शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

बहुचर्चित प्रीती बारीया खून खटल्याचा निकाल आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:43 IST

एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून तिघांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू तर दोघांना कायम अपंगत्व आले आहे. या बहुचर्चित खून खटल्याची अंतिम सुनावणी शुक्रवारला भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात होत आहे.

ठळक मुद्देतीन वर्षापूर्वीची अमानुष घटना : आरोपींनी दोन महिलांचा खून करून दोघांना केली होती बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून तिघांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू तर दोघांना कायम अपंगत्व आले आहे. या बहुचर्चित खून खटल्याची अंतिम सुनावणी शुक्रवारला भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात होत आहे.तीन वर्षापूर्वी ३० जुलै २०१५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास म्हाडा कॉलनी येथील रविंद्र शिंदे यांच्या घरी त्यांची मुलगी अश्विनी एकटी असल्याचे पाहून एसी दुरूस्तीच्या बहाण्याने अमिर एजाज शेख आणि सचिन कुंडलीक राऊत या दोन तरूणांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार करून घरातील सोन्याचे दागिणे, लॅपटॉप, एटीएम कार्ड चोरून नेले होते. तेव्हापासून अश्विनीला अपंगत्व आले आहे.याच आरोपीनी त्याच दिवशी रात्री ८ वाजताच्या सुमारास तकीया वॉर्डातील रूपेश बारीया यांच्या घरी एसी दुरूस्तीच्या बहान्याने प्रवेश करून प्रिती बारीया (३०) हिच्या डोक्यावर हातोडीने वार करून जिवानीशी ठार केले. त्याचवेळी तिचा मुलगा भव्य बारीया (९) हा समोर आला असता त्याच्याही डोक्यावर आरोपींनी हातोडीने वार केले. यात तो गंभीररित्या जखमी झाला. बारीया यांच्या घरातून सोने चांदीचे दागिने व ३ लाख २० हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेले होते. आरोपींनी शिंदे यांच्या घरून चोरून नेलेल्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखविताच या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.याप्रकरणी भंडारा पोलिसांनी भादंवि ३०२, ३०७, ३९७, ४५२ कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. तपासात आरोपींनी चोरलेले दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली हातोडी आरोपीच्या घरून जप्त केली होती. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांच्या न्यायालयात या प्रकरणाचा खटला सुरू आहे. या आरोपींनी केलेले तिन्ही गुन्हे गंभीर असून सन २०१५ पासून आजपावेतो अशा गुन्ह्याची पुनरावृत्ती भंडारा किंवा गोंदिया जिल्ह्यात घडलेली नाही. त्यामुळे शुक्रवारच्या अंतिम निकालाकडे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.भव्यला देता आली नाही साक्षप्रीती बारीया खून व भव्य बारीया, अश्विनी शिंंदे मारहाण प्रकरणात सरकारी पक्षाने २५ साक्षदारांचे बयान नोंदविले आहेत. गंभीर दुखापतीमुळे भव्य बारीया याला अर्धांगवायूने ग्रासले आहे. त्यामुळे तो आता बोलूही शकत नाही. याशिवाय घडलेली घटना आठवत नसल्यामुळे तो साक्ष देऊ शकला नाही, असे डॉक्टरांनी तपासणी केल्यावर सांगितल्यामुळे त्याची साक्ष घेण्यात आली नाही.या बहुचर्चित खून खटल्याची अंतिम सुनावणी शुक्रवारला जिल्हा व सत्र न्यायालयात होत आहे. अमिर शेख आणि सचिन राऊत या आरोपींनी दोघांचा खून करून आणि दोघांना शस्त्राने वार करून कायमचे गंभीर जखमी केले. त्यामुळे अश्विनी शिंदे आणि भव्य बारीया यांना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे त्यांना आयुष्यभर या वेदना देणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.अर्जुनीतही केला होता खूनया दोन्ही गुन्ह्यापूर्वी अमिर शेख आणि सचिन राऊत या आरोपींनी १० जून २०१५ रोजी अर्जुनी (मोरगाव) येथील नितू सुरेश पशिने या घरी एकटी असल्याची संधी साधून एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून त्यांच्यावर शस्त्राने वार करून ठार केले होते. याप्रकरणाची सुनावणी गोंदिया जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे.

टॅग्स :Murderखून