शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

हळदीच्या उत्पादनातून घडविली क्रांती

By admin | Updated: May 27, 2014 23:31 IST

आयुर्वेदात हळदीला अनन्य साधारण महत्व आहे. पवनी तालुक्यातील बाम्हणी येथीेल शामराव मेंगरे यांनी चौरास भागात प्रथम हळदीचे विक्रमी उत्पादन घेऊन शेतकरी व बेरोजगार पुरुष व महिलांना रोजगाराची संधी दिली.

भंडारा : आयुर्वेदात हळदीला अनन्य साधारण महत्व आहे. पवनी तालुक्यातील बाम्हणी येथीेल शामराव मेंगरे यांनी चौरास भागात प्रथम हळदीचे विक्रमी उत्पादन घेऊन शेतकरी व बेरोजगार पुरुष व महिलांना रोजगाराची संधी दिली. सहा एकर शेतात ते मागील ३४ वर्षापासून हळदीचे उत्पन्न घेत आहेत. महाराष्ट्रात हा पहिला प्रयोग असल्याने जिल्हय़ात त्यांचे नावलौकिक ही झाले.

हळदीच्या पाचोळ्य़ापासून सेंद्रीय खत तयार करुन, उर्वरित पाचोळा फेकण्यात येतो. त्याला जनावरेही खात नाही. या पाचोळ्याला आग लावून नष्ट करावे लागते. सन २00५ पासून त्यांनी प्रयोगाला सुरुवात केली. त्यात त्यांना यश आले. हळदीपासून सुगधीत तेल बनविले. एक हजार पाचोळ्यातून १00 लिटर तेल काढले. ज्याला कसलीही विजेची ही गरज नसते. केवळ इंधन लागते. तेल काढल्यानंतर त्याचा गांडूळ खत तयार केले जाते. या तेलाचा उपयोग वातनाशक, चर्मरोग यासारख्या आजारावर होतो. या तेलाला हैदराबाद, कोचीन येथे मागणी आहे. या तेलाला १,२00 रुपये प्रति लिटर केरळ लिटर प्रमाणे मागणी आहे. दिल्ली, पुणे, मुंबई येथे या तेलाला मागणी आहे.

सन २00९ मध्ये बाम्हणी येथे विदर्भस्तरीय शेतकरी संमेलनाचे आयोजन करुन स्पाईसेस बोर्ड मुंबई यांनी हळदीला योग्य भाव मिळवून दिला आहे. विदेशामध्ये हळद व मिर्ची पाठविण्याकरीता जास्तीत जास्त हळदी पाहिजे अशी मुंबई येथील हळद व्यापार्‍यांनी भिवापूर येथे १0 मार्च २0१0 च्या संमेलनात मागणी केली होती. वाळलेली हळदीचे उत्पन्न एकरी ८ ते१0 क्विंटल होत असून त्यासोबतच आंतरिक पीक म्हणून तूर, सुर्यफूल, कांदे, भाजीपाला,पालेभाज्या, तिळाचे उत्पन्न एकरी ४ ते ६ क्विंटल होते. एक एकरामध्ये हळदीचे उत्पन्न १ लाख ३0 हजारांचे होऊन खर्च ३0 हजार होतो.

मेंगरे यांनी शेतकर्‍यांना वायगाव हळदचे उत्पन्न घेण्याचे आवाहन केले. त्यांनी कृषी क्षेत्रात नवेनवे प्रयोग करीत आहेत. लहान बायलर युनिटची नवीन मशीन अत्यंत कमी खर्चात बसविली असून इंधन व मजुरीची बचत होऊन ८ दिवसांचे काम एका दिवसात होत आहे. गावातील २५ लोकांना रोजगार मिळत आहे. हळद, मिरची, धने आदी उत्पादने विकले जात आहेत.

शासकीय नाबार्ड बँकेतर्फे सोलापूर, सातारा, रायपूर, नागपूर, भिवापूर, गोंदिया येथे कृषी विभागाच्या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. मुंबई येथे आयोजित कृषी विज्ञान प्रदर्शनीत शामराव मेंगरे यांनी हळदीपासून सुगंधी तेल निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवून या उपक्रमाला प्रथम पारितोषिक ही मिळाले.

सरपंच, उपसरपंच पदावर असताना मेंगरे यांनी गाव परिसरात जल पुनर्भरण, जल स्वराज्य प्रकल्प सुरू करुन सुजलाम सुफलाम बनविण्यास मदत केली. मेंगरे यांच्या या कार्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी पुरस्कार, गौरव, सन्मान मिळाला. चौरास भागात कृषी पर्यटन व हळद उद्योगाला मोठय़ा स्वरुपात वाव असल्याचे शामराव मेंगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)