शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा १३ हजार शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 07:00 IST

Bhandara News, Agriculture भंडारा जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका १३ हजार १८९ शेतकऱ्यांना बसला असून ५७५ गावातील नऊ हजार ५४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक नुकसान पवनी तालुक्यात५७५ गावातील साडेनऊ हजार हेक्टर क्षेत्र बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका १३ हजार १८९ शेतकऱ्यांना बसला असून ५७५ गावातील नऊ हजार ५४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सर्वाधिक नुकसान पवनी तालुक्यात झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता शासकीय मदतीची आस आहे.

जिल्ह्यात यंदा एक लाख ७८ हजार ७६८ हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली होती. त्यात सर्वाधिक क्षेत्र धानाचे होते. जिल्ह्यात ७ ते ११ आॅक्टोंबर या कालावधीत परतीचा पाऊस कोसळला. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले. काढणीला आलेला धान ओला झाला. कापूण ठेवलेल्या कळपा भिजून पिकाचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी कळप्यांना आता कोंब फूटत आहे. जिल्ह्यातील ५७५ गावांना या पावसाचा जबर फटका बसला. नऊ हजार ५४२ हेक्टरवरील पीक बाधित झाले. भंडारा तालुक्यातील ३५ गावातील ५८७ शेतकऱ्यांचे १९५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.

मोहाडी तालुक्यातील ७७ गावातील २०२८ शेतकऱ्यांचे १०६८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. तुमसर तालुक्यातील ८१ गावातील ५६४ शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून ३४२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. पवनी तालुक्यातील १४९ गावातील सहा हजार ९४२ शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसला. तालुक्यात ५५५४ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. साकोली तालुक्यातील ९६ गावातील २०५ शेतकऱ्यांचे २५८ हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले. साकोली तालुक्यातील ९८ गावातील २०१३ शेतकऱ्यांचे १५५० हेक्टर क्षेत्रावरील पीक नष्ट झाले. लाखांदूर तालुक्यातील ३९ गावातील ८२० शेतकऱ्यांचे ५७५ हेक्टरवरील पीक पावसाने बाधित झाले.महापुरानेही अनेक गावातील पीक उद्ध्वस्त झाले होते. त्यातून सावरत नाही तोच आता परतीच्या पावसाने तडाखा दिला. कृषी विभागाने केलेल्या नजर अंदाजानुसार जिल्ह्यात धान पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. ३३ टक्क्यावर सहा हजार हेक्टर क्षेत्र परतीच्या पावसाने नऊ हजार ५४२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून ३३ टक्क्याच्यावर सहा हजार ५५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान पवनी तालुक्यात झाले असून ३३ टक्केच्यावर ४३०९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सहा हजार ९४२ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. कृषी विभागाच्यावतीने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी अपेक्षा होत आहे.

 

 

टॅग्स :agricultureशेती