शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

मुख्य सचिवांनी घेतला पीक परिस्थितीचा आढावा

By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST

राज्यात पावसाने मारलेली दडी आणि खोळबंलेल्या पेरणीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज शुक्रवारला ...

भंडारा : राज्यात पावसाने मारलेली दडी आणि खोळबंलेल्या पेरणीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज शुक्रवारला राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन पीक परिस्थितीचा आढावा घेतला.राज्यात मराठवाडा विभागात अजूनही फारसा पाऊस झाला नाही. त्यामुळे गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. याचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला त्याचबरोबर जिल्ह्याातील बियाण्यांची व खतांची उपलब्धता व मागणी याची माहिती त्यांनी जाणून घेतली. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. शेतकऱ्यांचे धान नर्सरी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र आज सकाळपासून जिल्हयात सर्वत्र पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात ९० टक्के भात नर्सरी झाली असून तुरीची ७३ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात बियाण्यांची व खताची कमतरता नाही, असे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सांगितले. जिल्ह्यात किसान पोर्टलवर २९ हजार ५३६ शेतकऱ्यांनी नोंदणी झालेली आहे. या पोर्टलमार्फत शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, पीक परिस्थती, किड व रोगांची माहिती वेळोवेळी देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या पोर्टलचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)१५ दिवसानंतर पावसाची हजेरीपवनी : तालुक्यात मागील १५ दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. शेतकऱ्यांचे पऱ्हे वाळलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. चौरास भागात ज्या भागात सिंचनाची सोय आहे, अशा भागात २० टक्के रोवणी आटोपलेली आहे. मात्र कोरडवाहू भागात पऱ्हे पाण्याच्या प्रतिक्षेत सुकत आहेत. काल रात्री पावसाने एकाएकी जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ज्या भागात सिंचनाद्वारे रोवणी झाली आहे. ती रोवणीसुध्दा संकटात सापडली आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल गेल्यामुळे रोवणीला पाणी पुरविणे कठिण झाले होते. आणखी एक आठवडा पाऊस आला नसता तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली असती.पवनी तालुक्यातील या भागात मोठ्या प्रमाणात धानपिकाची शेती केली जाते. धानपिकाला पाण्याची जास्तीत जास्त आवश्यकता असते. कोरडवाहू भागात पऱ्हे वाचविण्याकरिता शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागीलवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा दुष्काळ तर पडणार नाही ना! या चिंतेने शेतकरीवर्ग चिंतेत होता. मात्र गुरुवारला रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे उद्यापासून पेरणीच्या कामाला वेग येणार आहे.