शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हळदीच्या उत्पादनातून घडविली क्रांती

By admin | Updated: May 27, 2014 23:31 IST

आयुर्वेदात हळदीला अनन्य साधारण महत्व आहे. पवनी तालुक्यातील बाम्हणी येथीेल शामराव मेंगरे यांनी चौरास भागात प्रथम हळदीचे विक्रमी उत्पादन घेऊन शेतकरी व बेरोजगार पुरुष व महिलांना रोजगाराची संधी दिली.

भंडारा : आयुर्वेदात हळदीला अनन्य साधारण महत्व आहे. पवनी तालुक्यातील बाम्हणी येथीेल शामराव मेंगरे यांनी चौरास भागात प्रथम हळदीचे विक्रमी उत्पादन घेऊन शेतकरी व बेरोजगार पुरुष व महिलांना रोजगाराची संधी दिली. सहा एकर शेतात ते मागील ३४ वर्षापासून हळदीचे उत्पन्न घेत आहेत. महाराष्ट्रात हा पहिला प्रयोग असल्याने जिल्हय़ात त्यांचे नावलौकिक ही झाले.

हळदीच्या पाचोळ्य़ापासून सेंद्रीय खत तयार करुन, उर्वरित पाचोळा फेकण्यात येतो. त्याला जनावरेही खात नाही. या पाचोळ्याला आग लावून नष्ट करावे लागते. सन २00५ पासून त्यांनी प्रयोगाला सुरुवात केली. त्यात त्यांना यश आले. हळदीपासून सुगधीत तेल बनविले. एक हजार पाचोळ्यातून १00 लिटर तेल काढले. ज्याला कसलीही विजेची ही गरज नसते. केवळ इंधन लागते. तेल काढल्यानंतर त्याचा गांडूळ खत तयार केले जाते. या तेलाचा उपयोग वातनाशक, चर्मरोग यासारख्या आजारावर होतो. या तेलाला हैदराबाद, कोचीन येथे मागणी आहे. या तेलाला १,२00 रुपये प्रति लिटर केरळ लिटर प्रमाणे मागणी आहे. दिल्ली, पुणे, मुंबई येथे या तेलाला मागणी आहे.

सन २00९ मध्ये बाम्हणी येथे विदर्भस्तरीय शेतकरी संमेलनाचे आयोजन करुन स्पाईसेस बोर्ड मुंबई यांनी हळदीला योग्य भाव मिळवून दिला आहे. विदेशामध्ये हळद व मिर्ची पाठविण्याकरीता जास्तीत जास्त हळदी पाहिजे अशी मुंबई येथील हळद व्यापार्‍यांनी भिवापूर येथे १0 मार्च २0१0 च्या संमेलनात मागणी केली होती. वाळलेली हळदीचे उत्पन्न एकरी ८ ते१0 क्विंटल होत असून त्यासोबतच आंतरिक पीक म्हणून तूर, सुर्यफूल, कांदे, भाजीपाला,पालेभाज्या, तिळाचे उत्पन्न एकरी ४ ते ६ क्विंटल होते. एक एकरामध्ये हळदीचे उत्पन्न १ लाख ३0 हजारांचे होऊन खर्च ३0 हजार होतो.

मेंगरे यांनी शेतकर्‍यांना वायगाव हळदचे उत्पन्न घेण्याचे आवाहन केले. त्यांनी कृषी क्षेत्रात नवेनवे प्रयोग करीत आहेत. लहान बायलर युनिटची नवीन मशीन अत्यंत कमी खर्चात बसविली असून इंधन व मजुरीची बचत होऊन ८ दिवसांचे काम एका दिवसात होत आहे. गावातील २५ लोकांना रोजगार मिळत आहे. हळद, मिरची, धने आदी उत्पादने विकले जात आहेत.

शासकीय नाबार्ड बँकेतर्फे सोलापूर, सातारा, रायपूर, नागपूर, भिवापूर, गोंदिया येथे कृषी विभागाच्या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. मुंबई येथे आयोजित कृषी विज्ञान प्रदर्शनीत शामराव मेंगरे यांनी हळदीपासून सुगंधी तेल निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवून या उपक्रमाला प्रथम पारितोषिक ही मिळाले.

सरपंच, उपसरपंच पदावर असताना मेंगरे यांनी गाव परिसरात जल पुनर्भरण, जल स्वराज्य प्रकल्प सुरू करुन सुजलाम सुफलाम बनविण्यास मदत केली. मेंगरे यांच्या या कार्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी पुरस्कार, गौरव, सन्मान मिळाला. चौरास भागात कृषी पर्यटन व हळद उद्योगाला मोठय़ा स्वरुपात वाव असल्याचे शामराव मेंगरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)