शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

रानगव्यांचा शेतात धुडघूस, पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST

आमगाव येथील दिलीप बोंद्रे राजू बोंद्रे यांनी यावर्षी आपल्या शेतामध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली रविवारच्या रात्रीला रानगव्याचा कळप ...

आमगाव येथील दिलीप बोंद्रे राजू बोंद्रे यांनी यावर्षी आपल्या शेतामध्ये उन्हाळी धान पिकाची लागवड केली रविवारच्या रात्रीला रानगव्याचा कळप धान पिकाची नासाडी करताना आढळून आला. धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या रानगव्यांचा बंदोबस्त कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याआधी अशोक बोंद्रे, राजू बोंद्रे व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा पिकाची रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. मोठ्या आशेने शेतकरी शेतात पिके पिकवीत असताना आले. या पिकावर वन्यप्राणी ताव मारत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवून नेल्या जात आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र, आतापर्यंत कोणत्याच प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही. अभयारण्याची निर्मिती झाल्यामुळे या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आढळून येतात. शेतातील पिकांची नासधूस डोळ्यादेखत दिसत असतानासुद्धा शेतकरी काहीच करू शकत नाहीत. शेतकऱ्यांनी शेतीतील पिके वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. अभयारण्यामध्ये रस्त्याच्या कडेला जरी उतरले तरी अभयारण्यातील अधिकाऱ्यांनी अनेकांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र, अभयारण्यातील वन्य प्राणी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पिकाची नासधूस करत असतानासुद्धा अभयारण्यातील अधिकारी व कर्मचारी मूग गिळून बसलेले आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अभयारण्याकडून कोणत्याच प्रकारच्या उपाययोजना करताना दिसून येत नाही. वन्य-प्राणी राखण्यासाठी अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा उपस्थित असतानासुद्धा वन्य प्राणी बाहेर कसे पडतात, हा प्रश्न उपस्थित होत आहे. अभयारण्याला काटेरी कुंपण घालावे, अशी परिसरातील जनतेची मागणी आहे. मात्र, शासन स्तरावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही.