शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आॅपरेशन थिएटरमधून पाठवितात रुग्णांना परत

By admin | Updated: February 3, 2015 22:49 IST

सर्वसामान्यांचा दवाखाना अशी ओळख असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयात अस्थिरूग्णांची महिनाभरापासून हेळसांड होत आहे. रूग्णालय प्रशासनाकडून अस्थिरूग्णांची थट्टा सुरु आहे.

भंडारा : सर्वसामान्यांचा दवाखाना अशी ओळख असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयात अस्थिरूग्णांची महिनाभरापासून हेळसांड होत आहे. रूग्णालय प्रशासनाकडून अस्थिरूग्णांची थट्टा सुरु आहे. शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या रूग्णांना आॅपरेशन थिएटरमध्ये दाखल केल्यानंतर त्यांना भूलतज्ज्ञ व साहित्य नसल्याचे सांगून परत वॉर्डात पाठविण्याचा जिवघेणा प्रकार सुरू आहे. हा प्रकार माहित होताच सदर प्रतिनिधीने रुग्णालयात भेट दिली असता रूग्णांनी कैफियत मांडली.भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्ह्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील रूग्ण उपचारासाठी येतात. सामान्य रूग्णालय परवडण्याजोगे असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक शासकीय रूग्णालयात धाव घेतात. येथे तिसऱ्या माळ्यावर वॉर्ड क्रमांक १५ मध्ये अस्थिरूग्ण विभाग आहे. या विभागात सामान्य रूग्णालय प्रशासनाने रूग्णांसाठी १२ खाटांची व्यवस्था केली आहे. येथे उपचारासाठी दाखल काही रूग्ण महिनाभरापासून शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले आहेत. मात्र, त्यांच्यावर अद्याप शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही.मोहाडी तालुक्यातील जांब (कांद्री) येथील श्रीराम उरकुडा खाटेकर यांच्या डाव्या पायाचे हाड मोडल्यानंतर ते ३ जानेवारीला रूग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी त्यांना लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, आता महिना लोटला तरीही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून मोडलेल्या हाडाला आधार रहावा, म्हणून पायात रॉड टाकावयाचा आहे. मात्र, सामान्य रूग्णालयात रॉड व बेशुध्दीचे इंजेक्शन देणारे तज्ज्ञ नसल्यामुळे त्यांना महिनाभरापासून दवाखान्यात पडून रहावे लागले आहे. त्यांच्या सेवेसाठी त्यांच्याजवळ मुलगा आहे. भंडारा येथे नातेवाईक राहत नसल्यामुळे भोजनाची गंभीर परिस्थिती त्यांच्यासमोर उभी ठाकली आहे. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे खासगी रूग्णालयात उपचार घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा रोजीरोटी सोडून वडिलांसोबत रूग्णालयात आहे. येथील अस्थिविभागाचे डॉक्टर त्यांना एक दिवसाआड शस्त्रक्रिया होईल, असे सांगत आहेत. मात्र, साहित्य व भूलतज्ज्ञाअभावी शस्त्रक्रिया लांबणीवर पडत आहे.भंडारा तालुक्यातील आंबाडी येथील बलदेव दयाराम बावनकर हे वेटरचे काम करून आपल्या कुटूंबाचा गाडा हाकतात. त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या पायात असलेला रॉड आता काढायचा आहे. यामुळे ते ५ जानेवारीला सामान्य रूग्णालयात दाखल झाले. याला महिना लोटत आहे. त्यांचीही तीच परिस्थिती आहे. येथील अस्थिरोग तज्ज्ञ त्यांना शस्त्रक्रियेची हमी देत असले तरी ते केव्हा होईल हे सांगत नाहीत. यावेळी बलदेव म्हणाला, सोमवारला शस्त्रक्रिया करायचे असल्याचे डॉक्टरांनी सांगून आॅपरेशन थिएटरमध्ये नेले. शस्त्रक्रियापूर्वीचे कपडे घालायला सांगून आॅपरेशन टेबलवर झोपविले. तत्पूर्वी त्यांना सलाईन लावली. त्यानंतर बेशुध्दीचे इंजेक्शन देणारा व रॉड काढायचे साहित्य नसल्याचे सांगून आॅपरेशन न करताच तिसऱ्या माळ्यावरील वॉर्डात परत पाठविले. त्यांच्या पायातील रॉड १८ महिन्यात काढायला हवा होता, मात्र २४ महिन्यानंतरही रॉड काढण्यात आलेला नाही. महिनाभरापासून दवाखान्यात असल्यामुळे कुटूंबही आर्थिक संकटात सापडल्याचे सांगून बलदेव यांनी अश्रुंना वाट करुन दिली. (शहर प्रतिनिधी)