शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

तुडतुड्याची मदत मुख्यमंत्र्यांना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 22:35 IST

तुटपुंजी रक्कम : किरमटीच्या शेतकऱ्याने केली मनीआॅर्डर, गतवर्षी झाले होते शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : शासनाकडून ...

तुटपुंजी रक्कम : किरमटीच्या शेतकऱ्याने केली मनीआॅर्डर, गतवर्षी झाले होते शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसानलोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शासनाकडून धान पिकावर आलेल्या तुडतुड्याची तुटपूंजी मदत प्राप्त झाल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क मुख्यमंत्र्यांना मनीआॅर्डर करुन मदत परत पाठविली. लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील शेतकऱ्यांने ही मनीआॅर्डर केली असून तहसीलदारांना निवेदन दिले आहे.लाखांदूर तालुक्यात गतवर्षी धानपिकावर मोठ्या प्रमाणात तुडतुड्याचे आक्रमण झाले होते. अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. दरम्यान शासनाकडून नुकसान भरपाईसाठी मदत जाहीर झाली. हेक्टरी सहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र अलीकडे मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. ही रक्कम अत्यंत तुटपूंजी असल्याने शेतकरी संतप्त होत आहे. यातूनच किरमटी येथील अल्पभूधारक शेतकरी जयपाल प्रकाश भांडारकर यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या नावाने स्थानिक पोष्टातून मनीआॅर्डर करुन मदत नाकारली.जयपाल भांडारकर यांच्याकडे २ हेक्टर १६ आर जमीन आहे. गतवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली. अशा परिस्थितीत जयपालने आटापीटा करुन रोवणी केली. दरम्यान धानावर खोडकिडा, मावा, तुडतुडा आदी किडींनी आक्रमण केले. त्यात त्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली.जयपाल भांडारकर यांना सुध्दा लाभ मिळाला. विरली बुज साझाचे तलाठ्याने तुडतुड्याची रक्कम बँक खात्यात जमा झाल्याचे सांगितले. त्यावरुन जयपाल याने लाखांदूरच्या बँक आॅफ इंडियात चौकशी केली. तेव्हा त्यांच्या खात्यात १.१६ आर जमीनीचे फक्त ३ हजार ३७५ रुपये जमा झाल्याचे दिसून आले.शासनाने जाहीर केलेल्या निकषानुसार बँक खात्यात सुमारो सात हजार रुपये जमा होणे अपेक्षित होते. मात्र तुटपूंजी रक्कम जमा झाल्याने जयपाल संतप्त झाला. त्याने थेट लाखांदूर येथील पोस्ट आॅफीस गाठून ३ हजार ३७५ रुपयांची मनिआॅर्डर मुख्यमंत्र्यांच्या नावाने केली. तसेच लाखांदूरचे तहसीलदार संतोष महल्ले यांनाही निवेदन दिले.मिळाले तेवढ्यात समाधानी राहाआपल्या खात्यात रक्कम कमी आल्याचे दिसताच जयपाल भांडारकर यांनी तलाठी कार्यालय गाठले. तेथील तलाठ्याला याबाबत जाब विचारला तेव्हा तलाठ्याने ‘जेवढे पैसे मिळाले, तेवढ्यातच समाधानी रहा,’ असे उत्तर दिले. या उत्तराने जयपाल संतप्त झाला. जयपालसारखीच स्थिती लाखांदूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची आहे.लाखांदूर तालुक्यातील शेतकरी संतप्तशासनाने धानावरील तुडतुड्याची मदत जाहीर केली. मात्र ही मदत अतिशय तोकडी असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र सर्वेक्षणातील चुकांमुळे अनेकांना अपूरी मदत मिळत आहे. अनेक शेतकरी बँक खात्यात जमा झालेली रक्कम पाहून संताप व्यक्त करीत आहेत. या शेतकºयांना घोषित केल्यानुसार मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गतवर्षीची मदत आधीच वर्षभर उशिरा आली आणि त्यातही तुटपूंजी असल्याने अनेक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसत आहे.