शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

सेवानिवृत्तांची फरफट सुरूच

By admin | Updated: July 12, 2017 00:27 IST

३० जून २०१३ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही.

गोसेखुर्द पुनर्वसन विभागाचे प्रकरण : आश्वासित प्रगती योजनेच्या लाभापासून वंचितलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ३० जून २०१३ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. असे राज्य शासनाने ३० जुलै २०१३ च्या अध्यादेशात नमूद केले आहे. मात्र, शासनाच्या अध्यादेशाला न जुमानता गोसेखुर्द पूनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पाच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची अट ठेवून आश्वासित प्रगती योजनेच्या लाभापासून वंचित ठेवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.भास्कर फाये (वरिष्ठ लिपीक), उदाराम मानकर (वरिष्ठ लिपीक), वसंत रणदिवे (वरिष्ठ लिपीक), विनासक माटूरकर (वरिष्ठ लिपीक) व प्रभाकर भोरजार (नाईक) असे अन्यायग्रस्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे पाचही कर्मचारी गोसेखुर्द पुनर्वसन विभाग आंबाडी येथून सेवानिवृत्त झालेले आहेत. शासनाच्या २४ वर्षाच्या सेवेनंतर त्यांना आश्वासित प्रगती योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. याबाबत त्यांनी आतापर्यंत अनेकदा संबंधीत विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र, प्रशासनाने दखल घेतलेली नाही.सदर पाचही कर्मचारी अंबाडी येथील कार्यकारी अभियंता गोसेखुर्द पुनर्वसन विभागात कार्यरत होते. हे सर्व २००८ मध्ये सेवानिवृत्त झालेत. २४ वर्षाच्या सेवानिवृत्ती नियमानुसार त्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळतो. मात्र, त्या लाभाकरिता गोसेखुर्द विभागाने या पाचही कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची अट घातली आहे. वास्तविकतेत, राज्य शासनाने ३० जुलै २०१३ मध्ये नविन अध्यादेश काढून ३० जून २०१३ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यक नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे असतानाही गोसेखुर्द विभागाकडून सेवानिवृत्तांची अडवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आश्वासित प्रगती योजनेच्या दुसऱ्या लाभामुळे सेवानिवृत्तीधारकांच्या निवृत्ती वेतनात वाढ होईल. जात वैधता प्रमाणपत्राची गरज नाहीसदर कर्मचारी २०१३ पूर्वी सेवानिवृत्त झाल्याने त्यांना जात वैधता प्रमाणपत्राची गरज नाही. तसे पत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त यांनी दिलेले आहे. याउपरांतही गोसेखुर्द प्रकल्प मंडळाचे सहायक अधिक्षक अभियंता मृ.प. कोमलकर यांनी पहिल्या अध्यादेशावर बोट ठेवून शासनाच्या २०११ च्या मुद्दा क्रमांक १३ अन्वये दिलेल्या स्पष्टीकरणाचे अवलोकन करून प्रकरणी कार्यवाही करण्याचे आदेश बजावले आहे. जूना अध्यादेशानंतर नविन अध्यादेश निर्गमित झाल्याने नविन अध्यादेशानुसार जात वैधता प्रमाणपत्राची गरज नाही, असे स्पष्ट होत असताना कर्मचाऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहे.