शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

परतीच्या पावसाचा १३ हजार शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 07:00 IST

Bhandara News, Agriculture भंडारा जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका १३ हजार १८९ शेतकऱ्यांना बसला असून ५७५ गावातील नऊ हजार ५४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक नुकसान पवनी तालुक्यात५७५ गावातील साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका १३ हजार १८९ शेतकऱ्यांना बसला असून ५७५ गावातील नऊ हजार ५४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक नुकसान पवनी तालुक्यात झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता शासकीय मदतीची आस आहे.

जिल्ह्यात यंदा एक लाख ७८ हजार ७६८ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली होती. त्यात सर्वाधिक क्षेत्र धानाचे होते. जिल्ह्यात ७ ते ११ आॅक्टोंबर या कालावधीत परतीचा पाऊस कोसळला. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले. काढणीला आलेला धान ओला झाला. कापूण ठेवलेल्या कळपा भिजून पिकाचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी कळप्यांना आता कोंब फूटत आहे. जिल्ह्यातील ५७५ गावांना या पावसाचा जबर फटका बसला. नऊ हजार ५४२ हेक्टरवरील पीक बाधित झाले. भंडारा तालुक्यातील ३५ गावातील ५८७ शेतकऱ्यांचे १९५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.

मोहाडी तालुक्यातील ७७ गावातील २०२८ शेतकऱ्यांचे १०६८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. तुमसर तालुक्यातील ८१ गावातील ५६४ शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून ३४२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. पवनी तालुक्यातील १४९ गावातील सहा हजार ९४२ शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसला. तालुक्यात ५५५४ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. साकोली तालुक्यातील ९६ गावातील २०५ शेतकऱ्यांचे २५८ हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले. साकोली तालुक्यातील ९८ गावातील २०१३ शेतकऱ्यांचे १५५० हेक्टर क्षेत्रावरील पीक नष्ट झाले. लाखांदूर तालुक्यातील ३९ गावातील ८२० शेतकऱ्यांचे ५७५ हेक्टरवरील पीक पावसाने बाधित झाले.महापुरानेही अनेक गावातील पीक उद्ध्वस्त झाले होते. त्यातून सावरत नाही तोच आता परतीच्या पावसाने तडाखा दिला. कृषी विभागाने केलेल्या नजर अंदाजानुसार जिल्ह्यात धान पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. ३३ टक्क्यावर सहा हजार हेक्टर क्षेत्र परतीच्या पावसाने नऊ हजार ५४२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून ३३ टक्क्याच्यावर सहा हजार ५५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान पवनी तालुक्यात झाले असून ३३ टक्केच्यावर ४३०९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सहा हजार ९४२ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. कृषी विभागाच्यावतीने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी अपेक्षा होत आहे.

 

 

टॅग्स :agricultureशेती