यांनी यावर्षी आपल्या शेतामध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली रविवारच्या रात्रीला रानगव्याचा कळप ...

आमगाव येथील दिलीप बोंद्रे राजू बोंद्रे यांनी यावर्षी आपल्या शेतामध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली रविवारच्या रात्रीला रानगव्याचा कळप धान पिकाची नासाडी करताना आढळून आला. धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या रानगव्यांचा बंदोबस्त कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याआधी अशोक बोंद्रे, राजू बोंद्रे व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा पिकाची रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. मोठ्या आशेने शेतकरी शेतात पिके पिकवीत असताना आले. या पिकावर वन्यप्राणी ताव मारत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवून नेल्या जात आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र, आतापर्यंत कोणत्याच प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. अभयारण्याची निर्मिती झाल्यामुळे या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आढळून येतात. शेतातील पिकांची नासधूस डोळ्यादेखत दिसत असतानासुद्धा शेतकरी काहीच करू शकत नाहीत. शेतकऱ्यांनी शेतीतील पिके वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. अभयारण्यामध्ये रस्त्याच्या कडेला जरी उतरले तरी अभयारण्यातील अधिकाऱ्यांनी अनेकांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र, अभयारण्यातील वन्य प्राणी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पिकाची नासधूस करत असतानासुद्धा अभयारण्यातील अधिकारी व कर्मचारी मूग गिळून बसलेले आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अभयारण्याकडून कोणत्याच प्रकारच्या उपाययोजना करताना दिसून येत नाही. वन्य-प्राणी राखण्यासाठी अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा उपस्थित असतानासुद्धा वन्य प्राणी बाहेर कसे पडतात, हा प्रश्न उपस्थित होत आहे. अभयारण्याला काटेरी कुंपण घालावे, अशी परिसरातील जनतेची मागणी आहे. मात्र, शासन स्तरावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही.