शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

हळदीच्या उत्पादनातून घडविली क्रांती

By admin | Updated: May 27, 2014 23:31 IST

आयुर्वेदात हळदीला अनन्य साधारण महत्व आहे. पवनी तालुक्यातील बाम्हणी येथीेल शामराव मेंगरे यांनी चौरास भागात प्रथम हळदीचे विक्रमी उत्पादन घेऊन शेतकरी व बेरोजगार पुरुष व महिलांना रोजगाराची संधी दिली.

भंडारा : आयुर्वेदात हळदीला अनन्य साधारण महत्व आहे. पवनी तालुक्यातील बाम्हणी येथीेल शामराव मेंगरे यांनी चौरास भागात प्रथम हळदीचे विक्रमी उत्पादन घेऊन शेतकरी व बेरोजगार पुरुष व महिलांना रोजगाराची संधी दिली. सहा एकर शेतात ते मागील ३४ वर्षापासून हळदीचे उत्पन्न घेत आहेत. महाराष्ट्रात हा पहिला प्रयोग असल्याने जिल्हय़ात त्यांचे नावलौकिक ही झाले.

हळदीच्या पाचोळ्य़ापासून सेंद्रीय खत तयार करुन, उर्वरित पाचोळा फेकण्यात येतो. त्याला जनावरेही खात नाही. या पाचोळ्याला आग लावून नष्ट करावे लागते. सन २00५ पासून त्यांनी प्रयोगाला सुरुवात केली. त्यात त्यांना यश आले. हळदीपासून सुगधीत तेल बनविले. एक हजार पाचोळ्यातून १00 लिटर तेल काढले. ज्याला कसलीही विजेची ही गरज नसते. केवळ इंधन लागते. तेल काढल्यानंतर त्याचा गांडूळ खत तयार केले जाते. या तेलाचा उपयोग वातनाशक, चर्मरोग यासारख्या आजारावर होतो. या तेलाला हैदराबाद, कोचीन येथे मागणी आहे. या तेलाला १,२00 रुपये प्रति लिटर केरळ लिटर प्रमाणे मागणी आहे. दिल्ली, पुणे, मुंबई येथे या तेलाला मागणी आहे.

सन २00९ मध्ये बाम्हणी येथे विदर्भस्तरीय शेतकरी संमेलनाचे आयोजन करुन स्पाईसेस बोर्ड मुंबई यांनी हळदीला योग्य भाव मिळवून दिला आहे. विदेशामध्ये हळद व मिर्ची पाठविण्याकरीता जास्तीत जास्त हळदी पाहिजे अशी मुंबई येथील हळद व्यापार्‍यांनी भिवापूर येथे १0 मार्च २0१0 च्या संमेलनात मागणी केली होती. वाळलेली हळदीचे उत्पन्न एकरी ८ ते१0 क्विंटल होत असून त्यासोबतच आंतरिक पीक म्हणून तूर, सुर्यफूल, कांदे, भाजीपाला,पालेभाज्या, तिळाचे उत्पन्न एकरी ४ ते ६ क्विंटल होते. एक एकरामध्ये हळदीचे उत्पन्न १ लाख ३0 हजारांचे होऊन खर्च ३0 हजार होतो.

मेंगरे यांनी शेतकर्‍यांना वायगाव हळदचे उत्पन्न घेण्याचे आवाहन केले. त्यांनी कृषी क्षेत्रात नवेनवे प्रयोग करीत आहेत. लहान बायलर युनिटची नवीन मशीन अत्यंत कमी खर्चात बसविली असून इंधन व मजुरीची बचत होऊन ८ दिवसांचे काम एका दिवसात होत आहे. गावातील २५ लोकांना रोजगार मिळत आहे. हळद, मिरची, धने आदी उत्पादने विकले जात आहेत.

शासकीय नाबार्ड बँकेतर्फे सोलापूर, सातारा, रायपूर, नागपूर, भिवापूर, गोंदिया येथे कृषी विभागाच्या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. मुंबई येथे आयोजित कृषी विज्ञान प्रदर्शनीत शामराव मेंगरे यांनी हळदीपासून सुगंधी तेल निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवून या उपक्रमाला प्रथम पारितोषिक ही मिळाले.

सरपंच, उपसरपंच पदावर असताना मेंगरे यांनी गाव परिसरात जल पुनर्भरण, जल स्वराज्य प्रकल्प सुरू करुन सुजलाम सुफलाम बनविण्यास मदत केली. मेंगरे यांच्या या कार्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी पुरस्कार, गौरव, सन्मान मिळाला. चौरास भागात कृषी पर्यटन व हळद उद्योगाला मोठय़ा स्वरुपात वाव असल्याचे शामराव मेंगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)