शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

बहुचर्चित प्रीती बारीया खून खटल्याचा निकाल आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:43 IST

एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून तिघांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू तर दोघांना कायम अपंगत्व आले आहे. या बहुचर्चित खून खटल्याची अंतिम सुनावणी शुक्रवारला भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात होत आहे.

ठळक मुद्देतीन वर्षापूर्वीची अमानुष घटना : आरोपींनी दोन महिलांचा खून करून दोघांना केली होती बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून तिघांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू तर दोघांना कायम अपंगत्व आले आहे. या बहुचर्चित खून खटल्याची अंतिम सुनावणी शुक्रवारला भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात होत आहे.तीन वर्षापूर्वी ३० जुलै २०१५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास म्हाडा कॉलनी येथील रविंद्र शिंदे यांच्या घरी त्यांची मुलगी अश्विनी एकटी असल्याचे पाहून एसी दुरूस्तीच्या बहाण्याने अमिर एजाज शेख आणि सचिन कुंडलीक राऊत या दोन तरूणांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार करून घरातील सोन्याचे दागिणे, लॅपटॉप, एटीएम कार्ड चोरून नेले होते. तेव्हापासून अश्विनीला अपंगत्व आले आहे.याच आरोपीनी त्याच दिवशी रात्री ८ वाजताच्या सुमारास तकीया वॉर्डातील रूपेश बारीया यांच्या घरी एसी दुरूस्तीच्या बहान्याने प्रवेश करून प्रिती बारीया (३०) हिच्या डोक्यावर हातोडीने वार करून जिवानीशी ठार केले. त्याचवेळी तिचा मुलगा भव्य बारीया (९) हा समोर आला असता त्याच्याही डोक्यावर आरोपींनी हातोडीने वार केले. यात तो गंभीररित्या जखमी झाला. बारीया यांच्या घरातून सोने चांदीचे दागिने व ३ लाख २० हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेले होते. आरोपींनी शिंदे यांच्या घरून चोरून नेलेल्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखविताच या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.याप्रकरणी भंडारा पोलिसांनी भादंवि ३०२, ३०७, ३९७, ४५२ कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. तपासात आरोपींनी चोरलेले दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली हातोडी आरोपीच्या घरून जप्त केली होती. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांच्या न्यायालयात या प्रकरणाचा खटला सुरू आहे. या आरोपींनी केलेले तिन्ही गुन्हे गंभीर असून सन २०१५ पासून आजपावेतो अशा गुन्ह्याची पुनरावृत्ती भंडारा किंवा गोंदिया जिल्ह्यात घडलेली नाही. त्यामुळे शुक्रवारच्या अंतिम निकालाकडे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.भव्यला देता आली नाही साक्षप्रीती बारीया खून व भव्य बारीया, अश्विनी शिंंदे मारहाण प्रकरणात सरकारी पक्षाने २५ साक्षदारांचे बयान नोंदविले आहेत. गंभीर दुखापतीमुळे भव्य बारीया याला अर्धांगवायूने ग्रासले आहे. त्यामुळे तो आता बोलूही शकत नाही. याशिवाय घडलेली घटना आठवत नसल्यामुळे तो साक्ष देऊ शकला नाही, असे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर सांगितल्यामुळे त्याची साक्ष घेण्यात आली नाही.या बहुचर्चित खून खटल्याची अंतिम सुनावणी शुक्रवारला जिल्हा व सत्र न्यायालयात होत आहे. अमिर शेख आणि सचिन राऊत या आरोपींनी दोघांचा खून करून आणि दोघांना शस्त्राने वार करून कायमचे गंभीर जखमी केले. त्यामुळे अश्विनी शिंदे आणि भव्य बारीया यांना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे त्यांना आयुष्यभर या वेदना देणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.अर्जुनीतही केला होता खूनया दोन्ही गुन्ह्यापूर्वी अमिर शेख आणि सचिन राऊत या आरोपींनी १० जून २०१५ रोजी अर्जुनी (मोरगाव) येथील नितू सुरेश पशिने या घरी एकटी असल्याची संधी साधून एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून त्यांच्यावर शस्त्राने वार करून ठार केले होते. याप्रकरणाची सुनावणी गोंदिया जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे.

टॅग्स :Murderखून